छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
February 14, 2025 at 01:44 PM
*डॉ.डेलन नावाचा एक समकालीन परदेशी प्रवासी इ.स. १६७० च्या जानेवारी महिन्यात राजापूर येथे आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तो लिहितो, 'His (Shivaji's) subjects are Pagans like himself. But he tolerates all religions and is looked upon as one of the most politick princes in those parts.' : महाराजांची प्रजा त्यांच्याप्रमाणेच मूर्ती पूजक आहे परंतु ते सर्व धर्माचा आदर करतात. या भागातील अतिशय धोरणी, मुत्सद्दी राजकारणी पुरुष म्हणून ते विख्यात आहेत.* टीप : वरील लेखात सर्व धर्माचा आदर करतात म्हणजे आपल्या धर्माचा छातीठोक अभिमान बाळगून इतर धर्मियांचा आदर करतात असा अर्थ आहे नाहीतर काही अर्धवट ज्ञानी भलतंच ओरडत सुटतील. मुळात महाराजांचे हिंदुत्व म्हणजे तुम्ही आम्हाला डीवचू नका आम्ही तुम्हाला डीवचणार नाही अशा स्वरूपाचे असताना भारतात मात्र नेहमीच दोन मूर्ख गट आग्रस्थानी दिसतात त्यातील एक गट म्हणजे महाराज हिंदू धर्माचा सन्मान करताना इतर धर्माचा आदर करत नव्हते असा एक गट आहे जो उठ सुठ इतर धर्मीयांना नावे ठेवताना दिसतो काही छोट्या गुरूंनी त्यांना ही शिकवण दिलेली आहे आणि दुसरा एक गट जो महाराजांना हिंदू धर्माशी काहीही घेणंदेणं नव्हतं ते सर्व धर्माना एकत्र करत होते मुळात बहुतांश लोक या दोन गटातच असतात पण सत्य मात्र या दोन्ही गटांच्या मध्यभागी आहे ते म्हणजे आम्ही आमची संस्कृती आमचा धर्म अभिमानाने जपतो मिरवतो त्यास तुम्ही बाधा आणू नका जर तुम्ही ती आणली तर आम्ही गय करणार नाही बाकी तुम्ही तुमचा धर्म तुमच्या भागात आम्हाला त्रास न देता तुम्ही त्यात रहा आमची काही हरकत नाही .. राजांनी कधीही कोणतीही मस्जिद पाडली नाही तसे आदेश दिले नाही... आता हे वाचून सेक्युलर लोकांना आनंद वाटेल आणि ते म्हणतील आता का मग अतिक्रमण हटवा म्हणता गडांवरील तर मूर्खानो ते अतिक्रमण आहे ... अतिक्रमण म्हणजे तिथे आधीपासून नसणारी गोष्ट बांधली गेली आहे... मूळ दुसऱ्याचा मालकीच्या जाग्यावर हडपण्याचा मनसुबा म्हणजे अतिक्रमण अलिकडे अनेक गडांवर झालेल्या मस्जिदी हटवणे योग्यच आहे कारण या गोष्टी आधीपासूनच तिथे नाहीत गेल्या काही वर्षात जिहादी लोकांनी अशाप्रकारे कबरी बांधण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ते अनधिकृत आहे ते हटवायलाच हवे... कोणी कोणत्या धर्मात रहावे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे तो शिवकाळातही होता. राजांनी कधीही तुम्ही या धर्मात या त्या धर्मात जा असल्या गोष्टी केल्या नाहीत ! उलट हिंदूंना हिंदू म्हणून जगणे मुश्किल झाले होते इस्लामिक राजवटीत त्यांना बळजबरीने धर्मांतर करण्याचे घाट रचले जात होते तेव्हा मात्र या बळजबरीच्या क्रूर धोरणाविरुद्ध राजांनी लढा देऊन रयतेला आधार दिला. अर्थात अशाप्रकारे " स्व धर्माचा छातीठोक अभिमान बाळगून इतर धर्मांचा आदर करणारे " छत्रपती शिवराय होते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. #शककर्ते #शिवराय 👑 *शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात 🚩*
❤️ 🙏 👍 🚩 🙌 21

Comments