卐 "साई-कृपा" 卐 ज्योतिष कार्यालय, टिटवाळा-कल्याण
January 30, 2025 at 05:00 PM
🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹
♦️ *विचारपुष्प*♦️
*कितीही वेळा वाचली तरी परत परत वाचायला आवडेल असा लेख..!*
*कर्माचा सिद्धांत..!*
*यालाच जीवन म्हणतात..!*
*एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.*
*पण ती ज्या ठीकाणी बसलेली असतें तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.*
*एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.*
*सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.*
*तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो..!*
*वाघ जोरात झेप घेतो...*
*आणि तितक्यात वीज चमकते...*
*त्या शिकाऱ्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो..!*
*आणि*
*या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते..!*
*माणसाचं आयुष्य हे असंच असतं..!*
*त्याच्या हातात काहीच नसतं..!*
*आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची..!*
*कर्ता करविता असतो तो ईश्वर..!*
*असंच एक एक विचार येत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही..!*
*मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच..!*
*कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं..!*
*'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'*
*आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं.. दोन्ही एकाच रथाची चाकं..!*
*कुठल्या खड्डयात अडकणार आणि कुठल्या संकटावर वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच..!*
*'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?*
*'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, ३० तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'..!*
*त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?*
*'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'*
*तिला दरीत ढकलणारं कोण असतं? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?*
*एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो..! त्यामुळे तो वाचतो...*
*ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?*
*त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?*
*कोण सांगेल? सांगेल कोण??*
*कुणीच नाही...*
*हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं.. प्रेमाने सावरलेलं...* *आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...*
*ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...!*
*मोर नाचताना सुद्धा रडतो.. आणि..*
*राजहंस मरताना सुद्धा गातो..!*
*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..!*
*आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.*
*यालाच जीवन म्हणतात.*
*किती दिवसाचे आयुष्य असते?*
*आजचे अस्तित्व उद्या नसते,*
*मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!*
*नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..!*
*कोणाचा अपमान करू नका आणि* *कोणाला कमीही लेखू नका..!*
*- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,*
*पण वेळ ही तुमच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे..!*
*- कोणी कितीही महान झाला असेल,*
*पण निसर्ग कोणाला कधीच* *लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..!*
*स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..!*
*देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं..! फार सुंदर विचार आहेत नक्की वाचा.*
*-स्वामी विवेकानंद*🙏
*♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️*
📜 *दैनिक पंचाग व आध्यात्मिक माहितीसाठी ग्रुप*
https://chat.whatsapp.com/DO2gfVBZ8qkHUjhxemyg3t
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
Follow this link to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919833271518
https://g.co/kgs/MkREmYM
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
👍
🙏
6