
Voice Of Nation...🎙️
January 30, 2025 at 04:21 PM
*महाराष्ट्र सरकार,राज्य शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डाचा जोरदार दणका...!*
दहावी आणि बारावी परीक्षांबाबत मोठा निर्णय... दहावी आणि बारावी परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्यास, कॉप्या सापडल्यास परीक्षा केंद्राची कायमचीच मान्यता रद्द करण्याचा इशारा बोर्डाने दिलाय. याशिवाय परीक्षा केंद्रांवर परीक्षक,शिक्षक,कर्मचारी नियुक्ती करण्याच्या निर्णयात ही बदल करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवरच अन्य शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी,संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांचे पेव पुटले होते.लाखोंनी फी घेऊन विद्यार्थी 14-14 तास ॲकॅडमीत शिकवली जात होते.ऐन परीक्षा वेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरून किंवा परीक्षा आधीच विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका देऊन भरमसाठ मार्क्स पाडून दिली जात होते. एक्झामिनेशन सेंटरवर न जाता अकॅडमीतच बोर्डाचे प्रॅक्टिकल लिहून घेतले जात होते. विद्यार्थ्यांचे बोगस ऍडमिशन शाळेत केले जात होते व कोट्यावधींची उलाढाल केली जात होती. सदर विषयावर लगाम घालण्यासाठी अनेक तक्रार आंदोलन उपोषण झाले त्याचीच दखल घेत महाराष्ट्र सरकारने, राज्य शिक्षण विभागाने, प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला,शिक्षकाला व कर्मचाऱ्याला बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली व शिक्षकांनी आपण शिकवत नसलेल्या शाळेत जाऊन प्रशिक्षण करावे असा निर्णय घेण्यात आला होता. तसेच बोगस शाळा नवीन वर्ष सुरू होणे आधीच बंद करा व त्यांची यादी समाज माध्यमातून प्रसारित करण्याचे ही आदेश देण्यात आले होते.पण सदर निर्णयांना लोकप्रतिनिधी,शिक्षक संघटना व संस्थाचालकांनी विरोध दर्शवल्यामुळे यांचं कंबरड मोडण्यासाठी,कॉपीमुक्त परीक्षा होऊन जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत मार्क पडतात, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळेल त्या परीक्षा केंद्राची कायमचीच मान्यता रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub