
Voice Of Nation...🎙️
February 18, 2025 at 05:22 AM
*कॉपीमुक्त अभियानाचा बारामती,इंदापूर,दौंड,माळशिरस,करमाळा,वाई,माण खटाव तालुक्यात उडतोय फज्जा...!*
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शंभरच्या आराखड्यात कॉपीमुक्त अभियानाचा समावेश केला,ज्यावर शिक्षण मंत्री व अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली.कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी विशेष नियमावली ही तयार केल्यागेल्या व त्याचे सक्तीने अंमलबजावणी व्हावी असे आदेश ही झाले.पण तरी देखील बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक,कटफळ,अंजनगाव,सुपे, भवानीनगर,दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली भिगवन,दौंड शहर,इंदापूर तालुक्यातील कळंब,पळसदेव,भिगवण, माळशिरस तालुक्यातील पिरळे, करमाळा तालुक्यातील कात्रज केतुर रोड तसेच वाई व माण खटाव तालुक्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर बोर्डाचे नियम पाळले जात नाहीत.सदर ठिकाणी बोगस रित्या ऍडमिशन असलेले अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन आहेत,जे केवळ परीक्षेसाठीच वरील ठिकाणी शाळेत जातात.सदर परीक्षा केंद्रांवर अनेक ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत. एवढेच काय तर बोर्डाच स्कॉड मॅनेज करून विद्यार्थ्यांना वर्गातच शिक्षक किंवा तीराईत व्यक्ती येऊन ऑब्जेक्टिव्ह चे उत्तर पाच मिनिटात सांगून जातो. ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यापूर्वीच त्यांच्या बसमध्ये प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात. याची कबुली स्वतः एकेडमीत शिकणारे व परीक्षा देणारे विद्यार्थीच देतात. मग कसली कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा...? हा तर सरळ सरळ शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. सदर बाबीची तक्रार अनेक वेळा बोर्डाकडे केली आहे बोर्ड आता या विषयावर काय कारवाई करणार व कॉपीमुक्त अभियान कसं यशस्वी करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे व बोर्डाने ठरवल्याप्रमाणे ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सापडतील त्या परीक्षा केंद्रांची कायमचीच मान्यता रद्द करणार व जे शिक्षक कॉप्या पुरवतात त्यांना सेवेतून बडतर्फ करणार असे आदेश असून ही सदर परीक्षा केंद्रांवर बोर्ड आता काय कारवाई करणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
