
Voice Of Nation...🎙️
February 22, 2025 at 04:37 AM
काल दहावीचा पहिलाच पेपर आणि पहिलाच पेपर फुटला जेणेकरून सर्वत्र खळबळ उडाली.चक्क झेरॉक्स सेंटरवर वीस रुपये प्रमाणे पेपर वाटला जात होता,एक्झामिनेशन सेंटरच्या बाहेर खालून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्या जात होत्या.अशातच पेपर फुटला नसल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षण विभागाने केला आहे.पण जळगावतील सदर एक्झामिनेशन सेंटरवर कॉपी पुरवणाऱ्या तीन युवकांवर तसेच झेरॉक्स सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पण बारामतीत बेकायदेशीर अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बेकायदेशीर हॉस्टेलवर किंवा सदर विद्यार्थी त्यांच्या एक्झामिनेशन सेंटरवर जाताना बस मध्ये म्हणजेच बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक,सुपे,कटफळ,अंजनगाव,इंदापूर तालुक्यातील कळंब,भिगवण,पळसदेव,माळशिरस तालुक्यातील पिरळे,दौंड तालुक्यातील दौंड शहर,स्वामी चिंचोली भिगवन, करमाळा तालुक्यातील कित्तूर रोड, कात्रज,वाई,मान खटाव,फलटण प्रश्नांची उत्तरे कशी काय दिली जातात.तेवढेच काय तर सदर एक्झामिनेशन सेंटरवर परीक्षा चालू असतानाच तिराईत व्यक्ती येऊन ऑब्जेक्टिव्ह ची उत्तरे वर्गात येऊन सांगून जातो.याचा अर्थ बोर्डाचा स्कॉड मॅनेज केलं जाते का.? *आम्ही आयआयटीजीइइ,नीट,सीईटी चे पेपर फोडतो,दहावी-बारावीचा काय घेऊन बसलाय अशी दमबाजी करणारे अकॅडमी चे मालक छाती ठोकून सांगतात.पण बोर्डाचे पेपर, बोर्डाचा सदस्य सामील असल्याशिवाय कसं काय या लोकांपर्यंत येऊ शकतो? व हा गद्दार कोण जो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतो? म्हणूनच का बोर्डाचे सदस्य बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमीच्या मोठमोठ्या सेमिनारला पैसे घेऊन हजेरी लावतात व विद्यार्थ्यांना शाळेत न शिकता अकॅडमीत ऍडमिशन घ्या असे आवाहन करतात.याचा तपास शिक्षण विभाग कधी घेणार व ह्या चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यावर कधी लगाम घालणार? तसेच जे शिक्षक वर्गात येऊन ऑब्जेक्टिव्ह चे उत्तर सांगतात त्यांच्यावर कधी गुन्हे दाखल होणार? असा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.*
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub

👍
1