
Ashwini Temkar ( Durafe ) 🙏
February 15, 2025 at 05:15 AM
✍️ *कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता दुसऱ्याला सांगणे हे ज्याला जमले त्याला आयुष्य जगायचं जमले कारण समोरच्यावर चिडण खूप सोप्प आहे परंतु त्याच मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढेच अवघड स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे त्यामुळे सर्वात पहिले स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी रहा तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ नव्व्याण्णव टक्के हरलात असा भ्रम काढून टाका एक प्याद सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकत फक्त धाडस सोडू नका आयुष्यात काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य आपलं मन हलकं करायचं असेल तर भावना समजणारी माणसं हवी असतात समोरचा चुकतोय हे कोणालाही कळत ते सोपं आहे पण आपण स्वतः कुठे चुकत आहोत हे समजायला आणि पचवायलाही आपले मन तितकेच समजूतदार आणि मोठं असावं लागतं खोटं बोलणे खोटं वागणं हे क्रिडिट कार्डा सारखं असते आज वापरताना आनंद मिळतो पण कालांतराने त्यांची कींमत चुकवावीच लागते कोणाचे मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता येणार नाही आपणच गोत्यात येऊ शकतो हेच सत्य आहे त्याकरीता नेहमीच सत्याची कास धरावी पश्चात्ताप करायची पाळीच येणार नाही मन किती मोठे आहे हे महत्त्वाचे नाही मनात अपूलकीपणा किती आहे हे महत्त्वाचे हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा काहीच उपयोग नाही राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथे आपलं कोणी तरी असतं भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु अभ्यास चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहीजे जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे आणि यालाच सर्वात जास्त वेळ लागतो लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं आहे ऐकताना बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानेच ऐकतात समाधान हे नेहमी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची पूर्तता नसते तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव आहे पेरणीच्या हंगामात माणसं एखाद दुसरी येतात तर कापणीच्या हंगामात घोळक्याने येतात मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कुणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा आपल्या सुखाची क्षितिज इतरांच्या नजरेत भलेही सीमित असतील पण स्वतःच्या नजरेत त्याला सीमा नसावी तूमचे विचार तुम्हाला काय हवयं ते सांगतात आणि तुमची कृती तुम्ही काय मिळवणार आहात ते ठरवते जगात येतांना आपणाकडे देह असतो नाव नाही जग सोडतांना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य कधी तरी स्वतःच्याच माणसांकडून दुखावलेलं एकटं मन तुम्हाला कुठे भरकटत घेऊन जाईल काही सांगता येत नाही याच काळात स्वतःला सावरले तर ठीक नाही तर आयुष्याच्या बऱ्याच चुका ह्या एकटेपणात होतात ठराविक वेळेत मिळालेले जिव्हाळ्याचे दोन शब्द पण एखाद्या व्यक्तीला तुमच्या जवळ आणू शकतात ते जिव्हाळ्याचे दोन शब्द आपल्याला आपलं माणूस विसरायला लावून नवीन अनोळख्या व्यक्तीकडे ओढत नेतं म्हणून एकटेपणात स्वतःला जरा सावरायचं मनाला जरा थोडंसं आवरायचं शांत करायचं थोडं मन अन मग काय ते ठरवायचं कारण आयुष्यात प्रत्येक चुकीला माफी मिळेलच असे नाही मेंदूने तर्कशुद्ध विचार न करता निव्वळ भावनेनं विचार करणंही निरक्षरतेचं लक्षण असतं जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहतो सोबत राहणारा तुमचा स्वभाव आणि माणूसकी जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात लहानपणी वाटायचे परीक्षा फक्त शाळेतच असतात आज समजलं आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात वाईट दिवस अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही कर्ण कृष्णाला विचारतो माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले कारण मी अनौरस संतती होतो यात माझी काय चूक होती मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं कारण मी क्षत्रिय नव्हतो परशुरामांनी मला विद्या दिली पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल कारण मी क्षत्रिय नव्हतो एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले कृष्णाने उत्तर दिले कर्णा माझा जन्म कारागृहात झाला जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले तुम्ही तलवारी रथघोडे धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात मला गौशाला शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले ना कोणती सेना ना शिक्षण मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही सांदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी सोळा वर्षाचा होतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केल माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी द्वारका वसवावे लागले मला पळपुटा रणछोडदास म्हणतात जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष एक गोष्ट लक्षात घे कर्णा प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण परंतु काय योग्य धर्म आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले तरीही त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे तक्रारी थांबव कर्णा आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही म्हणून तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा स्वाध्यायी व्हा भगवतांचे नामस्मरण करा कृतज्ञता व्यक्त करा चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद पायातून काटा निघाला की चालायला मजा येते तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे.जेवढा वेळ तुम्ही संयम ठेऊन काम कराल तेवढेच यश ही मोठेचं असते कुणाला दुखावून मिळविलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो संगत कधी राजाची करू नका कधी आपल्याला नोकर बनवून ठेवील माहीत नाही पण संगत संतांची जरुर करा कधी देवाची भेट घालून देतील सांगू शकत नाही मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते आयुष्यात कधीही स्वतःवर विश्वास ठेवा कारण आपण ताकदवान बनत असतो आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोर जिथे नव्याने अंकुरण्याची जिद्द जन्म घेते तिथे यशाचा मोहोर फुलतोच निसर्गासारखा शिक्षक नाही केवळ निरीक्षण हे मोठे शिक्षण आहे वाऱ्याच्या धुंदीसारखं मुक्तपणाने जगणारे प्राणी सुख नावाची अदृश्य गोष्ट खूप लुटतात कोणत्या वयात शिकावं कोणत्या वयात कमवावं हे शौक नाही परिस्थिती ठरवते समाधान असेल तरच पैसा सुख देतो नाही तर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो लहान मूलं मातीच्या गोळ्यासारखी असतात पालक जसे त्यांना आकार देतील तसे ते घडत असतात जीवनाची प्रत्येक सकाळ अशी जगा की आपण नसल्याने प्रत्येकाच्या मनात आपली ओळख काही तरी सांगून जाणारी ठरली पाहिजे आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का आंधळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबविता आले पाहिजेत प्रत्येक शर्यत जिंकण्याआधी कठीणच असते तुम्ही फक्त हार मानू नका ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही मोठे निर्णय घेताना भिती वाटणे चुकीचे नाही परंतु भितीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाच वाढलं तर दान✍️*
*👏विचारधन परिवर्तन👏*
*ॲड.श्री. कैलासराव विश्वनाथ पठारे पाटील.*
*अध्यक्ष महाराष्ट्र राज्य: लिगल विंग A I J.*
*ॲड. सौरभ कैलासराव पठारे पाटील*
*ॲड. संदेश कैलासराव पठारे पाटील.*
*🙏शुभ रात्री 🙏*