
Office of Sanjay Rathod
February 28, 2025 at 03:34 AM
अभिमानास्पद! कौतुकास्पद...
१०० दिवसीय नियोजन आराखड्यातील मुल्यमापनाच्या प्रगती पुस्तकात आपला मृद व जलसंधारण विभाग द्वितीय क्रमांकांने पास झाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन!
मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीत मृद व जलसंधारण विभागाने आतापर्यंतच्या कामांचे सादरीकरण केले. यावेळी शासनाच्या १५ विभागांचे त्यांच्या कार्यालयीन संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, AI चा वापर, नावीन्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात आपल्या नेतृत्वाखालील मृद व जलसंधारण विभागास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
राज्यातील शेतकरी बांधव समृध्द आणि आनंदी व्हावा यासाठी शेतीसाठी मुबलक व संरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपला विभाग कटिबध्द आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पाझर तलाव, साठवण तलाव, बंधारे, सिमेंट नालाबांध याची कामे सुरू असून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
राज्य, विभाग व जिल्हास्तरीय प्रशासन लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो. १६ एप्रिल २०२५ पर्यंत ही विशेष मोहीम सुरू असून अधिक व्यापक व प्रभावीपणे काम करावे यासाठी शुभेच्छा देतो.
👍
1