Makarand Narwekar
Makarand Narwekar
May 24, 2025 at 09:47 AM
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सेनेने दिलेले प्रत्युत्तर केवळ लष्करी नव्हते, तर ते आपल्या देशाच्या अस्मितेचं रक्षण होतं. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाच दहशतवादी तळ उदध्वस्त करत भारतीय सेनेने शौर्याचा नवा अध्याय लिहिला. या वीरतेचा गौरव करण्यासाठी आज देशभर तिरंगा यात्रा निघत आहेत. मुंबईतील कुलाबा येथून शिवशक्ती नगरपर्यंत काढलेली तिरंगा यात्रा हा जनतेचा आपल्या सेनेप्रती असलेला स्नेह आणि आदर दाखवत होता. ‘वंदे मातरम्’ च्या गजरात, झेंड्यांच्या लाटा हवेत झेपावत होत्या, आणि प्रत्येकाचे हृदय भारतमातेच्या प्रेमाने भरून आलं होतं. हे त्या वाईट शक्तींना सांगण्याचं ठाम उत्तर आहे , आम्ही सारे भारतीय एक आहोत आणि आपल्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर जी, माजी नगरसेविका श्रीमती. हर्षिता नार्वेकर जी देखील उपस्थित होते. #powertopeople #tirangayatra

Comments