
Social Reformer
19 subscribers
About Social Reformer
*Social Reforms, Latest News, Creating Public Awareness & Spreading Truth*
Similar Channels
Swipe to see more
Posts

*डॉक्टर,इंजिनीयर बनवणारी फॅक्टरी आणि माझं मूल*- भाग 2 © डॉ सचिन साळवे Psychologist, Certified Parenting coach JEE/NEET साठी सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मोठ्या शहरात,नावाजलेल्या क्लाससाठी मुलांना आपण आशेने पाठवतो पण त्याचा विपरीत परिणाम काही मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो,तसे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याची चर्चा आपण करत आहोत, *मागील भागात आपण बघितले की मुलांची स्वतःची आवड आणि इच्छा असणे हे महत्वाचे आहे.* *आपल्या आवडीची stream निवडणे आणि त्याच्या तयारी साठी दुसऱ्या मोठ्या शहरात क्लासेस निवडण्याच्या निर्णयात मुलांचा सहभाग असावा,हे त्या लेखात आपण बघितले.* पालक व मुलांच्या संगनमताने हा निर्णय घेतला जातो.त्यासाठी शहर,क्लास व राहण्याची सोय इ. सर्व काही फिक्स केले जाते. हे सर्व जुळून येते आणि आतापर्यंत पालकांच्या पंखाखाली असलेले ते मूल अगदी आनंदात स्वतःचे पंख पसरायला तयार होते. काही दिवस,महिने व्यवस्थित जातात आणि मग हळूहळू एकएक अडचणी व चॅलेंजेस समोर यायला लागतात. अशावेळी *कोणासाठी कोणती अडचण ही डोंगराएवढी असेल हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असते.* मुलांशी बोलताना आलेल्या अनुभवातून त्यांना येणारे काही कॉमन प्रोब्लेम्स किंवा चॅलेंजेस, * घरची आठवण,जेवणाचे हाल,नवीन वातावरण या सगळ्याशी जुळवून घेताना होणारी दमछाक. * पहिल्यांदाच रूमवर राहण्याची वेळ आल्याने त्यासाठी करावे लागणाऱ्या ऍडजस्टमेंट्स. * रूम पार्टनर कसे मिळतात आणि आपण त्यांच्याशी कसे जुळवून घेतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. * तीनही विषय एकच ठिकाणी असल्याने एखाद्या विषयाचे शिक्षकांचे शिकवणे समजत नाही.एखादे शिक्षक चांगले शिकवतात पण ते मध्येच क्लास सोडून जातात. * *पहिल्यांदाच मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यात स्मार्ट फोन हातात आल्याने बराच वेळ वाया जातो.अभ्यासातील ग्रीप सुटत जाते आणि नंतर पश्चाताप होतो आणि त्याचेही टेन्शन यायला लागते.* या सगळ्यांमधून पुढे गेल्यानंतर मग.. सुरुवातीचे काही दिवस अभ्यास सोपा वाटत असतो आणि सुरुवातीच्या काही टेस्टस मध्ये मार्क्स पण चांगले पडत असतात. काही महिन्यानंतर अभ्यासही अवघड होत जातो आणि मार्क्स ही कमी पडायला लागतात. *इथेच बऱ्याच मुलांना अचानक लक्षात येते की ' डॉ/इंजिनीयर ही माझी आवडच नाही '* हे खरेही असू शकते किंवा escapism (पलायनवाद) असू शकतो. इथे बरेच जण हे सगळं सोडून घरी परत येण्याच्या मानसिकतेत असतात. त्यातून काही पुढे जातात पण त्यांचाही बराच काळ स्ट्रगल चालू राहतो.. *स्पर्धेत टिकून राहण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा.* *Comparison & Competition* आता पर्यंत हुशार विद्यार्थी म्हणून आपल्या होमग्राऊंडवर एक ओळख बनलेली असते.पण आता या हुशार विद्यार्थ्याच्या आजुबाजूला त्याच्यापेक्षा जास्त हुशार असलेले हजारो विद्यार्थी असतात आणि त्यात परत CBSE , फाउंडेशन कोर्से केलेले विद्यार्थी वेगळेच आणि इथे *आपण या स्पर्धेमध्ये खूप कमी किंवा मागे आहोत या भावनेने आत्मविश्वासावर पहिला घाव पडतो.* मनाची तयारी करून आपले मूल दिवसरात्र एक करून या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न सुरू करते.ही दोन वर्षे या मुलांसाठी खूप जास्त प्रमाणात आव्हानात्मक, तणावाची आणि भावनिक ups & down असणारी असतात. *काही क्लासेस मध्ये टेस्टच्या मार्कांवरून स्पेशल बॅचेस केल्या जातात,त्या विशिष्ठ बॅच मध्ये टिकून राहण्याचा तणाव हा वेगळाच असतो* अशा वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेताना मुलांची दमछाक होते.स्पर्धेत टिकून राहताना बरीच कसरत करावी लागते.*वेळोवेळी मार्कांवरून आपली तुलना होत असते आणि स्वतःकडूनही केली जाते,त्यामुळे मानसिक खच्चीकरण व्हायला लागते* आपले ध्येय असाध्य वाटायला लागते आणि ही भावनिक अस्थिरता वेळीच सांभाळता आली नाही तर मुलं चिंतातुर होतात किंवा उदासीन होत जातात,मग काही give up करतात. अशा खोल मानसिक गर्तेत आपल्या मुलांना जावू न देणे यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो. * आपल्या मुलांची बौद्धिक व भावनिक क्षमता ओळखणे,त्यानुसार त्याला या मोठ्या शहरात पाठवायचे की नाही हे ठरवावे. * क्लासेससाठी लाखो रुपये खर्च करणार असतो,त्याआधी त्याची मानसशास्त्र पदवी असलेल्या कौन्सेलर मार्फत Career Guidance test करून घेणे.यांमध्ये ॲप्टिट्यूड,इंटरेस्ट व पर्सनॅलिटी या टेस्ट्स असतील तर पुढील संभाव्य अडचणी येणार नाहीत. * शक्य असेल तर पालकांपैकी कोणीतरी मुलांबरोबर रहावे,नसेल तर सुरुवातीपासून त्यांचे एक्स्पर्ट कडून कौन्सेलिंग करावे. * मुलाबरोबर राहणार असेल तर त्याला वारंवार त्याचे दडपण येईल असे बोलू नये.त्यांच्या बरोबर आधारासाठी थांबायचे आहे,प्रेशर देण्यासाठी नाही. * ''मी सगळं सोडून तुझ्याबरोबर राहत आहे,चांगले मार्क पडायलाच पाहिजे" किंवा " नाहीं पडले तर लोक काय म्हणतील" ,कृपया असे टेन्शन स्वतः घेऊ नये व मुलांनाही देवू नये. * पालकांव्यतिरिक्त असा एखादा कौन्सेलर किंवा एखादी व्यक्ती असावी (परिपक्व) ज्याच्याबरोबर मुलांचा छान संबंध/संवाद असेल. व त्यांच्याशी नियमित संवाद करायला सांगावे. * मुलांना भावनिक आधार द्यावा पण त्यांना त्यासाठी परावलंबी बनवू नये. * या सर्व काळात स्ट्रेस येणारच नाही असे शक्य नाही पण स्ट्रेस मॅनेजमेंट शिकविल्यास मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम तर होईलच पण त्याचा परफॉर्मन्स सुधारेल आणि प्रोग्रेसही होईल. (गेल्या अनेक वर्षात 12वी नंतर मानसिक खच्चीकरण झालेली,तणावात असलेली, Anxiety, Depression मध्ये गेलेली बरेच विद्यार्थी कौन्सेलिंगसाठी येत आहेत.या अवस्थेत जाण्याआधी आपण त्यांना मदत करू शकतो.कौन्सेलिंग हे प्रॉब्लेम आल्यावरच करावे असे नसते त्याचा उपयोग प्रॉब्लेम येऊ नये म्हणूनही आपण करू शकतो.अनेक वर्षांच्या अनुभवातून 11,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कौन्सेलिंग प्रोग्राम तयार केलेला आहे.ऑनलाइन सेशन सुद्धा घेवू शकतो.) धन्यवाद. मनरंग कौन्सेलिंग सेंटर भाग 1 वाचण्यासाठी खालील लिंक पहावी. https://www.facebook.com/share/p/1Ff7FfqPRi/

*नव्या नंबर प्लेट सक्तीतली शेकडो कोटींची लुटमार संतापजनक* *राज्यभरातील नागरिकांना आता अजुन एका उठाठेवीला सामोरे जावे लागणार आहे. एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता ' हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' लावणे सक्तिचे करण्यात आले आहे. शिवाय फास्ट टॅग च्या नियमातही बदल होवू घातला आहे. पॅन कार्डही बदल होवू पाहात आहे. खरे म्हणजे गेल्या काही वर्षांपासून भारतातील नागरिकांना 'आपला जन्म नेमका कशासाठी झाला आहे?' याबाबत प्रश्न पडावा इतक्या वेळा, सतत हे कार्ड काढा ते कार्ड काढा. पुन्हा नियम बदलले. पुन्हा नव्याने हे कार्ड काढा ते कार्ड काढा. याला अपडेट करा, त्याला अपडेट करा. याची केवायसी करा - त्याची केवायसी करा. गल्लीतही हेल्मेट घाला - खड्ड्यांचे विचारू नका. गाडी घेताना १५ वर्षांचा रोड टॅक्स आगावू भरा - वरून रोड टोल टॅक्सही भरा. पुन्हा पेट्रोल मध्ये मुळ रकमेच्या दुप्पट कर भरा. नियमित दरवर्षी वाढणारा टोल टॅक्स भरत रहा. रस्त्याचे हाल बोलू नका. जुने वीज मीटर काढा - नवे प्रिपेड मीटर बसवा. दणकेबाज मालमत्ता कर भरा - नागरी सुविधांचे विचारू नका. बँकेचेच व्यवहार करा. बँकेचे हे नियम बदलले - ते नियम बदलले. पुन्हा ते नियम बदलले. अजन पुन्हा नियम बदलले. अजुन नियम बदलणार आहेत. बदलांची नुसती मालिकाच मालीका. बँकेच्या चुकीने चेक परत गेला, तरी दंड लागेल. दंडावरही जीएसटी लागेल. आधार मय जिंदगी झाली आहे. हे आधार काढा - पुन्हा ते आधार काढा. हे आधार चालेल ते आधार चालणार नाही. जीएसटी यावर लागेल - त्यावरही लागेल. या टक्क्याने लागेल त्या टक्क्याने लागेल. प्रत्येक ठिकाणी प्रतिज्ञा पत्र द्या ! त्यासाठी शंभरचा स्टॅम्प बंद! पाचशेचा घ्या! पूर्वी मरण स्वस्त होते.* आता मरणही महाग झाले आहे. सिरियस तब्येत आहे - आयसीयुत आहेत. औषधे घेता - उपकरणे लावता - जीएसटी भरा. मृत्यू पावले. अत्यं संस्कार करायचाय - त्यासाठी लागणाऱ्या वस्तुंवर जीएसटी भरा. वैतागुन आता गमतीने लोक म्हणू लागलेत, की "भविष्यात जी एसटी कौन्सिल गाजलेल्या दोन हजारच्या नोटे सारखी एक डिजिटल सेन्सर चीप विकसित करेल. प्रत्येकाच्या शरिरात ती इम्प्लांट केली जाईल. तिची किंमत लागेल. त्यावरही जीएसटी लागेल. त्यानंतर कोणी किती श्वास घेतला, किती मलमुत्र विसर्जन केले. किती अपान वायू विसर्जित केला. याचे मोजमाप त्या चिपमधील सेन्सर द्वारे होईल. त्यावरही जीएसटी आकारला जाईल. तेवढेच आता शिल्लक राहिले आहे. या जीएसटी दरात तरी सवलत द्यावी, म्हणून नागरिक तेव्हा आंदोलने करतील. जीएसटी कौन्सिल 'मग उदार होवून २८ ऐवजी १८ किंवा १२ टक्के हा सवलतीचा दर जाहिर करेल. त्या सवलतीचा तेव्हाच्या राजकीय पक्षास निवडूकित लाभ होईल! " काय बेशर्मी लावली आहे. *भारत हा अलिकडे 'टॅक्स टेररिझम ' साठी जगभरात ओळखला जावू लागला आहे. प्रत्येक नागरिक झेरॉक्सवर झेरॉक्स काढण्यासाठीच जन्मला आहे काय? इतक्या झेरॉक्स त्याला पदोपदी काढाव्या लागतात. काही दिवसांनी " पावला पावलावर बदलणारे नियम आणि नव नवे कार्ड - अपडेट व पावलो पावली केवायसी साठी अवघा जन्म आपुला!* असे एखादे भजन अस्तित्वात आले तर आश्चर्य वाटायला नको. मध्येच राजकारण्यांचे लागे बांधेवाले ठेकेदार पोसण्यासाठी नवनवीन क्ल्युत्या शोधून काढल्या जातात. नागरिकांच्या खिशातून मग शेकडो कोटी रुपये खेचून घेतले जातात. पुन्हा त्यावर जीएसटी आहेच! अशीच एक नवीन टूम सध्या काढण्यात आली आहे. एकाही नागरिकाची मागणी नव्हती, परंतु लादली स्कीम. होणार शेकडो कोटींची कमाई. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता ३१ मार्च पर्यंत हाय सिक्यूरिटी नंबर प्लेट लावावी लागणार आहे. गंमत म्हणजे महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे यासाठी देशात सर्वाधिक दर असणाऱ्या तीन संस्थांना ही फ्रँचायझी देण्यात आली आहे. खरे म्हणजे खुल्या स्पर्धात्मक वातावरणात होवू द्या ना दराबाबत स्पर्धा! यात कशाला हवी मोनोपॉली? पण नाही! मोठमोठे डील असेच ठरतात! कुणीतरी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करावयास पाहिजे. या फ्रॅन्चाईजींना इतर राज्यापेक्षा कितीतरी अधिकचे दर मंजुर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गरीब - मध्यम वर्गीयांच्या दुचाकीची नंबरप्लेटची किंमत ४५० रुपये मंजुर केली आहे, तिच गुजरात मध्ये १६० रुपये, गोव्यात १५५ रुपये, पंजाबात २०० रुपये, आंध्रात २४५ रुपये आहे. गुजरात मध्ये जी नंबर प्लेट १६० रुपयात (ही सुद्धा अधिक आहे) देणे परवडते, ती महाराष्ट्रात तब्बल ४५० रुपयांना कां? कुणी मंजुर केले हे दर? किती मोठे डिल झाले? हातावर पोट असणाऱ्या गरीब रिक्षा चालकांच्या तीन चाकी वाहनास महाराष्ट्रात नंबर प्लेट मिळेल ५०० रुपयांना.तिच नंबर प्लेट गुजरात मध्ये २०० रुपयांना, गोव्यात १५५ रुपयांना, पंजाबात २७० रुपयांना, आंध्रात २८२ रुपयांना आहे. मोटार कारची नंबरप्लेट महाराष्ट्रात मिळेल तब्बल ७४५ रुपयांना. तिच नंबर प्लेट गुजरातमध्ये आहे ४६० रुपयांना, गोव्यात आहे २०३ रुपयांना, पंजाबात आहे ५९४ रुपयांना, आंध्रात आहे ६१९ रुपयांना, ट्रक वगैरे व्यावसायिक वाहनांना महाराष्ट्रात ही नंबरप्लेट मिळेल ७४५ रुपयांना. तिच नंबरप्लेट गुजरात मध्ये आहे ४८० रुपयांना, गोव्यात आहे २३२ रुपयांना, पंजाबात आहे ६३४ रुपयांना, आंध्रात आहे ६४९ रुपयांना. किती ही तफावत! कुठे आहे वन नेशन वन टॅक्स! याबाबत कंत्राटामध्ये संपूर्ण कामाची रक्कम ६०० कोटी दाखविण्यात आली आहे. परंतु रजिस्टर्ड वाहनांची संख्या पाहता, हे प्रकरण दीड हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे जनमंच संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी म्हटले आहे. या दीड हजार कोटीतून कुणाच्या वाट्याला काय - काय येणार आहे, हा संशोधनाचा भाग ठरेल. हा राज्याचा विषय आहे. मात्र केंद्रिय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी हे तर मोठे बोलबच्चन मंत्री म्हणून देशभरात गाजत असतात. "कमाई करूनही नबंर प्लेटचे जे दर गुजरातला परवडतात, ते महाराष्ट्राला कां नाही? " असा जाहीर प्रश्न करून त्यांनी महाराष्ट्राच्या महाभ्रष्ट्र परिवहन विभागाला सुतासारखे सरळ केले पाहिजे होते. महाराष्ट्रात वाहन रजिस्ट्रेशन ते चेकपोस्ट पर्यंत वाहन धारकांचे सर्व स्तरावर शोषण आणि शोषण करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. त्यामुळे वैतागलेला एखादा वाहन धारक हाती हंटर घेवू शकतो. असे म्हटले जाते. कृपया कुणीही या प्रकारे हाती हंटर घेवू नये! असेच कुणीही ' नियमपाळू ' नागरिक म्हणेल. पण कोणत्याही शोषणाला सहन करण्याची - संयमाची एक मर्यादा असते. ही बाबही नाकारून चालणारी नाही! (सोशल मीडिया साभार) संकलन - सचिन गोडांबे

*तुम मूर्ख राष्ट्रपती हो - ट्रम्प ने झेलेन्सकी को व्हाईट हाऊस मै मीडिया के सामने सुनाया* https://youtu.be/do1HcDHx3FM *Like, Comment, Share & Subscribe to the Channel*

#मर्द_को_दर्द_होता_है #पुरुषसत्ताक_व्यवस्थेचे_पुरुषांवरील_अन्याय मी नेहमी स्त्रीविषयक लिहिते.खुपदा काही मित्रांनी मागणी केली आमच्याबद्दल कसं काहीच लिहीत नाहीस.म्हणून आज त्यांच्या बद्दल..... आपण स्त्री कशी घडली आणि तिच्या काय अडचणी आहेत हे नेहमी वाचतो ,ऐकतो .स्त्री पण स्त्रिवरच्या अन्यायाबद्दल बोलते आणि पुरुष पण स्त्री वरच्या अन्यायाबद्दल कारण तो एक पीडित, शोषित घटक आहे . लग्नासाठी स्त्री असलेल्या घटका बद्दल आपण बरच बोललो . जसं पुरुषाने स्त्री समजून घेतली पाहिजे तसं स्त्री ने पण पुरुष समजून घेतला पाहिजे . पुरुषसत्ताक व्यवस्थेचा फटका फक्त स्त्रीला बसला असे नाही तो पुरुषांना ही बसला आहे.#कमला_भसीन म्हणायच्या पुरुषसत्ताक चा विरुद्धअर्थी स्त्रीसत्ताक नाही ,कारण नंतर उलट अन्याय सुरु होईल त्यामुळे पुरुषसत्ताकच उलट काय असेल तर बराबरी(स्त्री-पुरुष समानता). त्यामुळे ही बरोबरी येत नाही तोपर्यन्त दोघेही त्रासातुन जाणार. मुलगा जन्मला की जेवढा आनंद ,तेवढीच नंतर त्याच्याकडून अपेक्षा . 1. तो घाबरला नाही पाहिजे .अंधार असेल तर न घाबरता त्याने छातीपुढे काढून चालले पाहिजे. 2. साप,बैल,माकड कोणतेही प्राणी त्रास देत असतील तर ताबडतोब पुरुषांना पाचारण केले जाते.घरातली पुरुष मंडळी बाहेर गेली असेल तर शेजारची मंडळी बोलवायची. वरुन पुरुषासारखा पुरुष असून काय घाबरतो. भीती वाटणे ही नैसर्गिक गोष्टच आपण त्यांना नकारतो. 3. नृत्य वगैरे क्षेत्रात असेल तर लगेच छक्का ( मला यांचा अपमान करायचा नाही) म्हणून चिडवणे सुरु.इकडे ग्रामीण भागात तर आहेच. 4.त्याची स्वयंपाक घरातील एंट्री म्हणजे बायकांना त्यांचा आणि स्वतःचा अपमान वाटतो.आपण वंचित ठेवतो त्यांना.त्यांनी अचारी किंवा शेफ म्हणून मोठ्या हॉटेल मध्ये काम करावे.पण घरी केले की दर्जा घसरला. 5. त्यातल्या त्यात पुरुषाने झाड़ू मारताना,मुलांची शी शु काढताना शेजारणीने बघावे . तिला गॉसिपिंगला विषय आणि गृहिणीचा तीळपापड.आपण स्वतःच त्यांना लांब ठेवायचे आणि त्यांचे काळीज कठीण आहे म्हणायचे. 6.मासिक पाळीविषयी बहुतांश पुरुषांना लग्नानंतर माहित होते. आपण कसलीच कल्पना न देता आपल्याला त्याकाळात त्यांनी समजून घ्यावे ही अपेक्षा करतो.हे बायकांच आहे तुला नाही कळणार म्हणून कित्येक ठिकाणाहुन त्याला हुसकुन लावतो उदा. बाळंतखोली. त्यामुळे सर्वप्रथम या गोष्टींची कल्पना पुरुषांना द्यायला सुरुवात करावी. 7.रडणारा पुरुष कमकुवत समजला जातो,समाजा कडून चेष्टेचा विषय होतो. जणू काही निसर्गाने बायकांनाच तो अधिकार दिला आहे. सतत भावना दडपुन जगायची त्याच्यावर बळजबरी होते. भावना व्यक्त करणारा संवेदनशील पुरुषांची टर उडवली जाते. परिणामी हार्ट अटॅकच प्रमाण पुरुषांच जास्त आहे. 8.कमाई घरात पुरुषांचीच हवी असते.स्त्री साठी आजही पैसा कमावणं ऐच्छिक आहे. ती सक्ती एवढी आहे की आत्महत्याच प्रमाण वाढत आहे.कमावावं नक्कीच प्रत्येक व्यक्तिने. पण जबाबदारी स्त्रीवर पण तेवढीच हवी. 9.मुलांचे एडमिशन, गॅस बुक करणे, बँकेचे हफ्ते किंवा तत्सम कामे, इंव्हेस्टमेंटचे निर्णय ,घर बांधणे किंवा विकत घेण्यासंबन्धी कागदपत्र, हॉस्पिटल ही कामं पुरुषांनीच केली पाहिजेत. मग स्त्री फक्त गृहिणी असेल तरी ती हे काम टाळणार .नवऱ्याने मात्र नोकरी ,व्यवसाय संभाळत हे केले पहिजेच. 10.‘मर्द को दर्द होता है।’ हेच आपण विसरून जातो. बाहेरच्या जगात तोंड देता देता तो किती जखमी होतो हे आपल्याला मान्य नसते. त्याला त्याचे काहीच वाटत नाही. 4 ठिकाणी अपयश आले अपमान झाला तरी त्याच्या मनावर काहीच परिणाम होत नाही असे स्त्रीला वाटते. 11.कुटुंबाची सुरक्षितता,प्रतिष्ठा ,मुलांना स्वावलंबी बनवणे ह्या त्याच्या दुःखऱ्या नसा किंवा त्याच्या मानेवरील कायमस्वरूपी जोखड असते. 12. समाजातील,व्यवसायातील स्पर्धा ,कुटुंबातील लोकांच्या मागण्या आणि हे पूर्ण न करू शकल्यास वाट्याला आलेली अवहेलना . 13.महिलांनी /मुलींनी परपुरूष म्हणून एखादा वाईट अनुभव आल्यानंतर सर्व पुरुषांना संशयित नजरेने पाहणे हे बेचैन करतं पुरुषांना. 14.सगळ्यात महत्वाचं त्याच्या प्रेमाला नेहमी वासनेचं लेबल लावलं जातं. 15. सगळ्यात महत्वाचं स्त्रियांना असं वाटतं सेक्स मध्ये आपण पुरुषांना देतो .फक्त पुरुषांना ते हवं असतं आणि आपण ते त्यांना देतो त्यामुळे यावर त्याला त्याचे सतत भांडवल करून सतत नकार देणे ,उपकार केला असे दाखवणे ,त्याची ढाल करून ,भांडवल करून वेगवेगळी मागणी करणे ,त्यावरून त्याला टोचून बोलणे. 16.आर्थिक दृष्ट्या त्याने सतत मागणी पुरवत राहिला तर तो खरा पुरुष असाच समज असतो त्यामुळे सतत संसार मोडणे ,घर सोडून जाण्याची धमकी देणे त्याच्यावर स्ट्रेस आणते. 17.मुलं मोठी करणे फक्त आईची जबाबदारी त्यामुळे मुलांना बापाविरुद्ध उभे करणे तिला सोपे जाते. चला पुरुष समजून घेवुया.जबाबदारी वाटून घेण्यात पाऊल पुढे टाकुया. आखिर #मर्द_को_दर्द_होता_है ©️ #प्राजक्ता_पाटील