Social Reformer
Social Reformer
February 23, 2025 at 04:28 PM
*डॉक्टर,इंजिनीयर बनवणारी फॅक्टरी आणि माझं मूल*- भाग 2 © डॉ सचिन साळवे Psychologist, Certified Parenting coach JEE/NEET साठी सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मोठ्या शहरात,नावाजलेल्या क्लाससाठी मुलांना आपण आशेने पाठवतो पण त्याचा विपरीत परिणाम काही मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो,तसे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याची चर्चा आपण करत आहोत, *मागील भागात आपण बघितले की मुलांची स्वतःची आवड आणि इच्छा असणे हे महत्वाचे आहे.* *आपल्या आवडीची stream निवडणे आणि त्याच्या तयारी साठी दुसऱ्या मोठ्या शहरात क्लासेस निवडण्याच्या निर्णयात मुलांचा सहभाग असावा,हे त्या लेखात आपण बघितले.* पालक व मुलांच्या संगनमताने हा निर्णय घेतला जातो.त्यासाठी शहर,क्लास व राहण्याची सोय इ. सर्व काही फिक्स केले जाते. हे सर्व जुळून येते आणि आतापर्यंत पालकांच्या पंखाखाली असलेले ते मूल अगदी आनंदात स्वतःचे पंख पसरायला तयार होते. काही दिवस,महिने व्यवस्थित जातात आणि मग हळूहळू एकएक अडचणी व चॅलेंजेस समोर यायला लागतात. अशावेळी *कोणासाठी कोणती अडचण ही डोंगराएवढी असेल हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असते.* मुलांशी बोलताना आलेल्या अनुभवातून त्यांना येणारे काही कॉमन प्रोब्लेम्स किंवा चॅलेंजेस, * घरची आठवण,जेवणाचे हाल,नवीन वातावरण या सगळ्याशी जुळवून घेताना होणारी दमछाक. * पहिल्यांदाच रूमवर राहण्याची वेळ आल्याने त्यासाठी करावे लागणाऱ्या ऍडजस्टमेंट्स. * रूम पार्टनर कसे मिळतात आणि आपण त्यांच्याशी कसे जुळवून घेतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. * तीनही विषय एकच ठिकाणी असल्याने एखाद्या विषयाचे शिक्षकांचे शिकवणे समजत नाही.एखादे शिक्षक चांगले शिकवतात पण ते मध्येच क्लास सोडून जातात. * *पहिल्यांदाच मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यात स्मार्ट फोन हातात आल्याने बराच वेळ वाया जातो.अभ्यासातील ग्रीप सुटत जाते आणि नंतर पश्चाताप होतो आणि त्याचेही टेन्शन यायला लागते.* या सगळ्यांमधून पुढे गेल्यानंतर मग.. सुरुवातीचे काही दिवस अभ्यास सोपा वाटत असतो आणि सुरुवातीच्या काही टेस्टस मध्ये मार्क्स पण चांगले पडत असतात. काही महिन्यानंतर अभ्यासही अवघड होत जातो आणि मार्क्स ही कमी पडायला लागतात. *इथेच बऱ्याच मुलांना अचानक लक्षात येते की ' डॉ/इंजिनीयर ही माझी आवडच नाही '* हे खरेही असू शकते किंवा escapism (पलायनवाद) असू शकतो. इथे बरेच जण हे सगळं सोडून घरी परत येण्याच्या मानसिकतेत असतात. त्यातून काही पुढे जातात पण त्यांचाही बराच काळ स्ट्रगल चालू राहतो.. *स्पर्धेत टिकून राहण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा.* *Comparison & Competition* आता पर्यंत हुशार विद्यार्थी म्हणून आपल्या होमग्राऊंडवर एक ओळख बनलेली असते.पण आता या हुशार विद्यार्थ्याच्या आजुबाजूला त्याच्यापेक्षा जास्त हुशार असलेले हजारो विद्यार्थी असतात आणि त्यात परत CBSE , फाउंडेशन कोर्से केलेले विद्यार्थी वेगळेच आणि इथे *आपण या स्पर्धेमध्ये खूप कमी किंवा मागे आहोत या भावनेने आत्मविश्वासावर पहिला घाव पडतो.* मनाची तयारी करून आपले मूल दिवसरात्र एक करून या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न सुरू करते.ही दोन वर्षे या मुलांसाठी खूप जास्त प्रमाणात आव्हानात्मक, तणावाची आणि भावनिक ups & down असणारी असतात. *काही क्लासेस मध्ये टेस्टच्या मार्कांवरून स्पेशल बॅचेस केल्या जातात,त्या विशिष्ठ बॅच मध्ये टिकून राहण्याचा तणाव हा वेगळाच असतो* अशा वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेताना मुलांची दमछाक होते.स्पर्धेत टिकून राहताना बरीच कसरत करावी लागते.*वेळोवेळी मार्कांवरून आपली तुलना होत असते आणि स्वतःकडूनही केली जाते,त्यामुळे मानसिक खच्चीकरण व्हायला लागते* आपले ध्येय असाध्य वाटायला लागते आणि ही भावनिक अस्थिरता वेळीच सांभाळता आली नाही तर मुलं चिंतातुर होतात किंवा उदासीन होत जातात,मग काही give up करतात. अशा खोल मानसिक गर्तेत आपल्या मुलांना जावू न देणे यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो. * आपल्या मुलांची बौद्धिक व भावनिक क्षमता ओळखणे,त्यानुसार त्याला या मोठ्या शहरात पाठवायचे की नाही हे ठरवावे. * क्लासेससाठी लाखो रुपये खर्च करणार असतो,त्याआधी त्याची मानसशास्त्र पदवी असलेल्या कौन्सेलर मार्फत Career Guidance test करून घेणे.यांमध्ये ॲप्टिट्यूड,इंटरेस्ट व पर्सनॅलिटी या टेस्ट्स असतील तर पुढील संभाव्य अडचणी येणार नाहीत. * शक्य असेल तर पालकांपैकी कोणीतरी मुलांबरोबर रहावे,नसेल तर सुरुवातीपासून त्यांचे एक्स्पर्ट कडून कौन्सेलिंग करावे. * मुलाबरोबर राहणार असेल तर त्याला वारंवार त्याचे दडपण येईल असे बोलू नये.त्यांच्या बरोबर आधारासाठी थांबायचे आहे,प्रेशर देण्यासाठी नाही. * ''मी सगळं सोडून तुझ्याबरोबर राहत आहे,चांगले मार्क पडायलाच पाहिजे" किंवा " नाहीं पडले तर लोक काय म्हणतील" ,कृपया असे टेन्शन स्वतः घेऊ नये व मुलांनाही देवू नये. * पालकांव्यतिरिक्त असा एखादा कौन्सेलर किंवा एखादी व्यक्ती असावी (परिपक्व) ज्याच्याबरोबर मुलांचा छान संबंध/संवाद असेल. व त्यांच्याशी नियमित संवाद करायला सांगावे. * मुलांना भावनिक आधार द्यावा पण त्यांना त्यासाठी परावलंबी बनवू नये. * या सर्व काळात स्ट्रेस येणारच नाही असे शक्य नाही पण स्ट्रेस मॅनेजमेंट शिकविल्यास मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम तर होईलच पण त्याचा परफॉर्मन्स सुधारेल आणि प्रोग्रेसही होईल. (गेल्या अनेक वर्षात 12वी नंतर मानसिक खच्चीकरण झालेली,तणावात असलेली, Anxiety, Depression मध्ये गेलेली बरेच विद्यार्थी कौन्सेलिंगसाठी येत आहेत.या अवस्थेत जाण्याआधी आपण त्यांना मदत करू शकतो.कौन्सेलिंग हे प्रॉब्लेम आल्यावरच करावे असे नसते त्याचा उपयोग प्रॉब्लेम येऊ नये म्हणूनही आपण करू शकतो.अनेक वर्षांच्या अनुभवातून 11,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कौन्सेलिंग प्रोग्राम तयार केलेला आहे.ऑनलाइन सेशन सुद्धा घेवू शकतो.) धन्यवाद. मनरंग कौन्सेलिंग सेंटर भाग 1 वाचण्यासाठी खालील लिंक पहावी. https://www.facebook.com/share/p/1Ff7FfqPRi/

Comments