Agrowon
February 6, 2025 at 12:58 PM
अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान मंत्री दादा भुसे आले, यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्री भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले. शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. दादा भुसेंच्या वाहनावर कापूस फेकल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. https://www.youtube.com/watch?v=M0mgyJMoAP0
👍
❤️
7