भिडे गुरुजी सांगली 🚩
February 18, 2025 at 04:05 PM
धर्मवीर बलिदान मास
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या
( फिरंगी तारीख : २८ फेब्रुवारी २०२५ ते २९ मार्च २०२५)
धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय ?आणि तो का पाळायचा ?
औरंग्याने शंभुराजेंना पकडल्या गेलेल्या क्षणापासून दररोज एक एक अवयव तोडत ३० दिवस वेदना देऊन अत्यंत निष्ठुर पणे हत्या केली. तो संपूर्ण महिना आपण कुठल्याही एका सुखाचा त्याग करायचा असतो व सूतकाचा महिना पाळायचा असतो म्हणजेच, महाराजांचा 'धर्मवीर बलिदान मास'
धर्मवीर 'बलिदान मास' कसा पाळावा ?
१. धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसांत अन्नपाण्याचा त्याग केला होता. हे लक्षात घेऊन, प्रत्येक जण संपूर्ण मास संपेपर्यत दिवसाकाठी एकदाच जेवावे.
२. मिष्ठान न खाण्याचा निश्चय करावा.
३. या महिन्यात चहा पिणे, दूरद्रनि व चित्रपट पहाणे व पायांत पात्रदाणे घालणे, या सर्व गोष्टी वा किमान एखादी गोष्ट तरी सोडावी.
४. हा महिना आपण सर्वच हिंदू बांधवाना शोकाचा, दुःखाचा, सुतकाचा असल्यामुळे, कोणत्याही आनंदाच्या, उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, जाणीवपूर्वक पूर्णतः टाळावे.
धर्मवीर बलिदान मास 🚩
राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ 🚩

🙏
❤️
🚩
👍
💯
💐
🕉️
🙌
113