
Online Shopping....
January 31, 2025 at 07:42 PM
---- नयन अडसुळ.
तालुका भोर, जिल्हा पुणे.
*पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...*
*टप्पा १:- १९५० ते १९७५*
*या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.*
*सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...*
*मोठे वाडे...*
*दांडगा रुबाब...*
*निसर्गावर चालणारी शेती...*
*अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक,*
*मिलिटरी भरती,*
*पोलीस भरती झाले.*
*तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.*
*अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.*
*नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...*
*उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.*
*हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.*
*टप्पा २:- १९७५ ते १९९५*
*देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला,*
*१९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.*
*शेतीची विभागणी सुरु झाली,*
*२० एकराचे मालक ५ एकरावर आले.*
*बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.*
*शेती आता भांडवलदाराची होऊ लागली.*
*विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.*
*पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.*
*राजकारण गावागावात घुसलं.*
*पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या.*
*बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.*
*स्पर्धा वाढली.*
*आता नोकरी सोपी राहिली नाही.*
*हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.*
*वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.*
*२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला,*
*पोरं बेकार फिरू लागली.*
*टप्पा ३:- १९९५ -२००९*
*हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.*
*परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.*
*मोठे उद्योग यांनी काबीज केले.*
*हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली.*
*सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.*
*मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कुल वर चिटकवणे ह्यातच गुंतलेला दिसला.*
*२० एकर जमीन वाटण्या होऊन,*
*मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.*
*अजूनही पाटीलकी व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.*
*टप्पा ४:- २००९ ते २०२०*
*ग्लोबलायझेशन झाले,*
*जगाचे पैसे भारतात आले.*
*पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या.*
*मग काय...?*
*जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.*
*राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.*
*जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.*
*आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.*
*खरी, बिकट गरिबी सुरु झाली.*
*पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.*
*बापाकडे लग्नाला पैसा नाही.*
*मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.*
*गावचा जमीनदार हमाली करू लागला.*
*व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.*
*टप्पा ५:- २०२० ते २०३०*
*इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल.*
*ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार.*
*नोकरी हा विषय संपला आहे.*
*नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.*
*उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.*
*पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.*
*शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.*
*अजून वेळ गेली नाही.*
*शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा.*
*नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.*
*जो चूक करतो तो माणूस,*
*तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस,*
*जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस.*
*अजुन वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पहाण्यासाठी.*
*आपल्या माणसाला साथ द्या,*
*आपल्या माणसाला मोठ करा.*
*आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा.*
*आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.*
*(सत्य परिस्थितीवर आधारीत असलेला हा लेख सोशल मीडियावरून घेतलेला...)*
*मला आवडलेला आहे,*
*आपणासही नक्कीच आवडेल बघा आपल्या पुढच्या पिढ्या वाचवता आल्या तर छानच...*
🪷 नयन सुरेश अडसुळ
तालुका भोर, जिल्हा पुणे.
*एक भयाण वास्तव...!*
*🙏🙏🙏🙏🙏*