✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
February 14, 2025 at 09:29 AM
अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असताना व, भाजप- संघवाल्यांचे लोहपुरुष अडवानी गृहमंत्री असताना भारतीय संसदेवर भीषण अतिरेकी हल्ला झाला होता. नंतर २००४ साली लोकसभा निवडणुका होवून काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन होवून दहा वर्षे डॉ.मनमोहन सिंग प्रधानमंत्री राहिले. ह्या सरकारने संसदेवरील हल्ल्याची सखोल चौकशी करून सर्व अपराध्यांना शिक्षा केली व, सदर हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरु याला जम्मू-काश्मीरमधील तीव्र लोकक्षोभाची पर्वा न करता २०१३ सालामध्ये फासावर लटकवले. नंतर २००८ साली काँग्रेस सरकारच्या काळात भयंकर असा मुंबई हल्ला झाला. प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ह्याही हल्ल्याचा कसून छडा लावला. ह्या सरकारला बदनाम करण्यासाठी ॲड.उज्वल निकम नामक इसमाने कसाबला बिर्याणी खाऊ घातली जाते अशी वावडी उठवली. ज्यावर ज्यांची देशभक्ती पोकळ व, नकली आहे त्या भाजपवाल्यांनी मोठा थयथयाट केला. परंतु, काँग्रेस सरकारने शांतपणे व एकाग्रतेने ह्या हल्ल्याचा तपास लावून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर उघडे पाडले व, अतिरेकी अजमल कसाबला याच सरकारने २०१२ सालामध्ये फासावरही लटकवले. पुलवामा येथील हल्ल्यात आपले चाळीसच्या वर जवान शहीद झाले आणि, त्यांच्यावर हा क्रूर पध्दतीने हल्ला करण्यात आला होता. ह्या भीषण हल्ल्याची काय चौकशी झाली व, न्यायालयात खटल्याचे पुढे काय झाले याचा आज सहा वर्षे झाली तरी देशाला कसलाच थांगपत्ता लागलेला नाही. (सर्जिकल स्ट्राईकची भंकस आम्हाला कदापि सांगू नका.) पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आम्ही विनम्र अभिवादन करीत आहोत... 🙏😢🙏 • टीप: ही पोस्त वाचणाऱ्या देशातील तरुणांना आमचे काही प्रश्न आहेत – तुमच्या तरुणाईला नेमके काय झाले आहे? तुम्ही अजूनही असे कसे भ्रमात आहात? तुम्हाला कुणीही कसे सहजपणे मूर्ख बनवू शकते? देशावरील ह्या आघाताची व, ह्या सरकारच्या नकलीपणाची तुम्हाला कधीच चीड कशी येत नाही?

Comments