
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
164 subscribers
About ✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
✋️ "Solapur District Congress Committee – Social Media Department" ✋️
Similar Channels
Swipe to see more
Posts









https://www.facebook.com/share/p/1BZwT3RbYk/



*रडायचे नाही लढायचे; काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचवून सत्ता आणू व, काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवू: हर्षवर्धन सपकाळ* *_हर्षवर्धन सपकाळ यांच्या सक्षम नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करेल: रमेश चेन्नीथला_* _लोकांची कामे करा; महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उभा राहील: आ.नाना पटोले_ हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा मुंबईमध्ये थाटात संपन्न... *मुंबई; दिनांक: १८ फेब्रुवारी, २०२५* – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. पण, विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनविले. आता, पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीतजास्त जागी विजय मिळवा. नाना पटोले यांनी चार वर्षांत पक्षासाठी चांगले काम केले. आता, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा काल रोजी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश व मुंबई विभागीय प्रभारी आ.रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, गोवा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष खा.वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अमित देशमुख, यशोमती ठाकूर, अस्लम शेख यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी.एम. संदीप, कुणाल चौधरी, बी.व्ही. व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा.प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आदी उपस्थित होते. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीने केली: "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु ए कातिल में है" असे म्हणत त्यांनी भाषणला सुरुवात केली. ते म्हणाले की, विरोधी पक्ष भाजप सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले व, काँग्रेसमधील नेत्यांना भाजपत प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे आणि, आपल्याकडे नेतृत्व आहे. पण, कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत; रस्त्यांवर उतरून लढावे लागेल. आता, रडायचे नाही तर, लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की; २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसने विधानसभेला ४२ जागी विजय मिळविला होता तर, २०१९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ४४ जागी विजयी झालो होतो. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविला. परंतु, विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता, पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्वाचे नसते तर, लढण्याची इच्छाशक्ती असावी लागते. आणि, काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज तसेच, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने आपण जोमाने काम करून आपल्या काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देवू. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की; हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा करू व, पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम करू. हर्षवर्धन सपकाळ हे कार्यकर्त्यांसाठी नेहमी उपलब्ध असतात. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या; त्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. गुजरातमध्ये त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करून मोठे यश मिळवून दिले. मध्य प्रदेश राज्यातही त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे. सर्वोदयी तत्वज्ञान व, गांधी विचाराने ते काम करतात. संविधानाच्या प्रास्ताविकेचे जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेसचा विचार आहे. राज्यातील गावागावांत शिबीरे घेवून विचारांचे वादळ उठवू आणि, हर्षवर्धन सपकाळ यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नव्याने काँग्रेस पक्ष व आपले संघटन उभे करू. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की; चार वर्षांत संघटनेला बळ देण्याचे काम केले. पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. विधानसभेला काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते. पण, भाजपने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. पण, मतदान कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोग देवू शकलेला नाही. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली. आता, आपल्याला पुढची लढाई लढायची आहे. अफवांना बळी पडू नका व, नागरिकांची कामे करा. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उभा राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री अमित देशमुख, वसंत पुरके, आरिफ नसीम खान, खा.वर्षा गायकवाड यांनी भाषणे केली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केले. त्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर हुतात्मा स्मारकाला भेट देवून अभिवादन केले. मणिभवनला भेट दिली व, त्यांनतर दादर येथील चैत्यभूमीला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन केले. दुपारी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने आणि, ताकदीने अस्तित्वात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ह्या दोन पक्षांची आणि, काँग्रेस विरोधी लहानसहान पक्षांची ताकद अत्यल्प आहे. भविष्यात इथे सत्तांतर आणि, परिवर्तन हे एक फार मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. पण, फक्त महाराष्ट्रच नाही तर, आपल्या संपूर्ण देशपातळीवर खऱ्या अर्थाने भाजपविरोधी विचारधारेच्या अस्तित्त्वाची लढाई आहे. विचारधाराहीन व, सत्तेचा मोह बाळगणारी अनेक प्रस्थापित नेतेमंडळी कायम उड्या मारण्यात सातत्य राखणारच आहेत. आता, विषय राहतो तो फक्त लढाऊ बाणा दाखवत संघर्षाची तयारी ठेवून विचारधारेशी एकनिष्ठ अशा मावळ्यांच्या उठावाचा... पद असो की, पैसा; निष्ठा न सोडणारे सवंगडी वेचून आणि, शोधून गोळा करावे लागणार आहेत... सध्या भारत देशात आपल्या काँग्रेस पक्षाचे १०२ इतके खासदार आहेत... ही काही साधीसुधी ताकद नाही... फक्त तयारी पाहिजे... तटस्थ, पुरोगामी, समविचारी... *"चलो चले कांग्रेस की ओर....."*

लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी जी द्वारा संसद से सड़क तक उठायें गएं विभिन्न मुद्दों की गुंज अब अमरिका तक पहुंच गईं है।। जो काम भारतीय मीडिया को करना चाहिये था; वो काम अमरिकी मीडिया ने कर दिखाया है।। अदानी और, मोदी के गहरे रिश्ते को लेकर एक सीधा सवाल पूछकर।। धन्यवाद राहुल जी... जनता की आवाज उठाने के लिएं।। 👍👍👍

