SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 3, 2025 at 05:46 PM
#वाचनवेडा #vaachanveda #vachanveda #आवडलेलं_पुस्तक "वायंगी" लेखक अविनाश महाडिक जानेवारी 2025 पुस्तक क्रमांक 2 पुस्तक महोत्सवामध्ये काही पुस्तकांची खरेदी केली..भयकथा आवडतात म्हणून वायंगी ह्या पुस्तकावर नजर गेली. पुस्तकाचं मुखपृष्ठच मला खूप आकर्षक वाटलं. (म्हणजे भय कथेला साजेस असे) विचार केला की वाचायला हरकत नाही. मध्यंतरी एकाच जॉनरची पुस्तक वाचून थोडा कंटाळाच आला होता. त्यामुळे पुस्तक घेतलं. पुस्तकाचे लेखक सुद्धा नारायण धारपाचे चाहते, म्हणलं चला एक दुवा तरी जुळतोय. नारायण धारप हे माझे आवडते लेखक, कारण भुतांच्या गोष्टी मला खूप आवडतात, त्यांच्या बऱ्याच कथा मी वाचलेल्या आहेत.. पुस्तकाची सुरुवातच रत्नागिरी जिल्ह्यातून होते कोकण आणि भुताटकी समीकरण झालंय. कथा धोत्रेवाडी नावाच्या गावात घडते. गाव थोडं दुर्गम भागात असतं.. गावात धोत्रेश्वराच्या मंदिरामुळे गावाला धोत्रेवाडी नाव पडलेल. अशा या धोत्रेवाडीमध्ये देवाबरोबरच कर्मकांडांचा अंधश्रद्धेचाही पाया चढलेला असतो.. वर वर सुखा सुखी चाललेला गावच्या कारभारात, नवीनच लग्न होऊन आलेल्या निर्मलाची एन्ट्री होते.. एखाद्या डोहातल्या स्थिर पाण्यासारखा गावातला कारभार चाललेला असतो पण अचानक त्या पाण्याच्या डोहामध्ये कोणीतरी दगड फेकावा.. आणि पूर्ण शांतता भंग होऊन जावी तसाच काही प्रकार गावात घडायला सुरुवात होते..... सुरुवातीला चार-पाच पानातच पुस्तक ग्रिप पकडत. पुढे काय होणार उत्सुकता लागून राहते.. लीलावती... रहस्यमय महिला... घरात कुणालाच माहीत नसलेलं तळघर, त्या तळघरावरील भिंतीवर चित्रविचित्र आकृत्या, चित्र, कोणाला डोळा तर कोणाला शीर नसण.. त्यांची पूजा करण्यासाठी मानवी खोपडी आणि कोपरापर्यंत असली मानवी हाताची हड्डी आणि पांढरी कापडी बाहुली. अशा या सगळ्या वर्णनांमुळे आता पुढे काय होणार, असे मनात एकदम भीती निर्माण करणारे प्रसंग डोळ्यासमोर येतात.. लीलावती उपासना करत असते "वायंगी"ची.. मी खूप भयकथा वाचल्या पण हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. "वायंगी" म्हणजे अतिशय शक्तिशाली क्रूर भीतीदायक असा असुर. त्याची पूजा अर्चना करणारे लोक लोभी, स्वार्थी कोणती गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात अशाच लोकांच्या शोधात हा असतो... तुमच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याच्याही काही इच्छा पूर्ण कराव्या लागतात आणि त्या अमानुषच असतात... गावात अचानक लहान मुलं गायब होणं. धरणी कंप होऊन गावातलं धोत्रेश्वराचं मंदिर पूर्णपणे कोसळून जाण. धरणीकंप म्हणजे कोणत्यातरी देवी शक्तीचा कोप झाला असं गावकऱ्यांना वाटू लागण... या सगळ्या घटनांमुळे आपण पुस्तकात एकरूप होऊन जातो.... वायंगीने निर्मलाला स्वतःचं नख देण्याचा प्रयोजन काय? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात... क्रूर भयानक शक्तिशाली वायंगी आणि त्याचे हस्तक लीलावती, निर्मला, जोगिन, गणपत... यांच्याविरुद्ध अघोरी बाबा, मास्तर, गुरव आप्पा, कर्णपिशाच्चणी, अघोरी बाबांचा हस्तक कावळा, दहा वर्षाचा अरुण, सुरेश, मोरेश्वर धोत्रेकर.... असे हे युद्ध सुरू होते.. एवढ्या शक्तीशाली अमानवी लोकांचा सामना सर्वसामान्य गावकरी कसे करणार, असे प्रश्न आपल्या समोर उभे राहतात.... लेखकाने अतिशय रंजक पद्धतीने प्रत्येक प्रसंगाचे वर्णन केलं आहे. त्यांच्या काल्पनिक शक्तीचे कौतुक करावं लागेल. त्यांनी केलेलं प्रत्येक वर्णन हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहत.. आणि आपल्या डोळ्यासमोरच सगळी कथा घडतीये असं वाटायला लागतं.. भयकथा, भुतांच्या कथा म्हणलं की आपल्याला अंधश्रद्धा, अविश्वास अशी धारणा असते ... पण लेखकानी पुस्तकाचा शेवट हा खूप आशावादी केलेला आहे. जिथे उजेड आहे तिथे अंधार ही आहे..आणि शेवटी इतरांबद्दल वाईट विचार मनात ठेवून त्रास देणार्‍यांना लोकांवरच त्यांचेच कृत्य उलटत.. हेही तितकंच खरं.... ज्यांना भयकथा आवडतात, पुस्तक वाचताना भीतीची ज्यांना अनुभव घ्यायचा असेल, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच वेगळ्याच दुनियाची सफर करून आणेल... नारायण धारपांच्या चाहत्यांसाठी हे पुस्तक म्हणजे भयाची परकाष्टा "वायंगी " आशा नेगी #वायंगी##bautyoflife #ब्युटीऑफलाईफ #horrorstories #suspensethriller #wayingi #fear #indianhorror #bookreview #horrorlovers #avinashmahadik #narayandharap #mysterybooks #ghoststories #thriller #psychichoगोस्टलीड़वेंतुरेस #avinashmahadik#newerapublication #bookrecommendations #creepytales #indianauthors #fearfiction #spookybooks #ghostlyadventures

Comments