
SwaRa "पुस्तक परिचय"
February 5, 2025 at 02:55 AM
जे जे खटकतंय ते ते सगळं
सगळं उलथवून टाकलं पाहिजे,
असं सांगून हळुवारपणे काळजाला हात घालणारा कवी म्हणजे देवा झिंजाड.
कवितासंग्रह विकले जात नाहीत अशा आवईमध्ये ह्या कवितासंग्रहाच्या चार आवृत्या आल्या आहेत हे विशेष आहे...
.*एक भाकर तीन चुली* *सगळं उलथून टाकलं पाहिजे* व *मेंदूची मशागत* ह्यातून प्रबोधन करणारा लेखक,कवी व आधुनिक काळातील समाज सुधारक म्हणजे *देवा झिंजाड*
*सर्व उलथून टाकलं पाहिजे* या कवितासंग्रहाचे लेखक *देवा झिंजाड* यांनी अप्रतिम लेखन केले आहे.
या कविता संग्रहाला राज्यस्तरीय एकूण आठ पुरस्कार मिळाले आहेत.
कवितेतून समाज सुधारण्यासाठी प्रबोधन करणे ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे.ज्याकाळी संत महात्मे,ॠषीमुनी बोरूने कविता लिहून समाज सुधारण्यासाठी प्रबोधन करत असत.त्याकाळी लिहीलेल्या हजारो रचना आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत.कवितेतून प्रश्न सुटत नसले तरी पण प्रस्थापित प्रश्नांना धार नक्कीच येते.
लेखक *देवा झिंजाड* यांचं बालपण *गारखिंडी* या छोट्याशा खेड्यात गेल्याने व अत्यंत गरीबीत दिवस ढकलून आईने रात्रपहाट करून मोलमजुरी करून, कधी कधी उपाशीपोटी राहून,लुगड्याला ठिगळं देऊन, पण मुलाचे म्हणजेच देवा झिंजाडांचे शिक्षण केले.
गरीबीत कसा फाटकातुटका संसार करावा हे ज्ञान मुलाला दिले. मायमाऊली अंगठे बहादुर होती,पण PHD झालेल्यांच्या वरचढ होती, देवा झिंजाडांची तेथील माणसं, माती, डोंगरं, नदी,नाले,ओढे, विहिरी, बारवा, टेकड्या,बोरी,चिंचा व आंबा यांच्याशी घट्ट नाळ जोडली गेली असून आजही ते पुण्यात नोकरी करत असून सुद्धा त्यांनी या नाळेला तुटू दिले नाही.अजूनही तिथल्या मातीशी एकरूप आहेत आणि म्हणूनच त्यांनी *सर्व उलथून टाकलं पाहिजे* हा कवितासंग्रहाचे *वास्तव* दाखविणारा व ह्रदयस्पर्शी लिखाण केले आहे.बरेच कवि काल्पनिक किंवा स्वप्नातील घटनांवर कविता लिहीतात, त्यामुळे त्या कविता म्हणाव्या तितक्या प्रसिद्धीस येत नाहीत.
*देवा झिंजाड* यांचे वडील लहानपणीच वारले असतांना आईबरोबर काबाडकष्ट करून, अनेक दुःख पचवून शिक्षणाशी नाळ तुटू न देता इंजिनिअर होऊन कुटुंब वत्सल होणं, हे आताच्या तरूणाईला थोबाडीत मारलेली चपराक आहे.त्यांनी कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा, स्त्रीभ्रूणहत्या, निसर्गाची होणारी अवहेलना, माणसांमध्ये असलेला कर्मठपणा, दुष्काळामुळे आलेलं दारिद्र्य व भूकेचा डोंब, समाजात होणारे अत्याचार व भ्रष्टाचार, गरीबाची पिळवणूक, फास्टफूडने शरीरावर होणारे वाईट परिणाम,पावसा अभावी जमीनीचे भेगाळलेपण व कोरड्या झालेल्या विहिरी,तरूणाई वर मोबाईल मुळे होणारे नुकसान व वाईट परिणाम, यातून जगण्याचा केविलवाणा संघर्ष, जागतिकीकरणानंतर समाजात वाढत असलेली विषमतेची दरी, आदर्श गावातील व हगणदारी मुक्त बक्षीस मिळवण्यासाठी राजकारणी व सरकारी यंत्रणा कशी भ्रष्ट व खोटारडेपणा करते.
तरूण मुलीला *चिंचेची* उपाधी देऊन समाजातील विकृत व माजूर्डे लोकं चिंचेचे कसे लचके तोडतात. पूर्वी *वासुदेव* हा पहाटे गावागावात मंजूळ आवाजात गाणी म्हणवून दमलेल्या,थकलेल्या शेतकरी लोकांना जागे करून सुवासिनी आनंदाने चार दाणे सुपातून त्याच्या झोळीत टाकत, पण दुर्दैवाने ती संस्कृती अलीकडे लोप पावत चालली आहे याचं कवितेतून सुंदर वर्णन केले आहे. पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे, म्हणून कोरड्या नद्या अतिक्रमण करून बुजत आहेत,अशा अनेक प्रश्नांना वाच्या फोडण्यासाठी लेखकाने केलेला केविलवाणा प्रयत्न या कविता संग्रहातून दिसून येतो व मनाला वेदना देतो.
या कविता संग्रहातून *देवा झिंजाड* यांनी समाजातील अगदी तळागाळातील गोष्टींचे अतिशय सूक्ष्म व मार्मिक लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी लिहीलेली *चुंभळ* ही कविता मला खूप आवडली,कारण मी चुंभळीचा डोक्यावरून ओझं आणण्यासाठी वापर केला आहे.बर्याच शहरी तरूणाईला *चुंबळ* कशाला म्हणतात, माहीत पण नसणार.चुंभळीचे वर्णन
दबली जाते,दाबली जाते
भिजली जाते
थिजली जाते
विरली जाते
एकदा चपटी झाली की
कायमची अडगळीत फेकली जाते
थोडक्यात *गरज सरो वैद्य मरो* अशी अवस्था होते.
सर्वसाधारणपणे आई वडीलांची अवस्था पण म्हातारपणी *चुंभळी* सारखीच होते असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
कारण जेव्हा भावाभावांचे जमीनीच्या, घरादाराच्या वाटण्या होतात, त्यावेळी सर्वात दुःखदायक आई वडीलांची वाटणी सहा सहा महिनयांसाठी केली जाते, तेव्हा मात्र त्यांची अवस्था पाहून ह्रदय भरून येते.
त्याप्रसंगी आई वडीलांना नक्कीच वाटले असेल ,अशी मुले जन्माला येताच मरून का गेली नाहीत 😭 यापेक्षा निपुत्रिक राहीलेले बरे,हे वास्तव कवितेतून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
राजकारणी प्रदेशात दौरे करतात पण शेतकऱ्यांसाठी एखादा दौरा करायला वेळ नसतो.*अर्धी बादली* या कवितेत दुष्काळाने गांजलेल्या, हताश झालेल्या मालकाला बैल खुणावतात,मालक आम्ही कोरडा चारा खाऊन जगू पण तुम्ही धीर सोडू नका, हे मुकं प्राणी खुणावतो यावरून शेतकरी आपल्या जनावरांवरही किती जीवापाड प्रेम करतात हे या कवितेतून दिसून येते.
आपली न्यायव्यवस्था किती खिळखिळी झाली आहे व *टीआरपी* वाढवण्यासाठी चैनेलवाले वास्तवाला सोडून खोट्या बातम्या देतांना निर्भयासारखी अभागन किंवा आपली बहीण त्यांना आठवत नाही काय?
*देवा झिंजाड* यांनी *एक भाकर तीन चुली* (कादंबरी) *मेंदूची मशागत* व *सर्व उलथून टाकलं पाहिजे* हा कवितासंग्रह,या तिन्ही पुस्तकातून समाज सुधारण्यासाठी अगदी तळागाळातील संस्कृती, रितीरिवाज, स्त्रियांवर होणारे अत्याचार, शेतकऱ्याचा केविलवाणा संघर्ष, राजकारण्यांचा माजूर्डेपणा अशा अनेक वरती उल्लेख केलेल्या कारणांमुळे समाज कसा अधोगतीला जात आहे याचे सविस्तर वर्णन या तिन्ही पुस्तकातून केले आहे व यापुढे पण आपण करत राहो,अशी आपला प्रिय मित्र, सवंगडी, एक माजी सैनिक व माजी पोलीस अधिकारी अंतःकरणानापासून आपण असेच समाजासाठी लिखाण करून आपले हातून समाजकार्य घडावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
धन्यवाद🙏
माजी सैनिक व माजी पोलीस अधिकारी
(प्रभाकर मोतीराम पवार)
>>
घरपोच पुस्तकं, व्हाट्सएप - 09579824817
<<<
#एकभाकरतीनचुली #मेंदुचीमशागत #viralreelsfacebook #सगळंउलथवूनटाकलंपाहिजे #reelschallenge #devazinjad #देवाझिंजाड #अभिप्राय #readers #books #bookstore #readerlife #पुस्तक #readerscommunity #booksonline #bookreview #वाचक #bestbooks #bestmarathibook #मराठीभाषा #marathi #कादंबरी #साहित्य #ग्रामीण #पारू #बबू #फेसबुक #facebookpage