Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
February 27, 2025 at 10:21 AM
बाॅइज रिटन टोंगा( एक साहसी आणि अद्भभुत कथा ) भाग ३२ फेरासला व ऐगेतेला जिवंत पाहून सगळे खुप आनंदी झाले. लुईने पळत बाहेर येऊन त्यांना घट्ट मिठी मारली. मग सगळ्यांनी ही मारली. https://www.shrutimundada.com/2022/07/7-healthy-morning-rituals-unlimited.html " अरे,फेरास ,ऐगेते किती वाळलात रे.का गेलात असे? तेही कोणाला काहीही न सांगता." " हो हो तुम्ही कोठे गेला होतात आणि काय काय केलयं,तुम्हाला कोणी भेटलं का सांगा ना सगळं. " ऐनी म्हणाली. " अरे थांबा त्यांना फ्रेश होऊ द्या. काहीतरी खाऊ द्या. बघा त्यांची अवस्था. " लुई म्हणाला. " हो हो रे आम्ही दोन महिने झाले अन्न खाल्ले नाही.फक्त फळं खाऊन राहिलो आहोत.मागच्या दोन दिवसापासून तर जास्त फळेही मिळाली नाहीत.पाणीही नाही मिळाले.आधी पाणी द्या प्यायला. " ऐगेते म्हणाला. पाणी मिळताच ते गटागटा पिऊ लागले.त्यांना ठसका लागला.लुईने प्रेमाने त्यांच्या पाठीवर हात फिरवू लागला.ते फ्रेश होऊन आले की त्यांनाही अन्न खायला दिले. ते अधाशा सारखे खाऊ लागले. सगळे फक्त बघतं राहिले.लुईने ऐनीला मग हे दोघे परत येण्याच्या खुशीत लापशी करायला लावली.ऐनी आनंदाने बणवायला गेली.ऐनी भगरा सारख्या धान्याला वाटू लागली तो पर्यंत वेगासने चुलीवर पाणी गरम करायला ठेवले.मध काढून ठेवले.लापशी शिजे पर्यंत हे दोघे आपल्या सोबत दोन महिन्यात काय काय घडले हे सांगू लागले.हे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारू लागले. सगळं झाल्यावर लुईने त्या दोघांच्या अंगावरील कपड्या बद्दल विचारले.ऐगेतेने झाडांच्या साली पासून बणवल्याचे सांगितले. " येथेही आपल्याला बणवावे लागतील.सगळे कपडे फाटले आहेत.फाटके कपडे ऐनीला त्या काळात वापरायला दिले आहेत. पण पुढे कपडे लागतील. तेंव्हा आपण कपडे बणवू या. दुसऱ्या दिवसापासून ते सगळे झाडांच्या साली शोधायला लागले. पाण्यात भिजवून त्यांचे धागे व कपडा काढू लागले.हातानेच गाठी बांधून कपडे बणवू लागले. तसेच शेतीही करू लागले.फेरास आणि ऐगेते ची तब्येत पण सुधारली.पण ते दोघे वर चढण्याची गोष्ट आयुष्यात कधी विसरले नाहीत.बघता बघता चार वर्ष संपली. मुलांची परत जायची आशा पण संपून गेली.इतक्या वर्षात एकही जहाज इकडे आले नाही म्हणजे इकडे जहाजच येत नाहीत.आता आयुष्य भर इकडेच रहावे लागणार. ते हताश झाले,पण लुई समजावायला" बघा कधीतरी जहाज येईल आपण परत जाऊ.नाही गेलो तरीही आपण जिवंत तरी आहोत ना.जगूया एकमेकाच्या साथीने.सोळा सतरा वर्षाची मुलं आता तरुण मुलं झाली होती. विस ऐकेविस वय झाले होते. ऐनी व वेगासचे प्रेम बहरत चालले होते. कधी कधी लुईला वाटायचे परत नाही गेलो तर.उगी यांचे लग्न लावूनच द्यावे.पण ते अजून लहान आहेत.बघू ऐनी बावीस तेवीस वर्षाची झाल्यावर. या वर्षी परत भरपुर पाऊस झाला. शेतातले धान्य वाहून गेले. मुलांना काय खावे हे कळेना. क्रमशः सौ हेमा येणेगुरे पुणे
🙏 👍 3

Comments