
Yuti's Hub Library
1.0K subscribers
About Yuti's Hub Library
https://www.shrutimundada.com/?m=1 stay tuned 😎
Similar Channels
Swipe to see more
Posts

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे ?* *👉 उत्तर -* महाराष्ट्र. *💁🏻♂️ अधिक माहिती* ◾ या उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण २२,०१० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. ◾महाराष्ट्रात सर्वात जास्त छत्रपती संभाजी नगर जिल्हयात सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत प्रकल्प मंजूर आहेत. ◾प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत बिहार राज्य दुसऱ्या स्थानावर आहे.

हॅपी रिटायर्ड लाईफ!!... ३-४ वर्षांपूर्वी एका रविवारी अचानक माझा मित्र अनिल आणि त्याची पत्नी अदिती (नावे बदललेली) माझ्या घरी आला. एकदम आनंद! खूप वर्षांनंतर भेट होत होती. https://www.shrutimundada.com/2022/01/how-to-stop-overthinking.html अनिल रिझर्व्ह बँकेत नोकरी करून काही वर्ष आधी स्वेच्छा निवृत्ती घेतलेला. बँकेत असताना सुद्धा काही शिकवण्या करून आपल्या income ला जोड दिलेली. अदितीने खूप धडपड करून एक छोटासा व्यवसाय उभा केला होता. तो तसा छान चालला. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी आर्थिक बाजू भक्कम झाली होती. एक मुलगा आणि एक मुलगी अशी पुलंच्या भाषेत 'बेतशुद्ध संतती' असलेला. दोघांची लग्न झालेली. पुन्हा पुलंच्या भाषेत 'संसाराच्या शेवटी इष्ट स्थळी जाऊन पोचलेली' अशी ही जोडी. दोघांचाही स्वभाव दिलखुलास! त्यामुळे तो घरी येणे म्हणजे एक आनंद सोहळा! मग थोड्या हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मी त्याला विचारले, "मग कसं काय चाललंय रिटायर्ड लाईफ?" "एकदम मस्त".... अनिल "आता काय करतोस?".. मी "काहीही नाही. म्हणजे तसं ठरवलंच आहे. खूप कष्ट केले रे. आता मात्र आपण कमावलेलं आपण उपभोगायचं असं ठरवलं आहे!" "वा.. मग वेळ कसा जातो"....मी "अरे इथे वेळ जाण्याचा प्रश्न आहेच कुणाला. आयुष्यभर एक - एक मिनिट धावत होतो. आता धावायचं नाही. परमेश्वराने आमच्या दोघांचे आयुष्य आरामात जाईल एवढं सगळं दिलं आहे. तेव्हा शांतपणे राहायचं. अगदी सकाळचा walk सुद्धा ७:०० वाजता. उगीच लवकर उठा वगैरे काही नाही".... अनिल "आणि मुलगा?" .... मी "हे बघ. त्याला मी स्पष्ट सांगितलं. बाबारे, आपलं वडील - मुलाचं नातं वगैरे ठीक आहे. पण आता तुझं लग्न झालंय. तेव्हा तू आता स्वतंत्र राहा. माझं स्पष्ट मत आहे. मुलांनी वेगळं राहिल्याशिवाय त्यांना आयुष्य कळणार नाही.".... अनिल "हं"....मी थोडं hesitantly म्हटलं. "अरे बघ ना. वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाईलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी 'झक मारत' घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे...." ....अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा! "मग आता तू कुठे राहतोस?" ....मी "मी ठाण्याला आणि मुलगा दादरला. त्याला चॉईस दिला होता. त्याच्या दृष्टीने दादर सोयीचं होतं. म्हणून तो दादरला. मला ठाण्याला राहायला काही प्रश्न नव्हता म्हणून मी ठाण्याला".... अनिल. आयुष्य दादरच्या मध्यवस्तीत काढलेल्या माणसाला ठाण्याला राहायला जाणे सोपे नव्हते. म्हणून त्याच्या सहजपणे बदल करण्याच्या मानसिकतेचे कौतुक वाटले. "सगळा नवीन set -up ना? सगळ्या व्यवस्था लागल्या?" .... मी "हो. दूध, पेपर, भाजी मार्केट सगळं छान लागलं"....अनिल "कामवाली बाई मिळाली का?" ... माझी पत्नी. तिने महिला वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. "आमच्या कडे तो काही प्रॉब्लेम नाही. तो सगळं विषय यांच्याकडे".... अदिती (अगदी खूष होत सांगत होती) "म्हणजे?" .... माझी पत्नी "अगं म्हणजे कामवाल्या बाईचा interview हे घेतात. विचार त्यांना".... अदिती "अनिल तू घेतोस interview ?".... मी "अरे it is a technique how to negotiate with her "... अनिल सांगत होता.. “म्हणजे असं बघ. मी तिला विचारतो 'तू किती पैसे घेणार दर महिन्याचे'. मग ती म्हणते '७०० रुपये'. त्यात केर - लादी, सिंक मधील छोटी भांडी घासणे आणि आठवड्यातून एकदा फर्निचर पुसणे. मग मी तिला म्हणतो 'बरं. आता मी काय सांगतो ते ऐक. 'कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, खिडक्यांच्या कडा पुसणे, रोजची भाजी चिरून किंवा निवडून ठेवणे ही कामे पण करावी लागतील. या प्रत्येक कामाचे २५ रुपये याप्रमाणे एकूण ७५ रुपये मी जास्त देणार. मान्य?' ती एकदम सहज मान्य करते"..... अनिल. इथे आमचा जोरात हशा! "कमाल आहे राव तुझी" ....मी हसत हसतच म्हटले. "खरी गम्मत पुढची. ऐक. मी तिला विचारतो 'महिन्यात दांड्या किती मारणार? प्रामाणिकपणे सांग.' यावर ती थोडसं अडखळत म्हणते 'दोन होतातच साहेब. काय करनार कितीबी केलं तरी व्हतातच'. मी म्हणतो ठीक आहे. ती पण माणूस आहे. अडचणी येणारच. मग तिला मी सांगतो 'हे बघ दोन दांड्या ठीक आहेत. तिसरी दांडी झाली नाही तर त्या महिन्यात २५ रुपये अजून जास्त!" आम्ही सर्व अवाक आणि हास्याचा मोठा फवारा! "मानलं तुला. सुपर आयडिया आहे यार!" ....मी "अरे तुला माहिताय... ती दुसरीकडे दांडी मारते. पण माझ्याकडे तिसरी दांडी मारत नाही".... आम्ही हसून हसून फक्त पडायचे राहिलो होतो! "म्हणजे ती मागत होती त्याच्यापेक्षा १०० रुपये जास्तच देतोस तिला"....मी "येस. अरे पैसा वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आवश्यक तिथे खर्च करायचा. मी माझ्या मुलांना सांगून ठेवलं आहे. माझ्यानंतर बँक बॅलन्स मधलं काही उरेल अशी अपेक्षा ठेऊ नका. Fixed Assets राहतील ते तुमचे! उगीच सगळं मुलांसाठी म्हणून ठेवण्यात अर्थ नाही. त्यांना सुद्धा कमवायला काय लागतं ते कळू दे".... अनिल "वा ....म्हणजे राजा - राणीचा संसारच म्हणायचं की तुझा"....मी "हो. जेवण रोज चांदीच्या ताटात. च्यायला, ती भांडी नुसती लॉकर मध्ये पडून राहतात. आपण कधी वापरायची? म्हणून मस्त राहायचं. दर आठवड्याला नवीन सिनेमा, नाटक, कार्यक्रम. आम्ही दोघंही जातो. पण आठवड्यातला गुरुवार हा स्वातंत्र्यदिन! मला जे पाहिजे ते मी करणार आणि तिला जे पाहिजे ते ती. मग मित्र, नातेवाईक, फिरणं. आपापला चॉईस. मी तिला विचारत नाही, ती मला विचारत नाही"....अनिल. आम्ही सगळे गारद! अनिलच्या या गप्पांनंतर जणू एक नवी पहाट झाल्यासारखं वाटलं. बोलता बोलता आयुष्याचं तत्त्वज्ञानच जणू त्याने सांगितलं. आपण रिटायर झाल्यावर सुद्धा किती बंधनात अडकलेले राहतो. आपण, आपल्या घरातील ज्येष्ठ, आपली मुलं, नातवंडं, आपलं घर, लग्न कार्य आणि समारंभ याच्या पलीकडे जात नाही. आपले संस्कार आणि संस्कृती त्याला कारणीभूत असू शकते किंवा व्यक्तिसापेक्ष अनेक कारणे असू शकतात. ती योग्यही असतील. पण कुठेतरी 'detached involvement ' ची स्टेज यावी असे वाटते. आपण आर्थिक दृष्ट्या पुरेसे सबळ असतानासुद्धा रिक्षा ऐवजी बस ने प्रवास करून काय साधतो? असे छोटे छोटे खर्च सुद्धा आपल्यासाठी करताना आपलाच दबाव आपल्यावर का येतो? आयुष्याच्या शेवटी आपण एक साधा सुई - दोरा सुद्धा वर नेऊ शकणार नाही हे आपल्याला माहित आहे. मग बचत करीत राहणे कशासाठी? मला वाटतं आपण थोडंसं 'आपल्या स्वतःसाठी' जगायला हरकत नाही. हा मानसिक बदल कदाचित जाणीवपूर्वक करावा लागेल. याचबरोबर, आपले आई-वडील, मुलं, आप्तेष्ट यांच्याप्रती थोडं भावनिक दृष्ट्या तटस्थ होता येण्याचा प्रयत्न करावा लागेल. यात कुणाच्याही भावनेचा अनादर करण्याचा हेतू नाही. निदान उत्तरायुष्यात तरी आपण आपल्या मनाप्रमाणे जगून आयुष्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा हाच फक्त विचार! निदान जमेल तेव्हढे तर करू!

बाॅइज रिटन टोंगा (एक साहसी आणि अद्भभुत कथा ) भाग ३४ https://www.shrutimundada.com/2022/01/how-to-stop-overthinking.html दररोज ती आपआपली काम करतं असतं. नेहमीचे जिवन जगत असतं. असेच सहा वर्ष संपून गेली. मुलं आता बावीस ,तेवीस वर्षाची झाली होती. सहा वर्ष उलटून गेल्याने आता परत जायच्या इच्छा पुर्ण पणे संपून गेल्या होत्या. मधेच मुलं तिकडेही जाऊन आली होती. जिकडे ऐगेते व फेरास पर्वतावरून खाली उतरले होते.तिकडेही त्यांना काहीही दिसले नव्हते. मुलांनी आता घराभोवतीही सुंदर बाग फुलवली होती.जंगलात व इतर भागात फिरून त्यांनी इतर वेगळ्या प्रकारचे धान्य व भाज्या शोधून काढल्या होत्या. आता मधेमधे ते खिचडीपण बणवून खात असतं.सकाळ संध्याकाळ ते समुद्रावर खेळत असतं पोहत असत.तासोनतास तेथे बसून एखादे जहाज येतय का? दिसतं का? हे पाहत असत. एके दिवशी मुलं शेतात काम करत असताना लाल मुंग्या चावू लागल्या त्यामुळे मुलं काम सोडून घरी आले. तसेही ऊनही भरपुर वाढलं होतं. दिवसभर झोपा काढून सुमारे पाच वाजता ही मुलं समुद्रावर गेली.तेथे गेल्यावर सगळे पाण्यात खेळू लागले.मस्ती करू लागले.लुई मात्र दुरवर काहीतरी दिसल्या सारखे पाहत होता. त्याला वाटतं होतं कि जहाज येत आहे पण मुलांच तिकडे लक्ष नव्हते. " ये लुई काय पाहत आहेस? जहाज नाही येणार,आणि आले तरी इतके दुर असते ना कि ते आपल्याला पाहू शकत नाहीत." पण तेवढ्यात खरचं दुरवर एक मोठ जहाज दिसत होते. लुई तिकडे पाहत होता. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. तो पळत घरी गेला आणि फाटलेला पांढरा शर्ट घेऊन आला.लाकडावर लावून तो हलवून दाखवू लागला.जवळपास तो पंधरा मिनीट दाखवत होता. " ये लुई बस कर,हात दुखत असतील.अरे मी खुपदा तासोनतास अस कापड दाखवलं आहे.पण ते जहाजावर दिसलं नाही. ते नजरेच्या टप्प्यात नाही.उगीच निराश होईल." " पण आज खरचं मुलांच नशीब खुप जोरावर होते.जहाजावरील कैप्टन सोरोकी यांना दुर्बिणीतून समुद्रात काही अडथळे येतात का हे पाहण्यासाठी ठेवलं होतं. पण ते उत्सुकता व आवड म्हणून उगीच इकडे तिकडे दुर्बिणीतून पाहत असतं.आजही त्यांना दुरवर एक छान हिरवगार बेट दिसले. उंच उंच डोंगर, आकाशात उडणारे पक्षी.छान अस वातावरण .ते त्या बेटावर दुर्बीण लावून पाहत होते आणि त्यांना अचानक ते दिसले.काही क्षणापुरत तर त्यांना खरेच वाटे ना.हे इथे,मला तर सांगण्यात आल होतं कि या बेटावर मानवी वस्ती नाही मग हे.हे कोण तर? समुद्र किनाऱ्यावर मुलं खेळताना त्यांना दिसली होती. त्यांना वाटलं आपल्याला भास होतोय.पण नाही खरचं त्यांना मुलं दिसली.ते परत परत पाहू लागले.ते पळतच क्रूस कडे गेले. त्यांनाही दाखवलं. ते ही आश्चर्य चकीत झाले.त्यांनी जहाज बेटा कडे न्यायला सांगितले.थोड्स पुढे गेल्यावर त्या मुला पैकी एक मुलगा पांढर कापड दाखवत असलेला दिसला.क्रुस वरची लोक म्हणू लागली. तिकडे जाणे धोक्याचे आहे. आपण तिकडे गेलो आणि त्या आदी मानवांनी हल्ला केला तर? नको जायला तिकडे.पण कैप्टन ऐकेनात.ते म्हणू लागले नाही अस काही होणार नाही. ते आपल्याला मदत मागत आहेत. आपल्याला गेलं पाहिजे. इकडे लुई जोरजोरात ओरडू लागला. " ऐ लुई काय झालं. का ओरडत आहेस? " " तिकडे बघा,मी दाखवलेल निशाण जहाज वर कोणीतरी पाहिलं आहे आणि जहाज इकडेच येत आहे." " ते ठिक आहे. मज्जाच येईल ते इकडे आले तर पण ते जहाज डाकूंचे तर नाही ना." आता खरचं कोण होते ते आणि मुलांन कडे येणार होते कि नाही. मुलं परत जातील कि नाही. क्रमशः सौ हेमा येणेगुरे पुणे

*"सेकंड हॅन्ड...."* एकाच घरात असं होवू शकतं ? होतं तर.. तिच्याच घरात चाललंय. गेली अनेक वर्ष. निदान तिला तरी तसंच वाटतंय. आईबापाला सगळी मुलं सारखीच. बहुधा नसावीत. तिचा नवरा आणि दीर. दोघंच भावंडं. त्यांचे वडील कुठल्या तरी कापडदुकानात दिवाणजी. परिस्थिती तशी बेताचीच. तरीही दोघं मुलं शिकली. तिचा दीर मोठा. हुशार, पहिला नंबरवाला. आईबापांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असा. जबराट महत्वाकांक्षी. प्रचंड मेहनती. गुणवत्तेच्या जोरावर ईन्जीनियर झाला. त्यामानानं तिचा नवरा जरा कमीच. खरा तोही हुश्शार. पण मोठ्याच्या सावलीत झाकोळलेला. आयुष्यभर मोठ्याची सेकंडहॅन्ड पुस्तके वापरत आला. पुस्तकातल्या शब्दांखालच्या खुणा पण त्याच्याच. याची पावलं त्याच पाऊलखुणांवर ऊमटत गेली. यानं सायकल वापरली तीही मोठ्या भावाचीच. सेकंडहॅन्ड... तिच्या नवर्यानं काॅमर्सला जावं , असं घरानं ठरवलेलं. तो गेलाही. तिच्या नवर्यानं आयुष्यात कुठलीच महत्वाकांक्षा ठेवली नव्हती. वाट वाकडी असली तरी तो बिचारा सरळच चालायचा. अर्थात एकदा वाट पकडली की शेवटपर्यंत सोडायची नाही , इतका मेहनती होताच तो. मोठा नोकरीला लागला. फाॅरेनला जायचा चान्स मिळाला. दोन वर्ष तिकडे राहून परत आला. मोठा फ्लॅट घेतला . गाडी झाली. तो पटापट वरच्या पायर्या गाठत होता. अर्थात तिचा नवराही पुढे चाललाच होता. पण पळत नव्हता. एम काॅम झाला.. नोकरीला लागला. त्याच्या मोठ्या भावाच्याच ओळखीनं. नोकरी करता करता अभ्यास चालूच होता. आय. सी. डब्ल्यू. ए. झाला. चांगला पगार होता. मोठ्यानं अजून मोठा फ्लॅट बुक केला. त्याचा जुना फ्लॅट तिच्या नवर्यानं घेतला. त्याच्या लोनच्या बजेटमधे बसत होता. ती मात्र प्रचंड अस्वस्थ. माझ्या नवर्याचं आयुष्यच सेकंड हॅन्ड झालंय. जुन्या पुस्तकांसारखा जुना फ्लॅट. ती त्या घरात सेटलच होत नव्हती. तिचे सासू सासरे हिच्याकडेच असायचे. तिकडला ऊच्चभ्रू शेजार झेपायचा नाही त्यांना. पण मुखी कौतुक नेहमी थोरल्याचं. आपला नवरा यांना काय प्लॅटफाॅर्मवर सापडला होता की काय ? या सावत्रपणाची तिडीक बसली होती तिच्या डोक्यात. तिच्या नवर्याला याचं काहीच वाटायचं नाही. आपला दादा हुशार.. दोघा भावात प्रचंड प्रेम. तशी तिची जाऊही प्रेमळ होती. ती मात्र नवर्याच्या सतत मागे लागायची. त्यानं काहीतरी महत्वाकांक्षा ठेवावी असं तिला नेहमी वाटायचं.. यावेळी दिवाळीत कार घ्यायचं ठरवलं होतं. पुरेसा पैसाही साठला होता. लाखभराचं लोन घेतलं असतं की नवी वॅगन आर. https://www.shrutimundada.com/2022/01/how-to-stop-overthinking.html ती दोघं त्याच्या भावाकडे गेलेली. सहज गाडीचा विषय निघाला. त्याच्या दादानेही सेदान कार बुक केलेली. तो म्हणाला , कशाला लोन काढतोस ? माझीच वॅगन आर घेवून जा. तीनच वर्ष वापरली गेलीय. तुला जमतील तसे आणि तितकेच पैसे दे. तिच्या नवर्याला लगेच पटलं. हिच्या मूडची पापडभाजी. माझा नवरा शेवटपर्यंत सेकंडहॅन्डच आयुष्य जगणार. नको... त्याची वहिनी ठाम नाही म्हणाली. का ते कुणालाच कळलं नाही.. विषय संपला. लोनची फाॅरमॅलिटी कंप्लीट झाली. नवीन वॅगन आर घरी आली सुद्धा. तिच्या आयुष्यातली पहिली फर्स्ट हॅन्ड गोष्ट. तिची अवस्था 'आज मै ऊपर आसमाँ नीचे'सारखी.. तीही हौसेने गाडी शिकली. महिनाभरानं तिच्या जाऊचा फोन. तुझ्या गाडीतून लाँग ड्राईव्हला जाऊ. सिंहगडाच्या पायथ्याशी तिनं गाडी थांबवली. "मनापासून अभिनंदन. आम्हाला दोघांनाही तुमच्याईतकाच आनंद झालाय. तुझी अवस्था समजू शकते मी. सेकण्डहॅन्डचं दुःख मीही भोगलंय माहेरी. दादाचीच पुस्तकं वापरायचे मी. पण खरं सांगू ? मला आनंदच वाटायचा त्यात. आपल्या दादाचा मायेचा हात आपल्या पाठीवर आहे. त्याचं बोट धरून, आपण कुठलंही संकट पार करू, असं वाटायचं. आपल्याकडे तसंच आहे. दोघा भावांच्या मनात ,सेकण्ड हॅन्डचा विषयही नसतो कधी. पण कधी कधी प्रेमात वहावत जातात दोघं. म्हणूनच मी यावेळी गाडीला नाही म्हणलं. फ्रर्स्ट हॅन्डची नशा वेगळीच. अजून एक... तुझा नवरा माझा धाकटा भाऊच. तुझ्या आधीपासून ओळखते मी त्याला. हुशार आहे. पण टारगेट ठेवून पुढं जायचा स्वभाव नाही त्याचा. तू ते नक्की करू शकतेस... आणि करतेसही . फक्त ते करताना, आयुष्यातले हे सोनेरी दिवस कुर्बान करू नकोस. आपण रेसमध्ये पळत नाही आहोत. कशाला पुढे मागेचा विचार करायचा. मी या घरच्या काॅलेजमधली सिनियर आहे तुझी.. चार अनुभवाच्या गोष्टी सांगेनच. जमेल तिथे मदतही करणार. तुझा स्वाभिमान न दुखावता. फक्त स्वाभिमान आणि ईगोची तू गल्लत करू नकोस. दादाचा मायेचा हात ,कधीही सेकण्ड हॅन्ड नसतोच मुळी. तो फर्स्ट हॅन्डच.. राईट हॅन्ड. जाता जाता अजून एक. आईबाबांच्या बोलण्यावर जाऊ नकोस. त्यांना त्यांचे दोन्ही श्रावणबाळ सारखेच प्रिय आहेत. सो डोन्ट वरी. अॅन्ड हॅपी जर्नी " तिनं डोळ्यावरचा गाॅगल काढला. सगळं स्वच्छ दिसू लागलं. आपल्या शेजारच्या, जवळच्या मैत्रिणीकडे तिनं ऊघड्या डोळ्यांनी बघितलं. जाऊ बाई जोरात.. तिनं गाडी सुरू केली. "तुमची ती पिंक जाॅर्जेटची साडी हवीय मला एक दिवस. आमच्या भिशीला यावेळी पिंक कलर कोड ठरलाय. माझ्याकडे नेमकी ती शेड नाहीये." 'चल लगेच घरी...' सेकंड गिअर टाकत तिनं सेकण्ड हॅन्डचा विषय संपवून टाकला... कायमचा. साथी हाथ बढाना... *......कौस्तुभ केळकर नगरवाला.* *माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.*

*मी का बदलले* *..६.. हेतल* ही घटना १९९४-९५ ची आहे. हेतलला मैत्रिणपेक्षा सहप्रवासी म्हणणे योग्य होईल. मी साधारण सकाळी ०९:१५ ते ०९:३० पर्यंत ची जी मिळेल ती गाडी पकडे. नऊ डब्याची गाडी असे फार गर्दी असे गाडीत चढायला. मी स्टेशनवर पोहोचायच्या आधीच पाच सहा १६-१७ वर्षाच्या पाच सहा मुली स्टेशनवर असतं त्यातील एका मुलीला (हेतलला) भेटायला एक छपरी, टपोरी वाटणारा मुलगा येत. त्या मुलीला जरा जास्तच सर्वांचे लक्ष वेधून (attention seeking) घ्यायची सवय होती, ती जोरजोरात हसे, ती हसली रे हसली की तो मुलगा तिला टाळी देण्याच्या बाहाण्याने अगदी नको तिकडे हात लावी. फार म्हणजे फारच अती (त्याकाळी, हल्ली हे कॉमन झाले आहे). सगळे प्रवासी कुजबुजत, त्या मुली दोनतीन गाड्या सोडी. आम्ही मिळेल त्या गाडीने जात. एकदा त्या मुली गाडीत चढल्या व मी धावत पळत गाडी पकडायला आले, पण हेतल गाडी चा रोड धरून त्या मुलाशी बोलत उभी होती, ना आत जात होती ना मला चढायला जागा देत होती. ती मस्त गप्पात व हातवारे करण्यात, टाळ्या खात हसत होती. मी जरा चिडूनच आवाज वाढवून 'आत जा नाही तर मला चढू दे मग रोडवर लटक' म्हणाले. तीने अंग चोरुन मला चढायला जागा दिली. बर्याच दिवसांपासून तिला समजावून सांगावे वाटते होते, पण ती गाडीत चढत नसे, मला मिळालेली संधी म्हणून मी तिला म्हणाले माझ्या बंबंया हिंदीत 'अगं घरातील किती विश्वासाने शिकायला तूला पाठवतात. तूला हे शोभत नाही' ती बेफिकीरने मानेला झटका देत म्हणाली 'जमाना बदल गया है आंटी' (त्याकाळी पेरेशूट तेलाच्या जाहीरातीची फेमस टॅगलाईन होती). मी म्हणाले 'अच्छा तो अभी बच्चा आदमीको होता है, औरत को नहीं क्या ? मैं पुराने जमानेकी हूं ना मुझे मालूम ही नहीं,' ती उसळून म्हणाली, 'आप तो बात का बतंगड कर रही हो' मी म्हणाले 'हां कर रहीं हूं, तू भी तूझे जो आजादी मिली है उसका गैरफायदा ले रही हो. तेरे बदनको वह लडका सरेआम कहां कहां छूता है, हमें शरम आती है देखने को, तूझे जरा भी शरम नहीं आती क्या? तेरे पिताजीभी तेरे मां को इतनी बार छुते हूये तूने देखा हैं क्या? जानबुझकर वह तूझे कहां कहा हात लगाता है क्या तू रोक नहीं सकती?'. गाडीतील दहिसरच्या बर्याच बाया मला म्हणाल्या 'काय फायदा पडणार नाही. निलाजरी झाली आहे ती. रोजचेच नाटक आहे तिचे'. अंधेरी स्टेशनवर त्या मुली उतरल्या. मला दादरला जायचे होते. जवळपास दादर पर्यंत हाच विषय होता व बर्याच जणीमला म्हणाल्या उगीचच बोललात, तीचे संस्कारच वाईट असतील, तो मुलगा मवाली आहे त्याला कळले तर तो मारेल ही वैगरे वैगरे म्हणाले. मी म्हणाले, 'मला ही एक लेक आहे. आता ती फार लहान आहे. मोठी झाल्यावर बाहेर ती काय करेल मला काय माहीत नाही. मी योग्य संस्कार द्यायचा प्रयत्न करते. पण घर की मुर्गी डाल बराबर असते. जर माझी मुलगी कुठं चुकीचे वागली, तर देव तिला समजावून सांगणारी मावशी देवो. तूम्हा सगळ्यांना त्या दोघांचे सार्वजनिक ठिकाणी वागणे चुकीचे वाटते फक्त मी ते तिला तिच्या तोंडावर स्पष्ट व्यक्त केले. त्या मुलाची मला तरी जरा्रासुध्दा भिती वाटत नाही.' त्यानंतर ही त्या मुलीचा घोळका स्टेशनवर असे, तो मुलगा ही येत पण इतर मैत्रिणीच बहुतेक तिला ओरडत असाव्यात, त्यात मला पाहील्यावर तर ती फार सावध होई व त्या मुलाला कटाक्षाने अंगाला हात लावू देत नव्हती. माझ्या मैत्रिणी व इतर सहप्रवासी डोळ्यांनी खाणाखुणा करून मला मुद्दाम हे निदर्शनास आणून देत. मला एक चांगली की वाईट माहित नाही एक सवय आहे, मी नेहमी स्वतःहून शुभदिन म्हणत सर्वांना अभिवादन करते, अगदी प्रतीसाद मिळाला नाही तरी तसा त्या मुलींनाही मी करे. त्या मुली ही हास्य करू लागल्या. मग पुढील महीनाभरात मला सर्व मुलींची नावे कळली. एक दिवस हेतल म्हणाली तिच्या चुलत भावाचे सुरत येथे लग्न आहे. घरात ही एकच मुलगी (चार काकांना फक्त मुलगेच), तिला हळदीत, वरातीत नाचायचे होते, खूप खरेदी केली आहे चार दिवस सुरतला जाणार आहे वैगरे सांगितले. https://www.shrutimundada.com/2022/01/how-to-stop-overthinking.html पंधरा दिवस गेले असतील, तिच्या एका मैत्रिणीने मला हळूच सांगितले हेतलला तूम्हाला भेटायचे आहे. मी म्हणाले गाडीत का येत नाही? ती म्हणाली तूम्हाला तीच सांगेल. तूम्ही कधी तिला भेटू शकता? मी म्हणाले माझा पत्ता देते घरी भेटेन संध्याकाळी कामावरून आल्यावर. ती म्हणाली उद्या सांगते. दुसऱ्या दिवशी तिने आज संध्याकाळी दहिसर पश्चिमच्या विठ्ठल मंदिराजवळ भेटायला येईल ती असा निरोप दिला. मी मंदिराजवळच रहाते त्यामुळे मला काही कष्टदायक नव्हते. संध्याकाळी मी देवळाजवळ गेले. देवळात भजन चालू होते मी तिला माझ्या घरी चल म्हणाले ती म्हणाली नको घरात इतर माणसे असतील तर मला मोकळेपणाने बोलता येणार नाही म्हणून आम्ही देवळाच्या बाजूला दिव्यांचा ओटा आहे त्याच्या कोपारात आडोश्याला बसलो. मी विचारलं 'लग्न कसं झालं?' ती रडू लागली व म्हणाली लग्न फार म्हणजे फारच (ग्रांड) झकास झाले. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे तिच्या माहेरीही जाऊन आलो. घरी आल्यावर कपडे बदलायला म्हणून खोलीत गेली व तिने स्वतःला आग लावून घेतली. तिला वाचवण्यासाठी खोलीचे दार फोडावे लागले, भावालाही भाजून फार इजा झाली. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केल्याने पोलिस केस झाली. पण नशिबाने तीने चिठ्ठी लिहून ठेवली होती व तिच्या आईवडिलांनीही मान्य केले की तिचे एका मुलाबरोबर प्रेम होते व घरून विरोध होता. हे लग्न न केल्यास आईने जीव देईन अशी धमकी दिली म्हणून तिने लग्न केले. लग्नानंतर फक्त दोन दिवसात दोन्ही कुटुंबे उध्वस्त झाले. तिचा चुलत भाऊ (नवरदेव) मानसिक धक्क्यातून अजून सावरला नाही. आंन्टी (मी शक्यतो कोणालाही मला मॅडम, आंन्टी म्हणण्यापासून रोखते. मला ताई, बाई काकी, आज्जी काहीही बोलवले तर चालते.) माझ्या भावाची स्थिती पाहून मी जागी झाले. भाऊने पोलिसांना ही सांगितले 'तीने मला बोटही लावू दिले नाही. लग्नातील विधी व्यतिरिक्त तीने त्याला स्पर्श ही करू दिला नाही. साखरपुडा झाल्यावर दोनदा ते भेटले तेव्हांही'. आंन्टी, तूमची खूप आठवण आली. ती लग्न होऊन ही भावाला परके मानून त्याला स्पर्श करू देत नव्हती. तिच्या मनात असलेल्या भावना मला कळाल्या नाही. पण एक लक्षात आले तूम्ही ओरडल्यापासून मी माझ्या मित्राला मला स्पर्श करू देत नाही म्हणून तोही मला टाळू लागला होता. आंन्टी मी विचार करतच होते खरंच आमचे प्रेम होते की फक्त तरूण सुलभ स्पर्शाची ओढ. आंन्टी, सतत डोळ्यासमोर जळणारी नखशिखांत नटलेली सुंदर,तरुण वहीनी दिसते. माझ्या पेक्षा दोन महिन्यांनी मोठी होती ती. मला वाटतं आमचे जे होते ते नक्कीच प्रेम नाही. आता मला ही त्याला भेटायचे नाही म्हणून मी स्टेशनवर यायला टाळले. तशी माझी त्याची स्टेशनवरचीच चार पाच महिन्यांची ओळख. आमच्या गावी माझ्या लग्नाबाबत बोलणी सुरू झाल्या आहेत. मी खूप विचार केला तसा मलाही शिकण्यात फार रस नाही. मी काही चुक केली तर दोन कुटुंबे उध्वस्त होतील. माझ्या भावाला, काका, काकूंना अगदी आई वडिलांना फार मानसिक धक्का बसला आहे, पुर्ण कोलमडून पडले आहेत सगळे. तूम्ही म्हणालात तेच खरे, माझे पालक फार विश्वासाने मला कॉलेजला पाठवत होते व मी चुक करत होते.'. मी म्हणाले 'अगं शिक्षण तरी पुर्ण कर. लहान आहेस तू'. ती म्हणाली, 'आमच्यात लवकर लग्न करतात. मी आता कॉलेजला न जाता आमच्या पारंपरिक व्यवसायातील शिक्षण करणार'. आंन्टी मला लवकर सुरतलाच आमच्या एकत्र कुटुंबात पाठवणार आहेत. आमचा चिवडा, खाकरा व मसाल्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यात लक्ष देईन. लवकरच माझे लग्न होईल. मला आशिर्वाद द्या यापुढे माझ्याकडून कोणतीही चुक न घडो'. मी म्हणाले 'नाही घडणार बाळा, जरी घडलीच तर माझ्या सारखी कोणी रागवणारी भेटेल.' हेतल त्यानंतर मला भेटली नाही. पण तिच्या मैत्रिणी कडून तिचे लग्न झालेले कळले. एका सुंदर,तरुणीच्या आत्महत्येने हेतल पुर्ण बदलली. देवाने तीचे भलेच केलं असेल. माझ्या सर्वांशी बोलण्याच्या सवयीमुळे, सततच्या बदलीमुळे व न्यायालयातील नोकरीमुळे अनेक जणींचे बदल मी ऐकले, अनुभवले. पुर्वी मोबाईल नव्हते त्यामुळे बर्याच जणींचे नेमके आता काय चाललंय हे माहीत नाही. माझ्या प्रमाणे अनेकांना अवतीभवती नक्कीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा अनुभव मिळत असेल वेळे अभावी कोणी लिहीत नसेल. पण वेळात वेळ काढून माझे शब्दांकन वाचता, त्याला दाद देता याबद्दल मी आपली ऋणी आहे. पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन घडलेले लिहीताना काही स्थळ, काळ, वेळ चुकत असतील ही. माझे आजपर्यंतचे आयुष्य लहानपण-माहेर टिळकनगर चेंबूर व सासर दहिसर त्यामुळे येथीलच अनुभव आहेत. बर्याच मैत्रिणी ह्या फार कमी कालावधीतील रेल्वे प्रवासातील सहप्रवासीच जास्त. (मी २०१० नंतर कैंसरनंतर विकलांग डब्यात जाऊ लागले) माझ्या बदलीमुळे किंवा इतर कारणांमुळे पुढे बर्याच जणी फक्त आठवणीतच भेटतात. पुन्हा एकदा तूम्हा सर्वांची मी मनापासून ऋणी आहे. तूम्ही दाद देता म्हणूनच त्यांचे अनुभव मी माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न करते.❤️ उमा योगेश्वर कामत टिप: माझ्या ओळखीच्या अनेक मैत्रिणींच्या त्या कश्या व का बदलल्या अगदी १०० सत्यकथा किंवा व्यथा शब्दांकन माझे लिहायचे ठरवले आहे.

. .... ... *२८ फेब्रुवारी* .. *राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व* *२८ फेब्रुवारी १९२८ हा दिवस* भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. प्रत्येक भारतीय माणसाचा ऊर स्वाभिमानाने भरून येण्याचा तो प्रसंग होता. याच दिवशी प्राध्यापक *सर डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन* यांचा नोबेल पारितोषिक विजेता प्रयोग यशस्वी झाला. त्यांना अपेक्षित असलेल्या निष्कर्षाचा पुरावा प्रत्यक्ष व नि:संदिध्दपणे हाती आला तो हाच दिवस. या यशस्वी संशोधनाची अवघ्या तीन महिन्यात *ब्रिटिश साम्राज्याच्या बादशाहाने म्हणजेच *पंचम जॉर्ज* ने दखल घ्यावी, इतका महत्त्वाचा तो शोध होता. म्हणून च पंचम जॉर्ज यांनी *प्रा. सी. व्ही. रामन* यांना *दि. ०३ जून १९२८ ला सर हा किताब बहाल केला*. *आकाश निळे कां आहे ?* याचे गुपित उलघडवून दाखविणारा हा अतिशय महत्त्वाचा शोध ज्याचे नांव आहे *प्रकाश लहरींचे विकिरण* अर्थातच *रामन परिणाम*. . या वैज्ञानिक प्रयोगाची अनुमाने व निष्कर्ष इतके महत्त्वाचे होते की रामन परिणामा च्या शोधानंतर अवघ्या अडीच वर्षात वैयक्तीक कामगिरी साठी सर्वोच्च बहुमान समजला जाणारा *नोबेल पुरस्कार त्यांना १९३० मध्ये* मिळाला. कित्येक वैज्ञानिकांना हा बहुमान प्राप्त करण्यासाठी त्यांच्या शोधानंतर तीस चाळीस वर्षे वाट पाहावी लागली आहे. *प्राध्यापक रामन हे पदार्थ विज्ञान (भौतिक ) शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे आशिया खंडातील विज्ञान शाखेतील पहिलेच शास्त्रज्ञ होय* https://www.shrutimundada.com/2022/02/c-v-raman.html हा शोध डॉ. रामन यांनी कलकत्ता विद्यापीठातील *इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायंन्स* या संस्थेच्या जुनाट प्रयोग शाळेत प्राध्यापकी करत असतांना लावला, हे विशेष. त्यावेळी भारतीय प्रयोग शाळांमध्ये असणाऱ्या सुविधा व उपकरणे अन्य देशांच्या मानाने अगदीच तुटपुंज्या होत्या. *प्रयोगाची बहुतेक उपकरणे व साधने त्यांनी स्वतः च आरेखन करून संस्थेच्या कार्यशाळेत तयार केली होती*. एक वर्णपटदर्शक, काही फोटो फिल्म, त्या धुण्याची रसायने व एक मर्क्युरी दिवा. बस! नैसर्गिक सूर्य प्रकाश सोबतीला होताच. या सर्व *उपकरणासाठी त्यावेळी त्यांना फक्त ₹ २००/- खर्च आला होता*. द्रवातून जाताना रामन परिणामा मुळे निर्माण झालेला विकिरीत प्रकाश मूळ प्रकाशाच्या १/१००००० (एक लक्षांश) इतका क्षीण असतो, याचेही त्यांनी अचूक मोजमापन केले होते, हे कौतुकास्पद आहे. आतापर्यंत भारतीयांना १२ नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. श्री *रविंद्रनाथ टागोर* (साहित्य १९१३), आणि डॉ. सर *चंद्रशेखर व्यंकट रामन* (पदार्थ विज्ञान १९३०) हे *खरेखुरे भारतीय मानकरी*. अन्य डॉ हरगोबिंद खुराणा (चिकित्सा.१९६८), मदर टेरेसा, जन्म युगोस्लाव्हिया पण भारतीय नागरिकत्व, (१९७९), डॉ. चंद्रशेखर सुब्रमण्यम (पदार्थ विज्ञान-१९८३), अमर्त्य सेन (१९९८), वेंकटरमन रामक्रुष्णम् (रसायन-२००९), कैलाश सत्यार्थी (२०१४), अभिजीत बँनर्जी (२०१९), हे जन्माने भारतीय पण कामगिरी परदेशात, डॉ. व्हि.एस.नॉयपॉल (२००१) जन्म त्रिनिनाद पण भारतीय वंशाचा आणि रोनाल्ड रॉस (१९०२) रुडयार्ड किपलिंग (१९०७) भारतात जन्म पण विदेशी (इंग्लंड) . एकूण नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या पार्श्वभूमीवर, संपूर्णतः *भारतीय बनावटीच्या उपकरणाद्वारे, भारतातचं प्रायोगिक रित्या संशोधित केलेला आणि भारतातच जन्मलेल्या व शेवटपर्यंत भारतीय नागरिक असलेले डॉ रामन हे विज्ञान क्षेत्रातील एकमेव पारितोषिक विजेते आहेत*. या भारतमातेला जन्मभू, मात्रूभु व पुण्यभू समजणारे थोर वैज्ञानिक डॉ. सर रामन ह्यांच्या सन्मानार्थ व त्यांच्या अतुलनीय वैज्ञानिक शोधाची आठवण म्हणून १९८७ पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतभर उत्साहात साजरा केला जातो. *राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागचा उद्देश स्वयंस्पष्ट आहे*. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्याशिवाय व्यक्तीगत वा राष्ट्रीय जीवनमान उंचावत नाही. तसेच देशाचा सर्वांगिन विकास ही होत नाही. जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक, व जनता यांच्या मध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची रुची निर्माण व्हावी, त्यांनी अभ्यास करून स्वतः अनुभूती घ्यावी, सर्वांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करुन वाईट परंपरावर मात करता यावी ईत्यादी *उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी भारतीय समाजमनाला एखाद्या स्फूर्तीस्थानाची अत्यंत गरज होती*. तन- मन- धनाने व संस्काराने संपूर्ण भारतीय असलेले डॉ रामन हेच भारतीयांचे एकमेव स्फूर्ती व आदरस्थान होऊ शकतात, हे आम्हाला कळायला १९८७ साल उजाडले. त्यांचा नोबेल पारितोषिक विजेता शोध २८ फेब्रुवारी ला लागला, हे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानाचा प्रसार व प्रचार देशाच्या कानाकोपरात व्हावा हाच मुळ उद्देश आहे.

ट्रेनिंग व्हील्स ©® ज्योती रानडे "समय खाली बघू नको.. समोर बघ आणि सायकल चालव.. ट्रेनिंग व्हील्स नाहीत हे विसर! मी आहे मागे तुझ्या" बाबा सात वर्षांच्या समयला सायकल शिकवताना मागे पळत बोलत होते. दोन दिवसात समय उत्तम बॅलन्स करून सायकल चालवू लागला! आता समय दहावीत गेला होता. परमेश्वराने उत्तम बुध्दीचं वरदान दिलं होतं पण जे आपल्याजवळ आहे त्याची माणसाला किंमत नसते असे काहीसे होते. छप्पन प्रलोभनं त्याला खुणावत होती आणि तिकडे तो सतत ओढला जात होता. आईला या मुलाला योग्य वाटेवर कसा आणावा कळत नव्हते. “समय..फोन, सिनेमे, टेक्स्ट, विडिओ गेम्स यात फार वेळ जातो रे. तू आधी निबंध स्पर्धेचा निबंध संपव ना!” उत्तम लिखाण करू शकणाऱ्या समयने निबंधाला सुरूवातही केली नव्हती. “करतो ग! भरपूर वेळ आहे, आई!” समयला कशाचीच घाई नव्हती. “समय, वेळेचा सदुपयोग कसा करायचा यावरच निबंध लिहायचा आहे ना?”आईने परत एकदा प्रयत्न केला. “मम्मा डियर, प्लीज ग!” समय चक् चक् आवाज करत कसलीशी विडिओ गेम खेळू लागला.. समय पटकन महत्वाच्या गोष्टी उरकून का टाकत नाही आईला कळत नव्हते. त्यात तो फोन सिंदाबादच्या मानेवर बसलेल्या म्हाताऱ्या सारखा या मुलांच्या मानगुटीवर बसलेला असतो. वेळेवर अभ्यास संपवावा म्हणून साम, दाम, दंड, भेद सर्व करून आई दमली होती. तिने कामाहून घरी येत असलेल्या नवऱ्याकडे हताश होऊन बघितले. “समय,” बाबा आत येत होते. .मेलो ..आईचं बोलणं थांबवत होतो. आता बाबांचे लेक्चर सुरू होईल म्हणून त्याने डोकं अजूनच फोनमध्ये खुपसलं. https://www.shrutimundada.com/2022/07/7-healthy-morning-rituals-unlimited.html “समय, राजे या की. जरा गप्पा मारू." बाबा कायम त्यांचे कपडे हँगरला लावत असत. "बाबा, होमवर्क करतोय हो. नंतर बोलू." "अरे, दहा मिनिटे ये ना!"बाबांनी अगदी विनवल्याने समय बाबांजवळ गेला. "काय म्हणतीये तुझी मैत्रीण? ती तांब्यांची ऋचा तुझे कौतुक करत होती असे तांबे म्हणाले. "ऋचा माझे कौतुक करत होती?" समय खुलला होता.. "काय म्हणाली?" "समय खरंच हुशार आहे.. त्याला टाइम मॅनॅजमेन्ट जमली असती तर तो नेहमी नंबरात आला असता असे काहीतरी म्हणाली.” बाबा खरे सांगत आहेत असं त्याला वाटले. “बाबा, हम खुद समय हैं। समय को टाईम मॅनेज करना नहीं मालूम? हा हा हा हा!” समयने डायलॉग मारला. "पण मला सांग ना..ती तुझ्या टाईम मॅनेजमेंट बद्दल का बोलली? तू वेळेवर गोष्टी करतोस ना? "वेळ" कसा वापरतोस तू? समयने केसातून हात फिरवला..मान वर करून क्षणभर विचार केला..मान तिरकी केली..आई दोघांसाठी चहा घेऊन आली.. "वेळ to me is.. जन्म व मृत्यु या दोन तारखांच्या मधली छोटीशी रेघ! वेळेचं मोजता येईल असे सगळ्यात छोटे युनिट म्हणजे सेकंद..जे अगदी लहानसे वाटते पण त्यात घडणाऱ्या गोष्टी खूप मोठ्या असतात.. आधी चहा घेऊ कारण..काही सेकंदात चहा गार होतो..हा हा हा! काही सेकंदात युक्रेन मधे बॉम्ब ब्लास्ट होऊन तान्ही बाळं जातात.. काही सेकंदात नेत्यांची तडजोडीची बोलणी फिसकटतात.. काही सेकंदात चालता बोलता माणूस राख होऊन जातो.. वेळ ही संपणारी गोष्ट नाही पण माणूस ही संपणारी गोष्ट आहे म्हणून वेळ महत्वाचा! एकेक क्षण जपून वापरायला हवा.. पण बाबा टाईम मॅनेजमेंट ही करून दाखवायची गोष्ट आहे..बोलायची गोष्ट नाही. Lead by example! "समय! मला सगळ्यात काय आवडले माहिती आहे? तू म्हणालास ना की तुम्ही टाईम कसा मॅनेज करता ही करून दाखवायची गोष्ट आहे..बोलायची गोष्ट नाही.. एकदा गांधीजींना भेटायला लोकांची रांग लागली होती. त्या रांगेत खूप मागे एक बाई तिच्या मुलाबरोबर उभी होती. खूप वेळाने ती बाई गांधींसमोर आली. तिने विचारले, "महाराज, आपण माझ्या मुलाला अति साखर खाऊ नये याबद्दल काही उपदेश कराल का?" गांधीजी म्हणाले, "बाई, दोन आठवडयांनी मला येऊन भेटा." दोन आठवडयांनी ती बाई मुलाला घेऊन गांधींकडे आली. गांधीजींनी त्याला अति साखर खाण्याचे दुष्परिणाम सांगितले. बाई धन्य झाली. गांधीजी तिला म्हणाले,”बाई, मी आपल्याला दोन आठवड्यांनी या म्हटले कारण मीच फार साखर खात होतो. आधी मी माझी साखर बंद केली आणि मग तुमच्या मुलाला उपदेश केला.मी जी चूक करत होतो ती न सुधारता मी त्याला कसा उपदेश करणार?" समयने मान डोलावली. कळले बाबा..Teach what you preach!" समय शाळेची वेळ झाल्याने बाहेर पडला. आई कौतुकाने बाबांकडे बघत होती.."अग, जे समयला करायचे आहे ते तू त्याला एकदा सांगत जा ..परत परत आठवण करू नको. फार तर फार काय होईल? मागे पडेल एवढचं ना?.. तुला आठवतंय समयला सायकल शिकवली तेव्हा तू म्हणाली होतीस की ती ट्रेनिंग व्हिल्स काढा आता.. चार वेळा पडेल पण त्याचा तो बॅलन्स शिकेल! मग आता आपण त्याची ट्रेनिंग व्हिल बनून सतत आधार देत राहिलो तर तो आपला आपण उभा कसा राहील?” दुसरे दिवशी शाळेतून घरी येताच समय बाबांकडे आला.. “बाबा, शाळेतल्या निबंध स्पर्धेत माझा दुसरा नंबर आलाय व माझा निबंध स्टेट स्पर्धेसाठी पुढे पाठवत आहेत...पण मी हा निबंध पुढच्या स्पर्धेसाठी पाठवू नका म्हणून सांगितलं.. "का रे"? आईला उलगडत नव्हते.. "मी जर माझा वेळ जसा वापरायला हवा तसा वापरत नसलो तर त्यावर निबंध लिहून बक्षीस मिळवणे हे ढोंग आहे..आधी मी स्वत: वेळेचा सदुपयोग करायला शिकेन व नंतर त्यावर लिहेन..गांधीजीं सारखं! पहिला निबंध ज्याचा आहे ना तो केशव कुंभारवाड्यात राहतो व त्याच्या बाबांना मडकी बनवण्यास मदत करतो..ती विकायला बाजारात जातो.. तिथं गिऱ्हाईक नसताना अभ्यास करतो. रात्री कुंभारवाड्यातील इतर मुलांना शिकवून स्वत:चा अभ्यास करतो आणि तरी बरे मार्क मिळवतो. यावरच त्याचा निबंध होता." ..तो त्यांच्या खोलीत गेला व परीक्षेच्या अभ्यासाला बसला.. फोन चक्क हॉल मध्ये चार्जिंगला लावून.. आई बाबा एकमेकांकडे बघून समाधानाने हसले.. आज समय ट्रेनिंग व्हील्स शिवाय तोल सांभाळत व्यवस्थित उभे राहायला शिकला होता.. ©® ज्योती रानडे 2024 बाबा JyotiRanade. All rights reserved.

*🚩शिवचरित्रमाला 🚩* *🔖भाग ५*, *🏇यह तो पत्थरों की बौछार है!🏇* बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनिशी पसार झाले। ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती. भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता. पण बाजी जेध्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले. ते ही गडावर आले. रात्रीची वेळ , पूर्ण विजय नव्हे , पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती. महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला हुकुम दिला की , पुरंदर गडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीग जागोजागी गोळा करून ठेवा। मावळे त्वरित कामाला लागले. डोंगरावर धोंड्यांना काय तोटा! उत्तर बाजूच्या तटावर धोंड्याचे लहानमोठे ढिगारे घडीभरात जमले. महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले , ‘ आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल। तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कुणीही त्याच्यावर कसलाही मारा करूनका। येऊ द्यात त्याला वर। आम्ही इशारत करू अन् मग तुम्ही शत्रूवर या मोठ्यामोठ्या धोंड्यांचा मारा करा. ‘ सोप्पं काम। स्वस्थ काम. शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं नव्हत. युद्ध साहित्यही कमी. मावळी सैन्यही कमी. त्यावर महाराजांनी ही दगडधोड्यांची लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा. पसाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे , सह्यादीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते. https://www.shrutimundada.com/2022/02/c-v-raman.html महाराजांचा अंदाज अचूक ठरला। उजाडत्या उजेडात फत्तेखान आपलं सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला. तुफान , प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता. आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पायउतार होऊन एकदम एल्गार करण्याचा हुकुम दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम हल्ला. शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडली. त्यांच्या युद्धगर्जना दणाणू लागल्या. पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते. चिडीचिप्प. ते दडलेले होते. फत्तेखानाची फौज गडावर धावून निघाली होती. गडाच्या निम्यापर्यंत चढलीही. अन् ऐन टप्प्यात शत्रू आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला. अन् गर्जना सुरूझाल्या. शिंगे धुत्कारूलागली. अन् मग ते लहानमोठे धोंडे गडावरून उतारावर धाड् धाड् धाड् उड्या घेत फत्तेखानच्या सैन्यावर तुटून पडले. एका का दोन! पाउसच. शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकीतच झालं. थडाथडा मार बसू लागला. कुणी मेलं , फारजण जखमी होऊ लागले. हा मारा सोसण्याच्या पलिकडचा होता. फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता। तो थक्कच झाला। अन् म्हणाला , ‘ यह तो पत्थरों की बौछार है! ‘ आता ? मावळ्यांना चेव आला होता। केवळ दगड धोंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिम हैराण केला होता. गनिम आरडत ओरडत तोंड फिरवून गडाच्या पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला होता. उड्या मारीत , पडत , घसरत , दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं गेलं होतं. जणू वादळातला पालापाचोळा. या फत्तेखानाची आता फळी फुटली होती. महाराज आपल्या सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले. अखेर फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला. येथून सासवड फक्त १० कि. मी.वर. गनिम सासवड गावात आश्ायाला घुसला. मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले. फत्तेखान कसाबसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता. विजापूरच्या दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाचवेळी पार उधळून लावलं होतं. फत्तेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानिशी कमीतकमी वेळात , कमीत कमी युद्धसाहित्यानिशी , पूर्ण पराभव केला होता. कोणची ही जादू ? कुणाचा हा चमत्कार ? हा गनिमीकाव्याच्या शक्तीयुक्तीचा परिणाम , जादू , चमत्कार. विचारपूर्वक आपल्या लहानशा शक्तिनिशी प्रचंड शाहीशक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांचे चिंतन इथं दिसून येतं. -शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

कदाचित माहीत नसेल, पण मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे. आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे. इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत. Follow the Yuti's Hub Library channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y क, ख, ग, घ, ङ - यांना *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा. च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते. एकदा करून बघा ट, ठ, ड, ढ , ण- यांना *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा. त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते. एकदा म्हणून बघा. प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा . ________________________ आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल. जय मराठी ! क,ख,ग काय म्हणतात बघू जरा .... •••••••••••••••••••••••••••••••••••• क - क्लेश करू नका ख- खरं बोला ग- गर्व नको घ- घमेण्ड करू नका च- चिँता करत राहू नका छ- छल-कपट नको ज- जवाबदारी निभावून न्या झ- झुरत राहू नका ट- टिप्पणी करत राहू नका ठ- ठकवू नका ड- डरपोक राहू नका ढ- ढोंग करू नका त- तंदुरुस्त रहा थ- थकू नका द- दिलदार बना ध- धोका देऊ नका न- नम्र बना प- पाप करू नका फ- फालतू कामे करू नका ब- बडबड कमी करा भ- भावनाशील बना म- मधुर बना य- यशस्वी बना र- रडू नका ल- लालची बनू नका व- वैर करू नका श- शत्रुत्व करू नका ष- षटकोणा सारखे स्थिर रहा स- सत्य बोला ह- हसतमुख रहा क्ष- क्षमा करा त्र- त्रास देऊ नका ज्ञ- ज्ञानी बना !! कृपया महाराष्ट्रातील सर्वांना अभिमानाने पाठवा. *🙏🏻#मराठी बोलु अभिमानाने*🙏🏻 🌹मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठमोळ्या शुभेच्छा 🌹 🙏 *जयहिंद,जय महाराष्ट्र* 🙏