Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
February 28, 2025 at 03:21 AM
. .... ... *२८ फेब्रुवारी* .. *राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व* *२८ फेब्रुवारी १९२८ हा दिवस* भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. प्रत्येक भारतीय माणसाचा ऊर स्वाभिमानाने भरून येण्याचा तो प्रसंग होता. याच दिवशी प्राध्यापक *सर डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन* यांचा नोबेल पारितोषिक विजेता प्रयोग यशस्वी झाला. त्यांना अपेक्षित असलेल्या निष्कर्षाचा पुरावा प्रत्यक्ष व नि:संदिध्दपणे हाती आला तो हाच दिवस. या यशस्वी संशोधनाची अवघ्या तीन महिन्यात *ब्रिटिश साम्राज्याच्या बादशाहाने म्हणजेच *पंचम जॉर्ज* ने दखल घ्यावी, इतका महत्त्वाचा तो शोध होता. म्हणून च पंचम जॉर्ज यांनी *प्रा. सी. व्ही. रामन* यांना *दि. ०३ जून १९२८ ला सर हा किताब बहाल केला*. *आकाश निळे कां आहे ?* याचे गुपित उलघडवून दाखविणारा हा अतिशय महत्त्वाचा शोध ज्याचे नांव आहे *प्रकाश लहरींचे विकिरण* अर्थातच *रामन परिणाम*. . या वैज्ञानिक प्रयोगाची अनुमाने व निष्कर्ष इतके महत्त्वाचे होते की रामन परिणामा च्या शोधानंतर अवघ्या अडीच वर्षात वैयक्तीक कामगिरी साठी सर्वोच्च बहुमान समजला जाणारा *नोबेल पुरस्कार त्यांना १९३० मध्ये* मिळाला. कित्येक वैज्ञानिकांना हा बहुमान प्राप्त करण्यासाठी त्यांच्या शोधानंतर तीस चाळीस वर्षे वाट पाहावी लागली आहे. *प्राध्यापक रामन हे पदार्थ विज्ञान (भौतिक ) शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे आशिया खंडातील विज्ञान शाखेतील पहिलेच शास्त्रज्ञ होय* https://www.shrutimundada.com/2022/02/c-v-raman.html हा शोध डॉ. रामन यांनी कलकत्ता विद्यापीठातील *इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायंन्स* या संस्थेच्या जुनाट प्रयोग शाळेत प्राध्यापकी करत असतांना लावला, हे विशेष. त्यावेळी भारतीय प्रयोग शाळांमध्ये असणाऱ्या सुविधा व उपकरणे अन्य देशांच्या मानाने अगदीच तुटपुंज्या होत्या. *प्रयोगाची बहुतेक उपकरणे व साधने त्यांनी स्वतः च आरेखन करून संस्थेच्या कार्यशाळेत तयार केली होती*. एक वर्णपटदर्शक, काही फोटो फिल्म, त्या धुण्याची रसायने व एक मर्क्युरी दिवा. बस! नैसर्गिक सूर्य प्रकाश सोबतीला होताच. या सर्व *उपकरणासाठी त्यावेळी त्यांना फक्त ₹ २००/- खर्च आला होता*. द्रवातून जाताना रामन परिणामा मुळे निर्माण झालेला विकिरीत प्रकाश मूळ प्रकाशाच्या १/१००००० (एक लक्षांश) इतका क्षीण असतो, याचेही त्यांनी अचूक मोजमापन केले होते, हे कौतुकास्पद आहे. आतापर्यंत भारतीयांना १२ नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. श्री *रविंद्रनाथ टागोर* (साहित्य १९१३), आणि डॉ. सर *चंद्रशेखर व्यंकट रामन* (पदार्थ विज्ञान १९३०) हे *खरेखुरे भारतीय मानकरी*. अन्य डॉ हरगोबिंद खुराणा (चिकित्सा.१९६८), मदर टेरेसा, जन्म युगोस्लाव्हिया पण भारतीय नागरिकत्व, (१९७९), डॉ. चंद्रशेखर सुब्रमण्यम (पदार्थ विज्ञान-१९८३), अमर्त्य सेन (१९९८), वेंकटरमन रामक्रुष्णम् (रसायन-२००९), कैलाश सत्यार्थी (२०१४), अभिजीत बँनर्जी (२०१९), हे जन्माने भारतीय पण कामगिरी परदेशात, डॉ. व्हि.एस.नॉयपॉल (२००१) जन्म त्रिनिनाद पण भारतीय वंशाचा आणि रोनाल्ड रॉस (१९०२) रुडयार्ड किपलिंग (१९०७) भारतात जन्म पण विदेशी (इंग्लंड) . एकूण नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या पार्श्वभूमीवर, संपूर्णतः *भारतीय बनावटीच्या उपकरणाद्वारे, भारतातचं प्रायोगिक रित्या संशोधित केलेला आणि भारतातच जन्मलेल्या व शेवटपर्यंत भारतीय नागरिक असलेले डॉ रामन हे विज्ञान क्षेत्रातील एकमेव पारितोषिक विजेते आहेत*. या भारतमातेला जन्मभू, मात्रूभु व पुण्यभू समजणारे थोर वैज्ञानिक डॉ. सर रामन ह्यांच्या सन्मानार्थ व त्यांच्या अतुलनीय वैज्ञानिक शोधाची आठवण म्हणून १९८७ पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतभर उत्साहात साजरा केला जातो. *राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागचा उद्देश स्वयंस्पष्ट आहे*. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्याशिवाय व्यक्तीगत वा राष्ट्रीय जीवनमान उंचावत नाही. तसेच देशाचा सर्वांगिन विकास ही होत नाही. जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक, व जनता यांच्या मध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची रुची निर्माण व्हावी, त्यांनी अभ्यास करून स्वतः अनुभूती घ्यावी, सर्वांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करुन वाईट परंपरावर मात करता यावी ईत्यादी *उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी भारतीय समाजमनाला एखाद्या स्फूर्तीस्थानाची अत्यंत गरज होती*. तन- मन- धनाने व संस्काराने संपूर्ण भारतीय असलेले डॉ रामन हेच भारतीयांचे एकमेव स्फूर्ती व आदरस्थान होऊ शकतात, हे आम्हाला कळायला १९८७ साल उजाडले. त्यांचा नोबेल पारितोषिक विजेता शोध २८ फेब्रुवारी ला लागला, हे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानाचा प्रसार व प्रचार देशाच्या कानाकोपरात व्हावा हाच मुळ उद्देश आहे.
🙏 ❤️ 👍 4

Comments