
Yuti's Hub Library
March 1, 2025 at 05:29 AM
*मी का बदलले*
*..६.. हेतल*
ही घटना १९९४-९५ ची आहे. हेतलला मैत्रिणपेक्षा सहप्रवासी म्हणणे योग्य होईल. मी साधारण सकाळी ०९:१५ ते ०९:३० पर्यंत ची जी मिळेल ती गाडी पकडे. नऊ डब्याची गाडी असे फार गर्दी असे गाडीत चढायला. मी स्टेशनवर पोहोचायच्या आधीच पाच सहा १६-१७ वर्षाच्या पाच सहा मुली स्टेशनवर असतं त्यातील एका मुलीला (हेतलला) भेटायला एक छपरी, टपोरी वाटणारा मुलगा येत. त्या मुलीला जरा जास्तच सर्वांचे लक्ष वेधून (attention seeking) घ्यायची सवय होती, ती जोरजोरात हसे, ती हसली रे हसली की तो मुलगा तिला टाळी देण्याच्या बाहाण्याने अगदी नको तिकडे हात लावी. फार म्हणजे फारच अती (त्याकाळी, हल्ली हे कॉमन झाले आहे). सगळे प्रवासी कुजबुजत, त्या मुली दोनतीन गाड्या सोडी. आम्ही मिळेल त्या गाडीने जात.
एकदा त्या मुली गाडीत चढल्या व मी धावत पळत गाडी पकडायला आले, पण हेतल गाडी चा रोड धरून त्या मुलाशी बोलत उभी होती, ना आत जात होती ना मला चढायला जागा देत होती. ती मस्त गप्पात व हातवारे करण्यात, टाळ्या खात हसत होती. मी जरा चिडूनच आवाज वाढवून 'आत जा नाही तर मला चढू दे मग रोडवर लटक' म्हणाले. तीने अंग चोरुन मला चढायला जागा दिली. बर्याच दिवसांपासून तिला समजावून सांगावे वाटते होते, पण ती गाडीत चढत नसे, मला मिळालेली संधी म्हणून मी तिला म्हणाले माझ्या बंबंया हिंदीत 'अगं घरातील किती विश्वासाने शिकायला तूला पाठवतात. तूला हे शोभत नाही' ती बेफिकीरने मानेला झटका देत म्हणाली 'जमाना बदल गया है आंटी' (त्याकाळी पेरेशूट तेलाच्या जाहीरातीची फेमस टॅगलाईन होती). मी म्हणाले 'अच्छा तो अभी बच्चा आदमीको होता है, औरत को नहीं क्या ? मैं पुराने जमानेकी हूं ना मुझे मालूम ही नहीं,' ती उसळून म्हणाली, 'आप तो बात का बतंगड कर रही हो' मी म्हणाले 'हां कर रहीं हूं, तू भी तूझे जो आजादी मिली है उसका गैरफायदा ले रही हो. तेरे बदनको वह लडका सरेआम कहां कहां छूता है, हमें शरम आती है देखने को, तूझे जरा भी शरम नहीं आती क्या? तेरे पिताजीभी तेरे मां को इतनी बार छुते हूये तूने देखा हैं क्या? जानबुझकर वह तूझे कहां कहा हात लगाता है क्या तू रोक नहीं सकती?'. गाडीतील दहिसरच्या बर्याच बाया मला म्हणाल्या 'काय फायदा पडणार नाही. निलाजरी झाली आहे ती. रोजचेच नाटक आहे तिचे'. अंधेरी स्टेशनवर त्या मुली उतरल्या. मला दादरला जायचे होते. जवळपास दादर पर्यंत हाच विषय होता व बर्याच जणीमला म्हणाल्या उगीचच बोललात, तीचे संस्कारच वाईट असतील, तो मुलगा मवाली आहे त्याला कळले तर तो मारेल ही वैगरे वैगरे म्हणाले. मी म्हणाले, 'मला ही एक लेक आहे. आता ती फार लहान आहे. मोठी झाल्यावर बाहेर ती काय करेल मला काय माहीत नाही. मी योग्य संस्कार द्यायचा प्रयत्न करते. पण घर की मुर्गी डाल बराबर असते. जर माझी मुलगी कुठं चुकीचे वागली, तर देव तिला समजावून सांगणारी मावशी देवो. तूम्हा सगळ्यांना त्या दोघांचे सार्वजनिक ठिकाणी वागणे चुकीचे वाटते फक्त मी ते तिला तिच्या तोंडावर स्पष्ट व्यक्त केले. त्या मुलाची मला तरी जरा्रासुध्दा भिती वाटत नाही.'
त्यानंतर ही त्या मुलीचा घोळका स्टेशनवर असे, तो मुलगा ही येत पण इतर मैत्रिणीच बहुतेक तिला ओरडत असाव्यात, त्यात मला पाहील्यावर तर ती फार सावध होई व त्या मुलाला कटाक्षाने अंगाला हात लावू देत नव्हती. माझ्या मैत्रिणी व इतर सहप्रवासी डोळ्यांनी खाणाखुणा करून मला मुद्दाम हे निदर्शनास आणून देत. मला एक चांगली की वाईट माहित नाही एक सवय आहे, मी नेहमी स्वतःहून शुभदिन म्हणत सर्वांना अभिवादन करते, अगदी प्रतीसाद मिळाला नाही तरी तसा त्या मुलींनाही मी करे. त्या मुली ही हास्य करू लागल्या. मग पुढील महीनाभरात मला सर्व मुलींची नावे कळली. एक दिवस हेतल म्हणाली तिच्या चुलत भावाचे सुरत येथे लग्न आहे. घरात ही एकच मुलगी (चार काकांना फक्त मुलगेच), तिला हळदीत, वरातीत नाचायचे होते, खूप खरेदी केली आहे चार दिवस सुरतला जाणार आहे वैगरे सांगितले.
https://www.shrutimundada.com/2022/01/how-to-stop-overthinking.html
पंधरा दिवस गेले असतील, तिच्या एका मैत्रिणीने मला हळूच सांगितले हेतलला तूम्हाला भेटायचे आहे. मी म्हणाले गाडीत का येत नाही? ती म्हणाली तूम्हाला तीच सांगेल. तूम्ही कधी तिला भेटू शकता? मी म्हणाले माझा पत्ता देते घरी भेटेन संध्याकाळी कामावरून आल्यावर. ती म्हणाली उद्या सांगते. दुसऱ्या दिवशी तिने आज संध्याकाळी दहिसर पश्चिमच्या विठ्ठल मंदिराजवळ भेटायला येईल ती असा निरोप दिला. मी मंदिराजवळच रहाते त्यामुळे मला काही कष्टदायक नव्हते. संध्याकाळी मी देवळाजवळ गेले. देवळात भजन चालू होते मी तिला माझ्या घरी चल म्हणाले ती म्हणाली नको घरात इतर माणसे असतील तर मला मोकळेपणाने बोलता येणार नाही म्हणून आम्ही देवळाच्या बाजूला दिव्यांचा ओटा आहे त्याच्या कोपारात आडोश्याला बसलो.
मी विचारलं 'लग्न कसं झालं?' ती रडू लागली व म्हणाली लग्न फार म्हणजे फारच (ग्रांड) झकास झाले. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे तिच्या माहेरीही जाऊन आलो. घरी आल्यावर कपडे बदलायला म्हणून खोलीत गेली व तिने स्वतःला आग लावून घेतली. तिला वाचवण्यासाठी खोलीचे दार फोडावे लागले, भावालाही भाजून फार इजा झाली. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केल्याने पोलिस केस झाली. पण नशिबाने तीने चिठ्ठी लिहून ठेवली होती व तिच्या आईवडिलांनीही मान्य केले की तिचे एका मुलाबरोबर प्रेम होते व घरून विरोध होता. हे लग्न न केल्यास आईने जीव देईन अशी धमकी दिली म्हणून तिने लग्न केले. लग्नानंतर फक्त दोन दिवसात दोन्ही कुटुंबे उध्वस्त झाले. तिचा चुलत भाऊ (नवरदेव) मानसिक धक्क्यातून अजून सावरला नाही. आंन्टी (मी शक्यतो कोणालाही मला मॅडम, आंन्टी म्हणण्यापासून रोखते. मला ताई, बाई काकी, आज्जी काहीही बोलवले तर चालते.) माझ्या भावाची स्थिती पाहून मी जागी झाले. भाऊने पोलिसांना ही सांगितले 'तीने मला बोटही लावू दिले नाही. लग्नातील विधी व्यतिरिक्त तीने त्याला स्पर्श ही करू दिला नाही. साखरपुडा झाल्यावर दोनदा ते भेटले तेव्हांही'. आंन्टी, तूमची खूप आठवण आली. ती लग्न होऊन ही भावाला परके मानून त्याला स्पर्श करू देत नव्हती. तिच्या मनात असलेल्या भावना मला कळाल्या नाही. पण एक लक्षात आले तूम्ही ओरडल्यापासून मी माझ्या मित्राला मला स्पर्श करू देत नाही म्हणून तोही मला टाळू लागला होता. आंन्टी मी विचार करतच होते खरंच आमचे प्रेम होते की फक्त तरूण सुलभ स्पर्शाची ओढ. आंन्टी, सतत डोळ्यासमोर जळणारी नखशिखांत नटलेली सुंदर,तरुण वहीनी दिसते. माझ्या पेक्षा दोन महिन्यांनी मोठी होती ती. मला वाटतं आमचे जे होते ते नक्कीच प्रेम नाही. आता मला ही त्याला भेटायचे नाही म्हणून मी स्टेशनवर यायला टाळले. तशी माझी त्याची स्टेशनवरचीच चार पाच महिन्यांची ओळख. आमच्या गावी माझ्या लग्नाबाबत बोलणी सुरू झाल्या आहेत. मी खूप विचार केला तसा मलाही शिकण्यात फार रस नाही. मी काही चुक केली तर दोन कुटुंबे उध्वस्त होतील. माझ्या भावाला, काका, काकूंना अगदी आई वडिलांना फार मानसिक धक्का बसला आहे, पुर्ण कोलमडून पडले आहेत सगळे. तूम्ही म्हणालात तेच खरे, माझे पालक फार विश्वासाने मला कॉलेजला पाठवत होते व मी चुक करत होते.'. मी म्हणाले 'अगं शिक्षण तरी पुर्ण कर. लहान आहेस तू'. ती म्हणाली, 'आमच्यात लवकर लग्न करतात. मी आता कॉलेजला न जाता आमच्या पारंपरिक व्यवसायातील शिक्षण करणार'. आंन्टी मला लवकर सुरतलाच आमच्या एकत्र कुटुंबात पाठवणार आहेत. आमचा चिवडा, खाकरा व मसाल्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यात लक्ष देईन. लवकरच माझे लग्न होईल. मला आशिर्वाद द्या यापुढे माझ्याकडून कोणतीही चुक न घडो'. मी म्हणाले 'नाही घडणार बाळा, जरी घडलीच तर माझ्या सारखी कोणी रागवणारी भेटेल.' हेतल त्यानंतर मला भेटली नाही. पण तिच्या मैत्रिणी कडून तिचे लग्न झालेले कळले. एका सुंदर,तरुणीच्या आत्महत्येने हेतल पुर्ण बदलली. देवाने तीचे भलेच केलं असेल.
माझ्या सर्वांशी बोलण्याच्या सवयीमुळे, सततच्या बदलीमुळे व न्यायालयातील नोकरीमुळे अनेक जणींचे बदल मी ऐकले, अनुभवले. पुर्वी मोबाईल नव्हते त्यामुळे बर्याच जणींचे नेमके आता काय चाललंय हे माहीत नाही. माझ्या प्रमाणे अनेकांना अवतीभवती नक्कीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा अनुभव मिळत असेल वेळे अभावी कोणी लिहीत नसेल. पण वेळात वेळ काढून माझे शब्दांकन वाचता, त्याला दाद देता याबद्दल मी आपली ऋणी आहे. पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन घडलेले लिहीताना काही स्थळ, काळ, वेळ चुकत असतील ही. माझे आजपर्यंतचे आयुष्य लहानपण-माहेर टिळकनगर चेंबूर व सासर दहिसर त्यामुळे येथीलच अनुभव आहेत. बर्याच मैत्रिणी ह्या फार कमी कालावधीतील रेल्वे प्रवासातील सहप्रवासीच जास्त. (मी २०१० नंतर कैंसरनंतर विकलांग डब्यात जाऊ लागले) माझ्या बदलीमुळे किंवा इतर कारणांमुळे पुढे बर्याच जणी फक्त आठवणीतच भेटतात. पुन्हा एकदा तूम्हा सर्वांची मी मनापासून ऋणी आहे. तूम्ही दाद देता म्हणूनच त्यांचे अनुभव मी माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न करते.❤️
उमा योगेश्वर कामत
टिप: माझ्या ओळखीच्या अनेक मैत्रिणींच्या त्या कश्या व का बदलल्या अगदी १०० सत्यकथा किंवा व्यथा शब्दांकन माझे लिहायचे ठरवले आहे.
👍
❤️
🙏
24