
ग्रामपंचायत माहिती | शासकीय योजना
February 10, 2025 at 07:18 AM
*वीज ग्राहका जागा हो.*
*अभ्यासोनी प्रगटावे*
*“आपली समस्या स्वत: सोडवावी व आत्मनिर्भर” व्हावे म्हणून या मालिका सुरू केल्या आहेत*
*तक्रार कशी सोडवावी: -*
*उदा. : -* मोशीमध्ये एक शेतकरी त्यांच्या शेतात विद्युत पुरवठा करणारी तार तुटली त्यांनी विद्युत वितरणकडे त्यासंबंधी तक्रार दाखल केली. पण विद्युत वितरणाच्या संबंधित कर्मचा-यांनी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. शेवटी २४ दिवस अंधारात काढल्यानंतर एकदाची दुरुस्ती झाली. त्यांने लढाईची तयारी दाखवली आणि नुकसानभरपाई मिळविण्यासाठी प्रथम अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दाखल केली. (आज हा कक्ष बंद केला आहे.) अंतर्गत कक्षाने नुकसानभरपाई देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे ग्राहकाने ग्राहक गा-हाणे निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली. परंतु तिथेही त्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षताच मिळाल्या. त्याचे अपील विद्युत लोकपाल, मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली. *हा ग्राहक कमी शिक्षण असताना त्याने ही लढाई लढून रु.२४ हजाराची नुकसानभरपाई मिळण्याचा विद्युत लोकपालांनी विद्युत वितरणाला आदेश दिला.*
याकरिता विद्युत वितरणने कॉल सेंटर्स उभी केली आहेत.
*तक्रार नोंदविण्यासाठी क्रमांक*
*१९१२, १९१२०,*
*१८००२१२३४३५ व*
*१८००२३३३४३५*
हे टोल फ्री नंबर प्रत्येक ग्राहकाच्या विद्युत बिला मागे छापलेले असतात.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करून, तक्रारीचा क्रमांक कॉल सेंटरकडून घेणे आवश्यक आहे. हा तक्रार क्रमांक मिळाला की, त्या तासाचा पासून घड्याळ सुरू होते. अशी नुकसानभरपाई तक्रार शिवाय आपोआप मिळत नाही, हेसुद्धा आपण इथं लक्षात घेतले पाहिजे.
विद्युत वितरणच्या प्रत्येक विभागाकडे नुकसानभरपाई मागणे आवश्यक आहे. या निकालाने समाधान झाले नाही तर विद्युत वितरणच्या *“ग्राहक गा-हाणे निवारण मंचाकडे” “अनुसूची अ”* तक्रार दाखल करू शकतो. ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये एक निवृत्त न्यायाधीश, एक ग्राहकांचा प्रतिनिधी आणि एक विद्युत वितरणचा प्रतिनिधी (कार्यकारी अभियंता) असे ३ सदस्यांचे मंडळ असते. मंचाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर ६० दिवसांमध्ये तक्रारीवर निकाल देणे अपेक्षित असते. जर ग्राहक गा-हाणे निवारण मंचाने ६० दिवसात सुनावणी घेऊन निर्णय न दिल्यास *विद्युत लोकपाल यांच्याकडे “अनुसूची ब”* मध्ये तक्रार करता येते. मंचाच्या आदेशाने समाधानकारक निकाल मिळाला नाही, तर ६० दिवसांच्या आत निकालाविरुद्ध विद्युत लोकपाल मुंबई किंवा नागपूर यांच्याकडे अपील दाखल करू शकतो. इथेही सुनावणी घेऊन पुढील ६० दिवसांत निकाल देणे अपेक्षित आहे. मूळ घटना घडल्यापासून २ वर्षात तक्रारमंचात दाखल करणे आवश्यक आहे. ६० दिवसांची ही मुदत टळून गेली तर केवळ तेवढ्या तांत्रिक मुद्यावरसुद्धा आपली नुकसानभरपाईची मागणी फेटाळली जाऊ शकते. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकदा ग्राहकांना असे अनुभव आले आहेत की, विद्युत वितरणाचा विद्युत पुरवठा खंडित झाला, तर ग्राहकांना साहित्य आणून देण्यास सांगितले जाते
*आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,*
अजय भोसरेकर,
मार्गदर्शनासाठी आपला *पूर्ण परिचय व cell नंबर द्यावा आणि विषयाचे गांभीर्य मुद्दे ईमेलवर पाठवणे* आवश्यक आहे.
त्यानंतर अभ्यासपूर्ण मार्गदर्शनासाठी *मला आपणास कॉल करणे शक्य होईल.*
Email: - [email protected]
👍
😂
5