
JPN NEWS
May 13, 2025 at 02:05 PM
👨🎓 *दहावीचा निकाल*
🔸 यंदा 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 100 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहे. लातूर जिल्ह्यात एकूण 113 जणांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण 9 विभागांमध्ये 285 विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना 35 टक्के मिळाले आहेत. 35 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे.
🎯 महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के ?
- कोकण - 98.82 टक्के
- कोल्हापूर - 96.78 टक्के
- मुंबई - 95.84 टक्के
- पुणे - 94.81 टक्के
- नाशिक - 93.04 टक्के
- अमरावती - 92.95 टक्के
- संभाजीनगर - 92.82 टक्के
- लातूर - 92.77 टक्के
- नागपूर - 90.78 टक्के