
तथ्यांश
May 16, 2025 at 04:24 AM
ऑपरेशन सिंदूर ने काय साध्य झालं..? थोडक्यात काही मुद्दे!
1) भारताने पाकिस्तानला हे दाखवून दिलं की, तुम्ही अधिकृत सरकारी यंत्रणेच्या बाहेर दहशतवादी चॅनेल उघडून भारताला डॅमेज करू शकणार नाही. ते कृत्य देखील अधिकृत पाकिस्तानी हल्ला समजण्यात येईल.
2) यापुढे पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली, तर त्याला out of proportion मोठी किमंत चुकवावी लागेल. आता यापुढे पाकिस्तान कोणतीही आगळीक करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल.
3) इस्लामी दहशतवादी केवळ सीमावर्ती भागातच नाही, तर ते पाकिस्तानात कुठेही बसलेले असूदे, आमचा मिसाईल बरोबर तिथे पोहचेल. (यापूर्वीची दोन स्ट्राईकस प्रामुख्याने सीमावर्ती भागात झाली होती.)
4) प्रमुख दहशतवाद्यांचा जो जनाजा निघाला, त्यात पाकिस्तानी सैन्य अधिकारी सामील झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा जगासमोर हे सिद्ध झालं की पाकिस्तानी सैन्य आणि इस्लामी दहशतवादी हे एकच आहेत.
5) पाकिस्तानचे कोणतेही एअर बेस आपण टार्गेट करू शकतो. अगदी पाकिस्तानाच्या पश्चिमी सीमेच्या टोकावरील बिंदू देखील आमच्या माऱ्याच्या कक्षेत आहे आणि ते पण आम्ही अगदी 'पिन पॉईंटेड' टार्गेट करू शकतो.
6) आमचे एअर सुरक्षा कवच अत्याधुनिक आणि फुलप्रूफ आहे, जे एकाच वेळी एका व्यापक क्षेत्राला कव्हर करतं आणि मल्टिपल ऑब्जेक्टस टार्गेट करून डिस्ट्रॉय करतं.
7) अधिकृत माध्यमातून कळतं त्याप्रमाणे या ऑपरेशनमध्ये अनेक 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्र वापरण्यात आली. त्यामुळे या बाबतीत भारत defence equipments चा विक्रेता म्हणून पुढे येण्याची संधी निर्माण झाली.
8) भविष्यात आपल्या इथे सरकार कोणत्याही पक्षाचं असू दे, पण एखादी दहशतवादी हल्ला झाला तर त्याला कठोर प्रतिउत्तर देणे अनिवार्य असणार आहे. कारण मोदी सरकारने पाडलेला हा पायंडा लोकांना चांगलाच लक्षात राहणार आहे.
9) भारताला एक धाडसी नेतृत्व लाभलेलं आहे, प्रोफेशनल सैन्य अधिकारी आहेत आणि पराक्रमी सैन्य आहे, जे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतात.
10) देशाचा शत्रू केवळ पाकिस्तानातच नाही, जर कोणी आमच्या निर्दोष नागरिकांचं रक्त सांडलं, तर तो शत्रू जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात बसू देत, अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून भारतीय पिस्तूल त्या शत्रूच्या डोक्यापर्यंत नक्की पोहचेल.
-- भरत आमदापुरे