
तथ्यांश
May 27, 2025 at 12:08 PM
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी कोरून ठेवली आहे तिथी रायगडावर!
६ जून ची धून म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेला खटाटोप ह्याउपर काही नाही....
गुरुजी शंभर टक्के सत्य बोललेत. मीडिया मात्र त्यातही बातमी पाहत आहे... खरं म्हणजे यात वावगे काय आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक शिलालेख समाधीच्या बाजूला आहे त्यामध्ये हिरोजी इंदुलकरांनी राज्याभिषेकाची तिथी लिहिली आहे.
किल्ले रायगडावरिल शिलालेख:
१. श्री गणपतये नमः ।।
२. ।।प्रासादोजगदीश्वरस्यजगतामानंददोनु
३. ।। ज्ञय श्रीमछत्रपतेशिवस्यनृपते सिंहासने तिष्ठतः
४. ।। शाके षण्नवबाण भुमिगणनादानंदसंवत्सरे ज्योतीराज
५. ।। मुहूर्त्त कीर्तिमहितेशुक्लेशसार्ष्णे तिथौ ।। १ ।। वापीकूपतडागराजिरू
६. ।। चिरैहम्यैर्वनैर्वीथिके । स्तंभैः कुंभिगृहैरिंद्रसदनैरभ्रंलिहै
७. ।। मंडिते श्रीमद्रायगिरौगिराम विषये हीराजिनानिर्मितो
८. ।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसत स्तावत्समुज्जृंभते ।। २ ।।
अर्थ:
श्री गणपतीला नमन करून शालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सरात शोभायन झाल्यावर (सुर्यास्तानंतर एक मुहूर्त) जेष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे शनिवारी रोजी उषकाली सकाळी पाच वाजता महाराज शिवाजीराजे सिंहासनाधिश्वर झाले.
किल्ले रायगडावरती पाण्याची टाकी, विहरी, तलाव, (नैसर्गिक वृक्ष) राजी (यांनी नटलेल्या) वाडे ,बागा ,रस्ते, स्तंभ गजशाळा. गगनचुंबी राजवाडे, मनोरे, अश्या वास्तू तसेच (प्रासादो जगदिश्वराचे) श्री शंकराचे जगदीश्वर नावाचे मंदीर त्यांचा वास्तुविशारद हवालदार हिरोजी इंदुलकर याच्या हस्ते जगाला आनंद देणारे करविले आणि या सर्व वास्तूची कीर्ती यावत चंद्रो। दिवाकरों म्हणजे जो पर्यंत आकाशात सूर्य चंद्र आहेत. ती पर्यंत तेजाने तळपत राहिल.