Agrowon
June 2, 2025 at 05:39 AM
मृत्युपुत्र म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणे आणि सर्वात महत्त्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यू होय. म्हणूनच, तुमच्याकडे मालमत्ता असल्यास, तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कोणास मिळावी, किंवा कोणास मिळू नये अशी तुमची इच्छा असते, किंवा मालमत्ता ही सरस-निरस प्रमाणात वारसामध्ये वितरित व्हावी अशी इच्छा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मृत्युपत्र बनवणे आवश्यक बनते. मृत्युपत्र ज्याला काही भागांमध्ये इच्छापत्र म्हणून देखील संबोधले जातात. सक्षम व्यक्तीने तयार करून ठेवलेल्या मृत्युपत्राचा दस्त हा कायदेशीररीत्या वारसांवर बंधनकारक दस्तऐवज आहे, जे मृत्युपत्राचा दस्त तयार करून ठेवणारा हयात नसताना त्याच्या मालमत्ता किंवा मालमत्तेबाबत त्याची इच्छा किंवा मालमत्ता वितरण हेतू अचूकपणे पूर्ण केले जातील याची खात्री देते. भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ नुसार मृत्युपत्र तयार करता येते. मृत्युपत्र हाताने किंवा टंकलिखित केले जाऊ शकते. https://www.youtube.com/watch?v=qKUjs-0gbIA
🙏
1