⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 2, 2025 at 05:20 PM
1967 च्या लोकसभा निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बीडमधून लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी ते एस.टी ने बीडला गेले. त्यांच्याजवळ एस.टी चे तिकिट काढायलाही पैसे नव्हते त्यांचे तिकीट नारायण माने यांनी काढले. बीडमध्ये गेल्यावर एका कार्यकर्त्यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला. सकाळी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी लागणारी रक्कमही त्यांच्याकडे नव्हती तीसुद्धा तिथल्या लोकांनी भरली. या निवडणूकीत लोकांनी रात्रीचा दिवस केला आणि या सातारच्या सिंहाला खासदार केले.क्रांतिसिह नाना पाटील यांच्यावर बीडच्या लोकांनी खूप प्रेम केले ते प्रेम पाहून नाना गहिवरले त्यांनी पाच वर्षे पाटोद्याच्या चावडीत मुक्कामी राहून लोकांची कामे केली.या पाच वर्षांत ते एकदाही आपल्या घरी गेले नाहीत. ते बीड जिल्ह्य़ातच राहिले. धन्य तो नेता आणि त्याच्यावर अफाट प्रेम करणारी जनता. ( धन्य ती १९६७ च्या काळातील प्रामाणिक,सुज्ञ जनता,आणि धन्य ते क्रांती सिंहासारखे निस्वार्थी,समाजाभिमुख ,तळमळीचे नेते,आज बीड जिल्ह्याची अवस्था बघितली म्हणजे हे सगळ स्वप्नवत वाटत. बीडच कशाला ? संपूर्ण महाराष्ट्राची ही दयनीय,विदारक अवस्था करून ठेवली आहे आजच्या राज्यकर्त्यांनी ) *📲 अशाच बातमीच्या इतर नवनवीन अपडेट साठी आपले WMO चे व्हाट्सअप चॅनल फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
Image from ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳: 1967 च्या लोकसभा निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बीडमधून लढण्या...
👍 🙏 ❤️ 21

Comments