शालेय शिक्षण
June 6, 2025 at 12:49 AM
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━* *◼️आयुष्यात रिटेक नाही◼️* *━═━═━═━═━═━═━═━═━═━═━* आयुष्यात रिटेक नाही !! विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं तर.? नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण, जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असते. म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा. सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य. कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो, मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल. नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग. स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं. अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत, त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी. भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं. सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं. एकत्र कुटुंबाला भाऊबंदकीची किड लागते, तेव्हा वाईट वाटते. आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही? अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात. आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं. जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो. अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर.? शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर.? *खरच आयुष्य किती सुंदर होईल...!* *┈┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉┈* *_𝐇𝐚𝐯𝐞 𝐀 𝐍𝐢𝐜𝐞 𝐃𝐚𝐲_•─╼⃝𖠁* *✥●⊱✧⊰●☬ॐ☬●⊱✧⊰●✥* *‼️🌹सुप्रभात🌹‼️* *✒️ प्रविण सरवदे, कराड,* 🍃🍂🌷🙏🌷🍂🍃 *┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉* *▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬* *आनंदी रहा..! समाधानी रहा..!!* *▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬* ┊  ┊  ┊  ┊ 🍃 ┊  ┊  ┊ 🍃 💛 ┊  ┊ 🍃 💚 ┊ 🍃 ❤ 🍃 💙 🧡
Image from शालेय शिक्षण: *━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*          *◼️आयुष्यात रिटेक नाही◼️* *━═━═━═━═━═...
👍 😂 2

Comments