शालेय शिक्षण

5.8K subscribers

About शालेय शिक्षण

*शालेय शिक्षण या WhatsApp Channel वर* शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी सहाय्यक व प्रेरक पोस्ट पाठविल्या जातील. प्रत्येक शिक्षक शिक्षणक्षेत्रातील घडामोडींबाबत अद्ययावत राहावा, त्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, स्वतःचे आरोग्य उत्तम राखत आपल्या कलागुणांना वाव द्यावा, आपण राबवत असलेल्या उपक्रमांतून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने *Shaley Shikshan* Channel वर पोस्ट वाचावयास मिळतील. आपल्या मित्रांना *शालेय शिक्षण* या Channel ला Follow करायला अवश्य आमंत्रित करा. 👇 *Shaley Shikshan - WhatsApp channel* *https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V* या Channel वर .... � १) #शैक्षणिक बातम्या � २) #तंञज्ञान विषयक �३) #आरोग्य विषयक � ४) #current issue सध्याच्या विषयासंबंधी पोस्ट ( शंका / समाधान ) � ५) #साहित्यसंपदा ( शिक्षक व विद्यार्थी रचित कविता, कथा, लेख, प्रसंगवर्णन..) टिकात्मक असू नये. � ६) #कलागुण ( शिक्षक व विद्यार्थी यांचे गायन, वादन, वक्तृत्व, चित्र, कार्यानुभव वस्तू...) � ७) #उपक्रमशीलशिक्षण ( शैक्षणिक अध्यापन करताना राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्य...) � ८) #financial_आर्थिक सहाय्यता ( गुंतवणूक बाबत व आर्थिक मार्गदर्शन ) 👇 *Shaley Shikshan* *🎯 WhatsApp Group Link* *https://bit.ly/Shaley-Shikshan-Std-Wise-Group* *🎯Facebook Group* *https://m.facebook.com/groups/854222064638490/*

Similar Channels

Swipe to see more

Posts

शालेय शिक्षण
6/6/2025, 12:48:45 AM

🪴🏵️🦚🌻🌸💠🌹☘️🍁🌺🪴 *🎭 बोधकथा : सुसंवाद 🎭* *🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,* *⊰━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━⊱* एका शहरात एक दांपत्य राहत होते. पतीचा मोठा व्यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्ठा होती. कामाच्या व्यापात तो दिवसभर व्यग्र राहत असे. आपल्या व्यग्र जीवन शैलीमुळे तो पत्नीला वेळ देऊ शकत नसे, यामुळे पत्नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्वस्थ राहायची, आपल्या मनातील गोष्टी ती कोणाला सांगूही शकत नव्हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्या समोरून निघून जायचा. एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्हणाला, " तू तर माझ्या व्यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्या कामात तरी मदत करेल." त्याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्हणाली, तुम्हाला तर स्वतःचेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्यावर तरी तो माझी काळजी घेईल. दोघेही आपल्या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायी पर्यत येऊन पोहोचल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांच्यातील एका सज्जन माणसाने मध्यस्थ म्हणून तेथे प्रवेश केला व म्हणाला, अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्याला काय व्हायचे ते त्याला ठरवू द्या ना. तुम्ही काय उगीच ठरवून त्याच्यावर तुमची मते लादत आहात. हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्पच झाले. कारण त्यांना अजून मुलबाळ काहीच नव्हते आणि भविष्यात होणा-या मुलाच्या भवितव्या विषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्हणून निघून गेले. *📍तात्पर्य :* *व्यर्थ गोष्टींवर वाद घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.* *▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣*

शालेय शिक्षण
6/6/2025, 12:48:44 AM

🪴🏵️🦚🌻🌸💠🌹☘️🍁🌺🪴 *🫀शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका; आणि.🧠* *🍁संदर्भ : हेल्थ मंत्रा ~ आरोग्य मंत्र* *🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,* *⊰━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━⊱* शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे (Dehydration). ऋतू कोणताही असो शरीराला पाणी आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो (Heart Disease). शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास विविध समस्या निर्माण होतात (Health Tips). शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे या खुणा दिसून येतात. याव्यतिरिक्त आपले शरीर अनेक संकेत देते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता ओळखता येऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास शरीर नक्की कोणते संकेत देते? पाहूया. *🎯 हृदयाच्या आरोग्यावर धोका :* पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. कारण डिहायड्रेशनचा शरीराच्या अवयवांवर आणि कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो. मुख्य म्हणजे हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो. *♦️अनियमित हृदयाचे ठोके :* शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यावर देखील परिणाम होतो. *♦️रक्त प्रवाह कमी होऊ लागतो :* पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होते. ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर अधिक दबाव टाकला जातो. अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. *♦️शरीराचे तापमान असंतुलित होते :* पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या तापमानात असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर देखील दबाव वाढतो. *♦️किडनीवर विपरीत परिणाम :* पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवरही वाईट परिणाम होतो आणि किडनीच्या समस्यांमुळे हृदयावरही नकारात्मक परिणाम होतो, कारण दोन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. *♦️चयापचय मंदावते :* पाण्याच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावते. ज्यामुळे शरीरातील चरबी आणि विषारी पदार्थ वाढण्याचा धोका वाढू शकतो. *▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣*

❤️ 👍 2
शालेय शिक्षण
6/6/2025, 12:58:01 AM

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे ? - हरियाल. ०२) पृथ्वी स्वत:भोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते ? - पश्चिमेकडून पूर्वेकडे. ०३) माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे ? - शहाजी सागर. ०४) भारतातील कोणत्या राज्यात रबराचे उत्पादन होते ? - केरळ. ०५) कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला ? - अमेरिका. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌹संकलन : प्रदीप ना.विघ्ने ९९२३५९८६२४,पीएमश्री न.प.उ.प्रा. शाळा,मोहपा. *for Daily General Knowledge Post* Join telegram channel https://t.me/ShaleyShikshan ➡️ *Share with your friends* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

शालेय शिक्षण
6/6/2025, 12:49:14 AM

*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━* *◼️आयुष्यात रिटेक नाही◼️* *━═━═━═━═━═━═━═━═━═━═━* आयुष्यात रिटेक नाही !! विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं तर.? नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण, जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असते. म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा. सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य. कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो, मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल. नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग. स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं. अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत, त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी. भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं. सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं. एकत्र कुटुंबाला भाऊबंदकीची किड लागते, तेव्हा वाईट वाटते. आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही? अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात. आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं. जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो. अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर.? शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर.? *खरच आयुष्य किती सुंदर होईल...!* *┈┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉┈* *_𝐇𝐚𝐯𝐞 𝐀 𝐍𝐢𝐜𝐞 𝐃𝐚𝐲_•─╼⃝𖠁* *✥●⊱✧⊰●☬ॐ☬●⊱✧⊰●✥* *‼️🌹सुप्रभात🌹‼️* *✒️ प्रविण सरवदे, कराड,* 🍃🍂🌷🙏🌷🍂🍃 *┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉* *▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬* *आनंदी रहा..! समाधानी रहा..!!* *▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬* ┊  ┊  ┊  ┊ 🍃 ┊  ┊  ┊ 🍃 💛 ┊  ┊ 🍃 💚 ┊ 🍃 ❤ 🍃 💙 🧡

Post image
👍 😂 2
Image
शालेय शिक्षण
6/6/2025, 12:48:43 AM

*✹ ५ जून ✹* *इतिहासकार गणेश हरी खरे स्मृतिदिन* जन्म - १० जानेवारी १९०१ (पनवेल,रायगड) स्मृती - ५ जून १९८५ इतिहासकार डॉ. ग. ह. खरे यांचा जन्म रायगड मधील पनवेल येथे झाला. ते वि.का. राजवाडे यांचे शिष्य, ज्यांनी अविवाहित राहून इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. खरे यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी त्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाची शिक्षा देण्यात आली. सुटके नंतर त्यांनी इतिहास अभ्यास सुरु केला. त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केले. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. १९२९ पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे नोकरी, पण नंतर निधना पर्यंत, चिटणीस, कार्याध्यक्ष या नात्यानी संस्थेची भरीव सेवा त्यांनी केली. संस्कृत, हिंदी, फारसी, कन्नड, कोकणी भाषा त्यांना अवगत होत्या. नाणकशास्त्र, पुरतत्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या या विषयात त्यांचा व्यासंग होता. भारतात त्यांनी सर्वत्र संचार केला होता. लहानमोठी ५३ पुस्तक, ४०० पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झालेत. त्यांनी शिवचरित्र साहित्य काही खंड व ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. ग.ह. खरे सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख संग्रह करून भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले. हे सर्व करत असताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले, त्यात अग्रक्रमांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गजानन भास्कर मेहेंदळे, शोभना गोखले यांचा समावेश आहे, ज्यांनी पुढे स्वकर्तुत्व स्वतःचा वेगळा ठसा कामातुन दाखवला. संशोधकाचा मित्र, श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते, हे त्यांच्या ग्रंथ संपदेतील विशेष व महत्वाचे ग्रंथ. त्यांचा अनन्य कार्याचा मानसन्मान म्हणून त्यांना इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग होता, तसेच इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या १९५१ च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषावले होते. न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या १९७४ च्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांच्या कडे होते. पुणे विद्यापीठानी १९८४ साली सन्माननीय डीलिट पदवी त्यांना प्रदान केली. *संजीव वेलणकर, पुणे* *९४२२३०१७३३* *संदर्भ : इंटरनेट* *संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

🙏 1
शालेय शिक्षण
6/6/2025, 12:53:50 AM

➖➖➖➖➖➖➖➖➖ 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 *ज्यांना प्रगती चा टप्पा गाठायचा असतो, त्यांना दुसऱ्याच्या चूका काढण्यास वेळ नसतो !* *मात्र...* *ज्यांना काहीच करायचे नसते, त्यांना मात्र चांगल्या बाबतीत सूध्दा दुसऱ्यांच्या चूकाच दिसून येतात !* *दुसऱ्यांना समजून घेण्याच्या अगोदर, स्वतःस प्रथम समजून घ्या, बरेच प्रश्न मिटतात !* 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 ➖➖➖➖➖➖➖➖➖

🙏 1
शालेय शिक्षण
6/6/2025, 3:39:53 AM

💥 *11वी प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ : सुधारित वेळापत्रक, प्रवेशाचे टप्पे आणि 'इनहाऊस कोटा'बाबत महत्त्वाची माहिती:* * 1) 11वी प्रवेशाचा भाग 2 भरण्यास 7 जून पर्यंत मुदतवाढ * 2) ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक फेरी पूर्वी नोंदणी करता येईल. * 3) पहिली गुणवत्ता यादी 8 जून रोजी जाहीर होईल. https://www.shaleyshikshan.in/2025/05/maha-fyjc-admission.html 💥 *11वी प्रवेशा संदर्भात मार्गदर्शक* * प्रवेश अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक Video * FAQ's वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे PDF https://bit.ly/11th-admission-all-process 🚩 *11वी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे:* 💁‍♀️ *ऑनलाईन नोंदणी (Part 1)*: विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाऊन त्यांची वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी भरून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यावर त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. 💁‍♀️ *कागदपत्रे अपलोड*: आवश्यक कागदपत्रे (उदा. १०वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रीमी लेयर, EWS, अपंगत्वाचे प्रमाणपत्र - लागू असल्यास) स्कॅन करून अपलोड करावी लागतील. 💁‍♀️ *कॉलेज पसंतीक्रम निवडणे (Part 2):* विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार किमान एक ते कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे (junior colleges) प्राधान्यक्रम निवडता येतील. 💁‍♀️ *अर्ज शुल्क भरणे:* क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पेमेंट पर्यायांद्वारे शुल्क भरावे लागेल (सामान्यतः ₹१००/-). 💁‍♀️ *अर्ज सबमिट करणे:* अर्ज पूर्ण भरल्यावर तो सबमिट करावा आणि त्याची एक प्रत भविष्यातील संदर्भासाठी जतन करावी. 🔰 *11th admission All Information* https://bit.ly/11th-admission-all-process 🤷‍♂️ *महत्त्वाचे मुद्दे:* * यावर्षी सर्व प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत, ऑफलाइन प्रवेश घेता येणार नाहीत. * ग्रामीण भागातील नेटवर्क आणि तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी शिक्षकांनी या पद्धतीला विरोध दर्शवला आहे, परंतु शासनाने ऑनलाइन प्रणालीच लागू केली आहे. * तुम्ही तुमच्या गुणांनुसार आणि गतवर्षीच्या कट-ऑफनुसार महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडणे महत्त्वाचे आहे. 💁‍♀️ *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही https://www.shaleyshikshan.in/2025/05/maha-fyjc-admission.html या वेबसाइटला भेट देऊ शकता.* ➡️ *Share with your friends* 👭👬

शालेय शिक्षण
6/6/2025, 1:05:04 AM

💥 *`प्रश्नमंजुषा`- शिवराज्याभिषेक दिन सोहळा विशेष प्रश्नमंजुषा सोडवा.* 👇 *`शिवकालीन पत्राप्रमाणे आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.`* https://www.shaleyshikshan.in/2021/06/shiv-rajyabhishek-sohala-Quiz.html 🎯 *शिवराज्याभिषेक सोहळा विषयी संपूर्ण माहिती वाचा* https://www.shaleyshikshan.in/2024/06/shiv-rajyabhishek-sohala.html ➖➖➖➖➖➖➖➖ 💤 *यापूर्वीच्या प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी पुढील लिंक ला टच करा.* https://bit.ly/more-quizzes-on-great-personalities ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ *Share with your friends.*

शालेय शिक्षण
6/6/2025, 12:48:44 AM

🪴🏵️🦚🌻🌸💠🌹☘️🍁🌺🪴 *🫀किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या काही सोपे उपाय.🧠* *🍁संदर्भ : हेल्थ मंत्रा ~ आरोग्य मंत्र* *🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,* *⊰━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━⊱* किडनी मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी यूरीन बनवण्यास मदत करतात. तरतात शरीरातील फ्लूइड आणि मिनरल्स बॅलन्सही करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचंही काम करतात. अशात किडनी खराब होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं ठरतं. अशात आज आम्ही तुम्हाला किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. *🎯 पौष्टिक आहार :* कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं रोजच्या आहारात समावेश केल्याने किडनींचं आरोग्य चांगलं राहतं. कारण या गोष्टी तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये खाता, ज्या किडनीसाठी फार फायदेशीर असतात. तसेच जास्तीत जास्त पाणी पिणं फार गरजेचं आहे. *♦️पुरेशी झोप :* जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला हायपरटेंशन आणि डायबिटीसचा धोका वाढतो. ज्यामुळे किडनीवरही दबाव पडतो. झोपे दरम्यान किडनी जास्त ब्लड फिल्टर करू शकतात आणि जास्त यूरीनही तयार करतात. ज्यामुळे एक्स्ट्रा फ्लूइड आणि वेस्ट शरीरातून बाहेर निघतात. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे. *♦️पेनकिलर टाळा :* वेगवेगळ्या वेदना दूर करण्यासाठी बरेच लोक आपल्याच मनाने पेनकिलरचं सेवन करतात. पण पेनकिलरच्या सेवनाने किडनीचा ब्लड फ्लो प्रभावित होतो. जर आधी कुणाला किडनी संबंधी किंवा डिहायड्रेशन सारखी एखादी समस्या असेल तर पेनकिलरचं सेवन टाळावं. *♦️मीठ कमी खा :* शरीरात मिठाचं बॅलन्स कायम ठेवण्यात किडनींची महत्वाची भूमिका असते. जेव्हा शरीरात एक्स्ट्रा सोडिअम जमा होतं, तेव्हा किडनींना ते बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे जास्त मिठाचं सेवन करू नये. जास्त मीठ हे हृदयासाठीही घातक असतं. *♦️स्मोकिंग आणि मद्यसेवन :* स्मोकिंग केल्याने किडनींचं वेगवेगळं काम प्रभावित होतं आणि किडनीला कॅन्सरचा धोकाही वाढतो. सिगारेटमधील निकोटीनमुळे रक्त वाहिन्यांचंही नुकसान होतं. ज्यामुळे किडनीच्या रक्त वाहिन्याही नष्ट होतात. तसेच जास्त मद्यसेवन केल्याने डिहायड्रेशन आणि हायपरटेंशनची समस्याही होते. ज्यामुळे किडनी प्रभावित होतात. अशात किडन निरोगी ठेवण्यासाठी स्मोकिंग आणि मद्यसेवन टाळलं पाहिजे. *▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣*

👍 1
शालेय शिक्षण
6/6/2025, 12:48:41 AM

*@ ५ जून @* *ब्रम्होस मिसाईलचे परीक्षण* भारताने ५ जून २०१८ रोजी समुद्रावरून जमिनीवर हल्ला करणारे ब्रह्मोस मिसाईलचे सफल परीक्षण केले. ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. भारताने रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्यास प्रारंभ केला. आज ते जगातील सर्वोत्तम क्रूझ क्षेपणास्त्र समजले जाते. ब्रह्मोसची रचना रशियाच्या पी-८०० ओनिक्स या क्षेपणास्त्रावर आधारित आहे. याच्या निर्मितीसाठी भारत आणि रशिया यांनी ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड या संयुक्त कंपनीची स्थापना केली आहे. ब्रह्मोसचे ६५ टक्के भाग रशियात तयार होतात. त्यात बुस्टर, रॅमजेट इंजिन, टार्गेट सीकर, होमिंग डिव्हाइस, कॅनिस्टर आदी भागांचा समावेश आहे. ब्रह्मोस हे दोन टप्प्यांचे (स्टेजेस) क्षेपणास्त्र आहे. त्यातील पहिला टप्पा घनरूप इंधनावर आधारित बुस्टरचा आहे. तर दुसरा टप्पा द्रवरूप इंधनावर आधारित रॅमजेट इंजिनाचा आहे. त्याला दिशादर्शनासाठी इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टिम आणि जीपीएस, ग्लोनास किंवा भारतीय गगन या कृत्रिम उपग्रहांवर आधारित प्रणाली वापरल्या जातात. ब्रह्मोसचा पल्ला २९० किमी असून त्यावर ३०० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात. ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ ते ३ पट आहे. म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात १ किमी अंतर पार करते. तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी - सीईपी) १ मीटर पेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता ९९.९९ टक्के आहे. क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा पासून बचाव करून घेऊ शकते. ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे. *संकलन : मिलिंद पंडित, कल्याण* *संदर्भ : विकिपीडिया*

🙏 1
Link copied to clipboard!