Dindoripranit Creation
June 18, 2025 at 11:59 AM
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*💯🌹आज कालाष्टमी आहे🌹💯*
*👉श्री कालभैरव महाराजांचा संपूर्ण इतिहास व श्री भैरव चंडी सेवेत (कालभैरवाष्टक पठण केल्याने होणारे फायदे)*
*👉पितृदोष, माणूस हरवणे, परागंदा होणे , घरात सतत भांडणे वादविवाद ,घटस्फोट ,घरातून अचानक निघून जाणे, गुंडांचा त्रास ,धमकी, कार्यसिद्धी, असाध्य शारीरिक व्याधी ,नोकरीत त्रास ,पिशाच्च बाधा ,नजर लागणे,अकस्मात आलेले जीवघेणे संकट, शत्रूविनाश अशा अनेक प्रश्नांवर व संकटावर अगदी खात्रीची दहा हजार टक्के यशस्वी सेवा म्हणजे श्री कालभैरवाष्टक स्तोत्र विधिवत शास्त्रोक्त पठण ( वाचणे ) करणे होय.*
*👉 कालभैरवनाथ महाराज हे श्रीस्वामी समर्थ महाराजांचे गृहमंत्रालय आहे.*
*अवतार,उपासना ,सेवा, महिमा व जागृत स्थाने*
*👉एकदा अगस्त्यऋषींनी कार्तिकेय स्वामींनाविचारले की 33 कोटी देवात सर्वश्रेष्ठ कोण आहे त्यावेळी सुमैरू पर्वतावर घडलेली अवतार कथा घटना त्यांनी ऋषींना सांगितली. ती अशी:--- सर्व ऋषीमुनी या पर्वतावर जमले असता त्यांनी ब्राम्हदेवास प्रश्न केला की सर्व देवात सर्वश्रेष्ठ कोण? तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मदेवात श्रेष्ठत्वा वरून वाद झाला. त्यावेळी सर्व चार वेदांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी मात्र श्री शिवशंकर सर्वश्रेष्ठ आहेत असे सांगितले. ते ऐकून ब्रह्मदेव शिव निंदा करू लागले. तेव्हा श्री शिवशंकरास भयंकर क्रोध उत्पन्न होऊन भैरव उत्पन्न झाला. त्यास कालभैरव असे म्हणतात. त्यास आमर्दक पापरक्षण कालराज असेही म्हणतात. त्याने उत्पन्न झाल्याबरोबर आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रम्हदेवाचे शिवाची निंदा करणारे पाचवे मस्तक तोडले.श्री शिवशंकराने सांगितले की श्री कालभैरव माझा अंशावतार आहे.*
*👉ब्रम्हहत्या व कपालमोचन क्षेत्र*
*👉श्री शिवशंकराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते मस्तक हातात घेऊन ब्रम्ह हत्येचे पातक दूर व्हावे म्हणून अनेक तीर्थक्षेत्री यात्रा केली परंतु जेव्हा काशी क्षेत्री प्रवेश केला त्यावेळीं ब्रम्हहत्ये पासून मुक्ती मिळाली. त्याचवेळी ते मस्तक त्यांच्या हातून खाली पडले तेच स्थान कपालमोचन म्हणून प्रसिद्ध झाले. या वेळी भगवान शंकराने त्यास काशी क्षेत्राचा मुख्यकोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा केली.त्याच कपालमोचन स्थळी आताचे श्रीकालभैरव मंदीर आहे.याच्या दर्शनाशिवाय श्री काशी यात्रा पूर्ण होत नाही.*
*👉महाकाळ बटुकभैरव व स्वर्णकर्षण भैरव ही तीन मुख्य स्वरूपे म्हणजे साक्षात शिवशंकरच आहेत.तसेच क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजुकोष अर्धनारीश्वर नीलकंठ दंडपाणी व दक्षिणामुर्तीवीर हे अवतार शंकराचेच आहेत.*
*👉भैरवांची एकूण संख्या 64 असून त्यातील 8 भैरव हे 8 दिशांचे रक्षक समजले जातात. त्यांचे 8 गट हे दिवसाच्या 8 प्रहराचे पहारेकरी असतात.*
*🚩 महाराष्ट्रातील जागृत स्थाने*🚩
*👉रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन जवळ हरिहरेश्वर येथे.*
*👉पुणे येथील कसबा पेठ येथे मंदीर (325 वर्षांपूर्वीचे).*
*👉ठाणे येथील पुरातन कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात.*
*👉मुलुंड (पूर्व) येथे खंडोबा मा मंदीरात.*
*रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथील मुर्ती.*
*👉जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील मंदीर.*
*👉पिशाच्च अगर समंध बाधा झालेल्या व्यक्तीस वरील कुठल्याही मंदिरात नेले असता ती व्यक्ती बाधा मुक्त होते असा शेकडो वर्षाचा अनुभव आहे.*
*उपासना उपाय -*
*💯🌹कालभैरवाष्टक स्तोत्र सेवा🌹💯*
*👉पत्रिकेतील पितृदोष या काळभैरवाच्या पठणाने (11 वेळा) सहा महिन्यात दूर होतो.मनोबल वाढते.*
*👉घरात दररोज दिवेलागण झाल्यानंतर उदबत्ती लावून जर हे काळभैरवाष्टक म्हणून जर ती रक्षा घरात सर्वत्र फुंकली तर घर नेहमी सर्व वाईट नजर बाधा व तांत्रिक प्रयोगापासून मुक्त राहते. ही उदबत्तीची रक्षा घरातील सर्वांनी कपाळास उतरती लावावी.*
*👉अतिशय गंभीर संकट समयी म्हणजे घरातील माणूस हरवणे, घटस्फोटापर्यंत संबंध ताणले जाणे, घरातील परागंदा झालेली माणसे सुखरूप घरी येणे, वादळ पूर प्रलय किंवा दैवी अथवा मानव निर्मित संकटात सापडलेली व्यक्ती सुखरूप येणे , सासरी विनाकारण त्रास होणे ,नोकरीत अकस्मात संकट, खुनाच्या धमकीतून सुटका, गुंडापासून भीती , सर्व प्रकारचे प्रवास सुखरूप होणे व सर्व प्रकारच्या पिशाच्च बाधापासून मुक्ती या करता हे कालभैरवाष्टक 11 किंवा रोज 108 वेळा घरातील सर्व सदस्यांनी सामुदायीकरीत्या म्हणावे.आशचर्यकारक फरक पडून प्रश्न सुटतो.*
*👉कालभैरवाष्टका ची अथवा कुठलीही इतर सेवा सुरू करण्या अगोदर आदले दिवशी जवळच्या काळभैरव मंदीरात जाऊन नारळ खडीसाखर व कापूर व्हावून व उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करावी. तेथेच मंदीरात कालभैरवाष्टक स्तोत्राचे 11 पाठ करावेत. जमल्यास अभिषेक करून नैवैद्य दाखवून आरती करावी.*
*👉ही अतिशय जागृत देवता असल्याने अति संकट काळात सेवा केली असता ती आपले संरक्षण करतेच.*
*👉दर रविवारी व कालाष्टमीस उपवास करून मंदिरात जाऊन (नारळ खडीसाखर ठेऊन)11वेळा कालभैरवाष्टक पठण करावे.नैवेद्य अथवा प्रसाद घरी आनू नये.*
*👉ही देवता सत्याचा न्याय निवाडा करते आपराध्यास दंड करते म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवाचा काळा गंडा हातात बांधतात.*
*👉जीवन सुखी व संकटविरहीत करायचे असेल तर रोज किमान 1 वेळेस तरी कालभैरवाष्टक वाचावे .या देवतेचे कवच प्राप्त होते.*
*【 संदर्भ ग्रंथ:- दिंडोरी प्रणित स्वामी सेवा मार्गाचा ज्ञानदान : भाग १ ग्रंथ*
https://www.instagram.com/dindoripranit_creation/profilecard/?igsh=MW56MnhmbGhhdHZxaA==
*‼️श्री स्वामी माऊली गुरुमाउली चरणार्पणमस्तू‼️*
🙏
❤️
❤
🙌
👍
36