
प्रबुद्ध टीव्ही
1.3K subscribers
About प्रबुद्ध टीव्ही
जय भीम नमो बुद्धाय, प्रबुद्ध टीव्ही या आपल्या व्हाट्सअप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. 🙏🏼 हे चॅनल तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित आहे. येथे तुम्हाला बौद्ध धम्म आणि आंबेडकरवाद तसेच प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित इतर उपक्रमांची माहिती देखील मिळेल. 🔸 ई-मेल - [email protected]
Similar Channels
Swipe to see more
Posts

📅 *फेब्रुवारी महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट!* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांची सविस्तर नोंद आम्ही सादर करत आहोत. 🏛️📜 🔎 जाणून घ्या – विविध वर्षांतील ऐतिहासिक घटना, निर्णय आणि योगदान! 👇 वाचा संपूर्ण लेख: https://dhammabharat.com/timeline-of-dr-babasaheb-ambedkar-in-february/ *— धम्म भारत* ✨

*संघटित समाजच प्रगतीचा मार्ग!* ✍🏻 प्रवीण दीपक जामनिक *अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे निर्माण होत असलेले संघटन खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या पश्चात अपेक्षित असलेले कार्य आहे.* हे संघटन समाजाच्या मूलभूत गरजा आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी कार्यरत आहे. आज आपल्या समाजाची स्थिती पाहिली तर ती अतिशय हलाखीची वाटते. *(फक्त दोन वेळचं जेवण आणि अंगावर कपडे असणं म्हणजे प्रगती नव्हे.)* जर आपण समाजाच्या कार्याच्या दर्जाचे निरीक्षण केले, तर असे लक्षात येईल की आजही आपण पूर्वीप्रमाणेच चतुर्थ व पंचम श्रेणीतीलच कामे करत आहोत. मग प्रश्न असा पडतो, *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक पातळीवर परिवर्तन घडवून आणणारी एवढी मोठी क्रांती केल्यानंतरही आपण आज अशा परिस्थितीत का आहोत?* याचे उत्तर स्पष्ट आहे – आपण बाबासाहेबांच्या विचारांवर कार्य करण्याऐवजी त्यांच्या नावाचा केवळ उदो-उदो करत राहिलो आहोत. खऱ्या अर्थाने समाजाला सर्वांगीण प्रगती साधायची असेल, तर *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधनावर कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे.* ही काळाची आणि समाजाचीही गरज बनली आहे. त्यासाठी *समाजाने सर्वप्रथम संघटित होणे आवश्यक आहे.* जोपर्यंत समाज एकत्र येणार नाही, वारंवार भेटणार नाही, तोपर्यंत कार्याची सुरुवात होणे कठीण आहे. त्यामुळे *हेवे-दावे आणि परस्परांतील कटुता सोडून संघटित होणे आवश्यक आहे.* समाजहितासाठी कधीकधी दोन पावले मागे घेण्याची भूमिका घ्यावी लागते, तेव्हाच संघटन निर्माण होऊ शकते आणि टिकू शकते. संघटन निर्माण करून समाजाच्या मूलभूत गरजांवर कार्य करणे गरजेचे आहे. *जसे एक मजबूत इमारत बांधण्यासाठी आधी जमीन समतल करावी लागते, तसेच समाजाची प्रगती घडवायची असेल, तर त्या समाजाच्या मूलभूत व पायाभूत समस्यांवर कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.* याच विचाराने *अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी शहरातील बौद्ध लोकांनी बौद्ध समाजाचे संघटन निर्माण करून, समाजाच्या मूलभूत गरजा आणि समस्यांवर कार्य करण्याचा निर्धार केला आहे.* त्यामुळे समाज सशक्त होईल आणि सर्वांगीण प्रगती साधू शकेल. *म्हणूनच, मी सर्वांना नम्र आवाहन करतो की या समाज उत्कर्षाच्या कार्यात सहभागी व्हा.* आज आपण कार्यरत झालो, तर येणारी दुसरी-तिसरी पिढी त्याचे फलित अनुभवू शकेल. अन्यथा, भविष्यातील पिढ्यांवर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरी लादली जाईल, आणि आपण त्यास जबाबदार राहू. -- *प्रवीण दीपक जामनिक* 📱 7447755627 (संचालक *प्रबुद्ध टिव्ही,* 1 लाख 65 हजार सबस्क्राईबर)

*त्यागमुर्ती आई रमाई यांच्या जयंतीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!☸️💙*


*📢 २०२४ मधील मराठी विकिपीडियावरील २० सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे! 📢* *तुम्हाला माहित आहे का?* मराठी विकिपीडियावर २०२४ मध्ये सर्वाधिक वाचले गेलेले व्यक्तिमत्त्व कोणते? 🧐 ताज्या आकडेवारीसह संपूर्ण यादी जाणून घ्या येथे 👇🏽 https://dhammabharat.com/famous-people-marathi-wikipedia-2024/ 📰 *धम्मभारत* वर नेहमी वाचा दर्जेदार आणि अद्ययावत माहिती! 🔄 पोस्ट शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही माहिती द्या! 📲

*७ नोव्हेंबर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन!* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या *शाळा प्रवेश दिनानिमित्त* केवळ *व्हॉट्सॲप स्टेटस* ठेवून शुभेच्छा देणे ही *योग्य पद्धत नाही*. खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा करण्याचा *उत्तम मार्ग* म्हणजे *त्यांच्या नावाने समाजाच्या मालकीची एक शाळा स्थापन करणे!* प्रत्येक वर्षी *७ नोव्हेंबर रोजी एक शाळा निर्माण करणे* हेच या दिवसाचे *योग्य प्रतीक* ठरेल. केवळ *घोषणाबाजी आणि जयघोष* करून *७ नोव्हेंबर साजरा करणे* म्हणजे फक्त *भावनिक उत्सव* साजरा करणे होय. जर आपण *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी* असू, तर *त्यांच्या विचारांवर कृती करणे आवश्यक आहे*. हा दिवस *त्यांच्या शिक्षणक्रांतीला समर्पित* करून *समाजासाठी शाळा निर्माण करणे* हीच *खरी आदरांजली* ठरेल. आपण केवळ *बाबासाहेबांच्या नावाचा उदो-उदो* करून थांबतोय का? की *त्यांच्या विचारांनुसार शिक्षणप्रसारासाठी काही ठोस पावले उचलतोय?* बाबासाहेबांनी आपले *संपूर्ण आयुष्य संघर्ष आणि कार्यासाठी वाहिले*. आपणही *त्यांच्या विचारांनुसार कृतीशील होण्याची गरज आहे*. जर आपण *त्यांचे खरे अनुयायी* असाल, तर *या कार्यात संघटित व्हा, एकत्र या, विचार-विमर्श करा आणि त्यावर ठोस कृती करा*. *बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत आणण्याचा हा खरा मार्ग आहे*. *७ नोव्हेंबरच्या दिवशी स्टेटस ठेवणाऱ्या प्रत्येकाने आता स्वतःला विचारावे – मी बाबासाहेबांच्या शिक्षणक्रांतीसाठी काय करत आहे? केवळ घोषणा देणार की प्रत्यक्ष कृती करणार?* *-- प्रवीण दीपक जामनिक ✍🏻* (सम्यक धम्मचर्चा अभियान – समाज उन्नतीचे स्वप्न घेऊन उभे राहिलेले संघटन) 📞 *7447755627*

🟡 *बौद्ध धर्मातील जाती कोणत्या आहेत?* 🤔 बौद्ध धर्म जातिव्यवस्थेच्या विरोधात असला तरी, भारतात विविध जातींमध्ये बौद्ध आढळतात. देशात SC, ST, OBC आणि General Category मधील लोकही बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक अनुसूचित जाती आणि जमातीमधील बौद्धांची लोकसंख्या जाणून घ्या. 📖 संपूर्ण माहिती:👇 https://dhammabharat.com/caste-in-buddhism 🔄 ही माहिती शेअर करा!

🟡 बाबासाहेब आंबेडकर आणि 32 पदव्या – सत्य की गैरसमज? 🟡 📖 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 पदव्या मिळवल्या होत्या का? या दाव्याची सत्यता आणि त्याचा प्रसार कसा झाला याची सविस्तर माहिती जाणून घ्या. 🔗 संपूर्ण माहिती वाचा:👇 https://dhammabharat.com/32-degrees-of-ambedkar-in-marathi/ 📢 ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा! 💙 #BabasahebAmbedkar #32DegreesOfAmbedkar #DhammaBharat

‼️ *Did Dr. B.R. Ambedkar earn 32 degrees?* 🤔 Is this claim *true or false?* Know the truth! ✅ 🔗 *Read here:* https://dhammabharat.com/32-degrees-of-ambedkar/ *— Dhamma Bharat*

*महाबोधी मुक्ती आंदोलन: बौद्ध धर्मीयांचा धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष* बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे हे संपूर्ण बौद्ध जगतात सर्वात महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मात्र, दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही, हेच या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे. *महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा, 1949 – हिंदूंचे वर्चस्व* बिहार सरकारने 1949 मध्ये "महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949" लागू केला, ज्याद्वारे महाबोधी महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती (Bodh Gaya Temple Management Committee – BGTMC) कडे सोपवण्यात आले. या समितीत हिंदूंचे स्पष्ट वर्चस्व आहे. *समितीतील धर्मीयांचे प्रमाण:* एकूण सदस्यसंख्या – 9 हिंदू सदस्य + अध्यक्ष – 5 (बहुमत) बौद्ध सदस्य – 4 (अल्पमत) महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949, यानुसार महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 4 हिंदू (महंत/ ब्राह्मण) आणि 4 बौद्ध (भिक्खू) सभासद असावे. तसेच या समितीचा अध्यक्ष "हिंदू"च असावा असाही नियम आहे. *अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट:* या कायद्याच्या नियमानुसार, समितीचा अध्यक्ष हमीने हिंदूच असावा आणि तो जिल्हाधिकारी (District Magistrate) असावा. एखाद्या परिस्थितीत जर बोधगयेचा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर शेजारील जिल्ह्याच्या "हिंदू" जिल्हाधिकाऱ्याला समितीचे अध्यक्षपद दिले जाते. याचा अर्थ बौद्ध धर्मीय (भिक्खू) महाबोधी महाविहाराचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. *बौद्ध धर्मीयांवर अन्याय – अन्य धर्मांच्या स्थळांसाठी वेगळे नियम?* एखाद्या धर्मीयांच्या धार्मिक स्थळावर त्याच धर्म बांधवांचा अधिकार असतो आणि असावा, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. * हिंदू मंदिराच्या व्यवस्थापन समितीत फक्त हिंदूच असतात. * चर्चच्या व्यवस्थापन समितीत फक्त ख्रिश्चन व्यक्तीच असतात. * गुरुद्वाऱ्याच्या व्यवस्थापन समितीत फक्त शीख लोकच असतात. * मशिदीच्या व्यवस्थापन समितीत फक्त मुस्लिमच असतात. मात्र, महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचे असूनही तेथील व्यवस्थापन समितीत बौद्धांहून जास्त हिंदू सभासद आहेत! हा बौद्ध धर्मीयांवरील मोठा अन्याय आहे. *बौद्ध धर्मावर होणारे अतिक्रमण:* या व्यवस्थेमुळे महाबोधी महाविहारात हिंदू धर्माचे कर्मकांड आणि विधी कायदेशीरपणे केले जातात, जे बौद्ध धर्मात निषेधार्ह आहेत. बौद्ध स्थळावर बौद्ध धर्माचे आचरण व्हायला पाहिजे, पण येथे हिंदू धर्माचरण घडते. बरेच हिंदू लोक महाबोधी मंदिराला "शिव मंदिर" म्हणून चुकीची ओळख देत आहेत, पण इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की हे शिव मंदिर नसून, सम्राट अशोकाने बांधलेले भगवान बुद्धांचे महाविहार आहे. *महाबोधी मुक्ती आंदोलन – बौद्ध धर्मीयांची मागणी* 12 फेब्रुवारी 2025 पासून बिहारमध्ये ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात बौद्ध भिक्खू आणि उपासक महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. *बौद्ध धर्मीयांच्या प्रमुख मागण्या:* 1. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मीयांकडे द्यावे. 2. महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करावी आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत. 3. समितीच्या अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट रद्द करून, बौद्ध धर्मीयांना अध्यक्ष होण्याचा अधिकार द्यावा. 4. महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये कोणत्याही बाह्य धर्मीयांचा हस्तक्षेप थांबवावा. *बौद्ध धर्मीयांसाठी एक महत्त्वाची लढाई!* महाबोधी महाविहार केवळ एक पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही, तर ते संपूर्ण बौद्ध समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक स्वायत्ततेसाठी लढा देणे प्रत्येक बौद्ध अनुयायाचे कर्तव्य आहे. महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या, या आंदोलनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बौद्ध धर्माच्या हक्कांसाठी आवाज उठवा! — धम्म भारत ( DhammaBharat.com ) #MahabodhiMuktiAndolan #BodhGaya #BuddhistsRights #DhammaBharat #FreeMahabodhiVihar #BuddhistUnity