
डिजिटल शेतकरी
6.0K subscribers
About डिजिटल शेतकरी
नमस्कार ! मी दाणे आदिनाथ मी तुमच्या डिजिटल शेतकरी या न्युज चॅनलवर स्वागत करत आहे. या चॅनल वर तुम्हाला काय मिळू शकता ? १ रोज सकाळच्या ताज्या बातम्या २ शेती विषयक माहिती तसेच पिकांवरील रोगराई व उपाय योजना , खते औषधे फवारणी माहिती. ३ गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी याविषयी माहिती त्यांना येणारे आजार व त्यावर उपाययोजना ४ महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सरकारी योजना ५ हवामान अंदाज , जॉब अपडेट, राशिभविष्य तसेच वेळोवेळी शैक्षणिक माहिती आणि बरेच काही तुम्ही आजच या चॅनल ला जॉईन फॉलो करा त्यामुळे तुम्ही कोणत्याहि योजनेपासून वंचित राहणार नाही, तुम्हाला आम्ही वेळोवेळी माहिती देत राहू....
Similar Channels
Swipe to see more
Posts

*महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले हे १८ महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर* *🌾डिजिटल शेतकरी🌾* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा' ही संकल्पना राबविली. त्यात महसूल व्यवस्थेने मोठे योगदान दिले. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा पाया रचला गेला. या शंभर दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यंत्रणेच्या बळकटीकरणाचा रोडमॅप तयार करण्यात आला. *महसूल खात्याचे १८ महत्वपूर्ण निर्णय* 1. राज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-२०२५ जाहीर. वाळू डेपो पद्धत बंद, लिलाव पद्धतीने वाळूची विक्री, घरकुलांसाठी १० टक्के वाळू आरक्षित. 2. फेसलेस नोंदणी' आणि 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' सुरू. राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी. 3. 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' 4. सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यास धोरण विशेष अभय योजना. 5. 'जिवंत सातबारा' मोहिमेतून शेतकऱ्यांना दिलासा: मयत खातेदारांच्या ५ लाख उताऱ्यांवर वारस नोंदी. 6. 'एम-सँड'चा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित. 7. शेत अन् पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोफत पोलिस बंदोबस्त. 8. शेत रस्त्यांची होणार सातबारावर नोंद. 9. जन्म-मृत्यूची बोगस प्रमाणपत्रे वितरणास चाप, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात सुधारणा. 10. ड्रोनच्या माध्यमातून होणार खाणींची पाहणी. 11. आता घरबसल्या मिळविता येणार ई-मुद्रांक प्रमाणपत्र. 12. गाळ, माती, मुरूम विनामूल्य मिळणार. 13. घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार! 14. शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ, विद्यार्थ्यांना ५०० च्या स्टॅम्पची सक्ती रद्द. 15. सलोखा योजनेला मुदतवाढ : शेतीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा. 16. माझी जमीन, माझा हक्क अभियानासाठी राज्यस्तरीय समिती. 17. ८० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या!. यंत्रणेचे विकेंद्रीकरण. 18. महाराष्ट्रात शहरी भागांसाठी 'नक्शा' कार्यक्रमाला शासनाची मान्यता. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

*🌾डिजिटल शेतकरी बातमीपत्र 🌾* 🖋️मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 🖋️अजित पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेचा अपघात; 'थार' कारला रुग्णवाहिका धडकली,अकोल्यातील घटना 🖋️शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख केव्हा देणार? तारीख जाहीर झाल्यावरच आम्ही आंदोलन मागे घेऊ ;प्रहारचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया 🖋️गुजरातमध्ये २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं; अपघातस्थळावरून १०० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती 🖋️बच्चू कडू यांची प्रकृती खालावली:त्यांच्या आरोग्याला काही झाले तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, रोहित पवारांचा इशारा 🖋️'हे दुःख शब्दात सांगता येणार नाही' ;एअर इंडिया विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया 🖋️आरसीबीचा सत्कार सोहळा सरकारने आयोजित केला नव्हता ;कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं स्पष्टीकरण 🖋️संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा,सर्व महागड्या तपासण्याचे शुल्क निम्मे; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा निर्णय 🖋️विमान अपघातातून एकही जण वाचण्याची शक्यता कमी; अहमदाबाद पोलिसांची माहिती 🖋️'काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल'; ‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🎯डिजिटल शेतकरी वर जाहिरात करण्यासाठी संपर्क -7972054779*

*मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून* *🌾डिजिटल शेतकरी🌾* मुंबई - मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १८ जुलैपासून पुन्हा सुनावणी घेण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने बुधावारी स्पष्ट केले. या कायद्याचा लाभ घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारे आणि सरकारी नोकरी मिळविणाऱ्यांचे भवितव्य या याचिकांच्या अंतिम निकालाशी अधीन राहील, असेही न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले. ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा, २०२४’च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणीसाठी न्या. रवींद्र घुगे, न्या. एन. जे. जमादार व न्या. संदीप मारणे यांच्या विशेष पूर्णपीठाची गेल्याच महिन्यात स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे या याचिकांवर सुनावणी झाली. मात्र, न्या. उपाध्याय यांची बदली करण्यात आल्याने या याचिकांवरील सुनावणी थांबली होती. *नीट विद्यार्थ्यांच्या याचिकेवर उत्तर द्या* न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी १८ जुलै रोजी ठेवली. तसेच नीटच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १० जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशही सरकारला दिले. *यापूर्वी असे घडले होते...* १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला विशेष पूर्णपीठाची स्थापना करून जलदगतीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. गेल्यावर्षी, मार्चमध्ये कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या, कायद्याला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, तेव्हा न्यायालाने स्पष्ट केले होते की, या कायद्याचा लाभ घेऊन शैक्षणिक संस्थांत प्रवेश घेणाऱ्या व सरकारी नोकरी मिळविणाऱ्यांचे भवितव्य या अंतिम निकालाच्या अधीन राहील. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

*विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान* *🌾डिजिटल शेतकरी🌾* अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी केवळ एकच प्रवासी बचावला आहे. मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमानदुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात घडली. यात शिकाऊ डॉक्टरांसह २४ जण देखील मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. अनेक इमारती, वाहनांना आग लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सांगितले, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानातील वैमानिकाने ‘मेडे’ असा संदेश पाठविला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर किंवा काही संकटात सापडले असेल तर हा संदेश दिला जातो. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे एका स्थानिक नागरिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसून येते. या विमानातील २४२ जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. *विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान* - हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्सजवळ कोसळले. या दुर्घटनेत किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी मृत्युमुखी पडली असून, ६० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे. -दुपारचे जेवण सुरू असल्याने विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर हॉस्टेलमध्येच होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेली आग इतकी मोठी होती की, त्यामुळे एका पाच मजली इमारतही खाक झाली. - भारतातील २०२० नंतरची ही दुसरी सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे. पूर्वी कोझिकोड (केरळ) येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान ओल्या धावपट्टीवरून घसरून दोन तुकडे झाले होते. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ ऑक्टोबर १९८८ रोजी इंडियन एअर लाइन्सचे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरतानाच कोसळले होते. त्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता. *ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करणार* अहमदाबाद : गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात येणार आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने त्यांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे, असे आरोग्य खात्याचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले. *विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक?* अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या विमानात १२ क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एक नागरिक यांचा समावेश होता. हे विमान गुरुवारी सायंकाळी ६.२५ वाजता लंडनमध्ये लँड करणे अपेक्षित होते. *मृतांच्या वारसांना टाटा समूह देणार १ कोटी रुपये* नवी दिल्ली : अहमदाबादेतील एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या परिवारास १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा टाटा समूहाने गुरुवारी केली. टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, प्रत्येक मृताच्या वारसास टाटा समूह १ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देईल. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च समूह करेल. बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य केले जाईल. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

*शेतकरी अनुदान घोटाळा उघड; काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर* *🌾डिजिटल शेतकरी🌾* जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपात तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. (Anudan Vatap Ghotala) जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा सखोल तपास केला. चौकशी अहवाल सादर करण्यात आला असून या प्रकरणात २६ तलाठी, १७ कृषी सहायक व ३१ ग्रामसेवक दोषी आढळले आहेत.(Anudan Vatap Ghotala) २०२२ पासून आपत्तीच्या नुकसानीपोटी देण्यात आलेल्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. यानुसार, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. अंतिम अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. *दोषींवर कठोर कारवाई* या प्रकरणातील दोषींना ४८ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा न मिळाल्यास सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल. खुलासा सादर न केल्यास या २६ तलाठ्यांसह ग्रामसेवक, कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भोकरदन, परतूर, जाफराबाद, जालना, मंठा व बदनापूर या सहा तालुक्यांतील अनुदान वाटपाची चौकशी सुरू आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांकडून अनुदानाची रक्कम वसूल करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. *घोटाळ्याचे ठळक तपशील* विभाग घोटाळ्याची रक्कम (रुपये) *अंबड तालुका* १५.९३ कोटी घनसावंगी तालुका १९.०३ कोटी एकूण ३४.९७ कोटी * यापैकी ५ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा संबंधितांनी अद्याप केलाय. * ९ तलाठ्यांनी प्रत्येकी १ कोटीहून अधिक रक्कम हडप केल्याचे उघड. *काय आहे प्रकरण?* २०१९-२०२२ दरम्यान आलेल्या आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाच्या रकमेत बनावट लाभार्थी तयार करून, अपात्र शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान जमा केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. *चौकशी समितीची स्थापना* * या प्रकरणात वाढलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना केली. समितीने साक्षी, दस्तावेज व बँक खात्यांची तपासणी करून अंतिम अहवाल दिला. * भोकरदन, परतूर, जाफराबाद, जालना, मंठा, बदनापूर तालुक्यांतील वाटपावर चौकशी सुरू आहे. * संबंधित अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याची रक्कम सक्तपणे वसूल केली जाणार आहे. *दोषींना नोटीस* जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८ तासांत खुलासा न दिल्यास २६ तलाठी, १७ कृषी सहायक आणि ३१ ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. ही फक्त सुरुवात असून, पुढील कारवाई अधिक तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. *शेतकऱ्यांचा विश्वास बळकट करणे गरजेचे* या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात असलेला सरकारी यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे यापुढील काळात पारदर्शक प्रक्रिया आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करूनच शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवता येईल. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

*हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार* *🌾डिजिटल शेतकरी🌾* मुंबई - मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.मुंबईला आगमनावेळीच पावसाने दणका दिला. मुंबईची दाणादाण उडवून पाऊस बेपत्ता झाला. परिणामी, वाढत्या उकाड्याने मुंबईकर पुन्हा घामाने निथळत आहेत. *कोकणसह मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार* ३० जूनपर्यंत पावसाची शक्यता असून त्यातील पहिल्या आठवड्यात कोकणसह मध्य महाराष्ट्रात, तर दुसऱ्या आठवड्यात मध्य भारतात चांगला पाऊस पडणार आहे. तिसऱ्या आठवड्यातही मध्य भारतातही चांगला पाऊस आहे. थोडक्यात, पुढील तीन आवठड्यांत देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उणे ३२ पासून १०८ पर्यंतची मान्सूनची मजल मोठी असेल. जर का तसे होणार असेल तर देशात बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थितीची शक्यता आहे. *कोणत्या जिल्ह्याला कधी ऑरेंज अलर्ट?* पुढील तीन ते चार दिवस कोकण, विदर्भात धो-धो बरसणार गुरुवार : अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूर शुक्रवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली शनिवार : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रविवार : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग देशात मोठा पाऊस पडणार; पूरसदृश स्थिती हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये पावसाचे प्रमाण ३२ टक्के कमी नोंदले गेले असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनमधील पाऊस १०८ टक्के असण्याची शक्यता आहे. युरोपियन आणि हवामान विभागाचे मॉड्यूलनुसार पुढील तीन आठवडे देशात चांगल्या पावसाची शक्यता आहे. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W