
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
6.5K subscribers
About Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी, ज्ञानयोग ध्यान शिबीर..! ६ दिवसीय निवासी शिबीर. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र.. विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या. चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
Similar Channels
Swipe to see more
Posts

तुमच्या मनात असलेले कोणतेही काम जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढ्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल.. आणि जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा असेच वाटेल की मी अजून लवकर सुरू करायला हवे होते. म्हणून जर तुमच्या मनात काही प्लॅन असेल काही करायचे असेल तरं त्यावर उगीच नुसता विचार करू नका. लगेचच त्यावर कृती करा. सातत्य ठेवा. अपयश आले तरीही पुढे चालत राहा. सतत सकारात्मक विचार करा. तुम्ही यशस्वी नक्की होणारच..!*माऊलीजी😊*

कालच्या विमान अपघातात या ५ लोकांचा परिवार जळून पूर्ण नामशेष झाला.. ही मुलं किती गोंडस होती पहा.. तुम्ही जर जिवंत आहात तर परमेश्वराने तुम्हाला तक्रार करण्यासाठी नाही तर जगण्यासाठी जिवंत ठेवले आहे .. मनातला द्वेष काढून टाका.. एकमेकांविषयी नकारात्मक बोलू नका.. जन्म व मृत्यू आपल्या हातात नाहीये.. जीवन हातात आहे.. नुसती चर्चा करून, वाईट वाटून घेवुन की बिचारा परिवार.. कसे गेले.. वाईट झालं.. त्याला काही अर्थ नाही.. जे जीवन आहे ते ज्ञानयोगाच्या साधकाप्रमाणे जगा.. आणि परमेश्वराने दिलेले जीवनाचा आदर करा.. कोण केव्हा जाईल हे सांगू शकत नाही पण कोणी कसे जगेल हे तो त्याच्या वागणुकीवरतून नक्कीच ठरवू शकतो.. *माऊलीजी😊*





आपण कधी कधी समोरच्याला खूप समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.. पण समजण्यापेक्षा अजूनच गैरसमज वाढायला लागतो.. वाद विवाद वाढायला लागतात.. कारण मुळात समोरच्याला आपल्या मनाची अवस्था कळत नाही.. तो त्याच्या विश्वात असतो.. आपल्याला वाटते त्याला निदान माझ्या भावना कळल्या पाहिजे.. पण त्याला फक्त त्याच्या भावनांचा आदर असतो.. तू तुझे दुःख बाजूला ठेव आणि माझ्या दुःखात साथ दे एवढेच त्याचं मागणं असतं.. तुम्ही ते करतात सुद्धा.. पण कधी जर तुम्ही तुमचे दुःख सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते आवडत नाही. अशावेळी आपण कसे वागावे आणि काय करावे तेच समजत नाही.. अशा परिस्थितीतमध्ये आपले मन विचार करते की मी कुठे कमी पडतो आहे का? आपण अजून जास्त बदलण्याचा प्रयत्न करतो पण तेही समोरच्याला कमीच असते.. तेव्हा अशावेळी मनाला एकच सांगायचे की तुम्ही सर्वांना एकाच वेळेला खुश ठेवू शकत नाही.. तुम्ही तुमचे कार्य आनंदाने करा.. जो तुमचा आहे तो तुमच्या सोबत राहील.. ज्याला तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे तो तुम्हालाच दोष देऊन निघून जाईल.. जो निघून गेला तो आपला नव्हता.. जो आपल्या सोबत आहे तो नक्कीच आपला आहे, त्याचा आदर करा.. त्याच्यासाठी जगा.. *माऊलीजी😊*

प्रत्येक गोष्टीत लोक काय म्हणतील याचा विचार केला तर आपण आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही.. तुम्हाला जे आवडेल ते प्रत्येकाला आवडेल असं कधीच नसतं.. तुम्ही जे काही करतात त्याला काही लोक चांगले म्हणतील काही लोक वाईट म्हणतील.. तुम्ही दोघांमध्येही अडकू नका.. तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते कार्य मनापासून करा.. स्वतःला काय वाटते यापेक्षा लोकांना आपल्या बद्दल काय वाटते याचा विचार केला तर आपलं वाटणं च आपल्यात मानसिक रोग निर्माण करतं.. प्रत्येक गोष्टीत स्वतःची इतरांसोबत तुलना करणं व लोकांच्या तालावर नाचणे यातून आपण घुसमत जीवन जगतो.. यापुढे स्वतःच्या भावनांची कदर करा.. तुम्हाला जे वाटतं ते आनंदाने करा.. स्वतःवर विश्वास ठेवा.. स्वतःच्या स्वप्नांना साकार करा.. *माऊलीजी😊*

लोक काय म्हणतील.. बिनधास्त जगा..

*आनंद उत्सव आरोग्य शांतता*

कोणी भेटायला येऊ किंवा न येऊ.. आपलं कर्म मात्र कधी न कधी आपल्याला पुन्हा परत भेटायला येतच.. *माऊलीजी😊*

पुस्तक शिकून येते ते सामान्य ज्ञान.. आणि ईश्वराशी एकरूप झाल्यावर अवगत होते ती विद्या.. पुस्तकी ज्ञानातून आपण प्रेम करणं शिकू शकतो.. ईश्वराशी एकरूप झाल्यावर मात्र प्रेमळ होणं अनुभवू शकतो.. काहीतरी मिळाल्यानंतरचा आनंद... आणि आनंदी राहून सर्व काही मिळवणे... यातील फरक हा पुस्तकी ज्ञानातून ईश्वरी ज्ञानाकडे गेल्यावर नक्कीच कळतो.. यासाठीच आपला ज्ञानयोगाचा प्रवास आहे.. *माऊलीजी😊*